शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

आधी सरकारी कर्मचारी अन् आता ४० लाख शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचं बिग 'गिफ्ट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 15:52 IST

 ताग उत्पादक शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. बिहार, बंगाल, आसाम येथे मोठ्या प्रमाणात तागाची शेती केली जाते. 

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी कृषी आणि आरोग्य क्षेत्राशी निगडीत मोठे निर्णय मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये घेण्यात आले आहेत. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत कच्च्या तागाची किमान आधारभूत किंमत वाढवण्यासोबतच नॅशनल हेल्थ मिशनला पुढील ५ वर्ष सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीनंतर मंत्री पीयूष गोयल यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटची बैठक पार पडली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पीयूष गोयल यांनी सांगितले की, ताग या नकदी पीकाचा MSP दर वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. २०२५-२६ साठी किमान आधारभूत किंमत ६ टक्क्यांपर्यंत वाढवली जाईल. या निर्णयामुळे ताग ५६५० रुपये प्रतिक्विंटल खरेदी केला जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना क्विंटलमागे ३१५ रुपयांचा लाभ होणार आहे. तागाची विक्री वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. ताग उत्पादक शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. बिहार, बंगाल, आसाम येथे मोठ्या प्रमाणात तागाची शेती केली जाते. सरकारच्या या निर्णयामुळे ४० लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

तसेच आजच्या कॅबिनेट बैठकीत नॅशनल हेल्थ मिशनबाबतही निर्णय घेण्यात आला. हे मिशन पुढील ५ वर्षापर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. कोरोना काळात नॅशनल हेल्थ मिशनचा बराच फायदा झाला. त्यावेळी १२ लाख आरोग्य सेवकांनी या मिशनअंतर्गत लोकांची मदत केली होती. त्याशिवाय आयुष्मान आरोग्य मंदिर सेंटर्स देशभरात उघडले जातील. आतापर्यंत १ लाख ७२ हजार सेंटर उघडले आहेत. पंतप्रधान नॅशनल डायलिसिसचा ४.५ लाखाहून अधिक लोकांनी लाभ घेतला आहे. 

दरम्यान, मागील गुरुवारी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शनचा सुधारणेसाठी ८ व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली होती. सरकारच्या या निर्णयाने केंद्र सरकारमधील ५० लाखाहून अधिक कर्मचारी आणि ६५ लाख निवृत्तीधारकांना लाभ झाला. त्यात आता ताग उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी