शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

CAAच्या बैठकीपूर्वीच विरोधकांमध्ये फूट, ममता-माया अन् केजरीवालांनी फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 10:59 IST

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशभरात गदारोळ सुरू आहे.

ठळक मुद्देनागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशभरात गदारोळ सुरू आहे.विरोधकांनीसुद्धा या कायद्याची धार बोथट करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्धार केला आहे. विरोधकांमध्ये या कायद्यावरून फूट पडत असल्याचं चित्र समोर आलं आहे.

नवी दिल्लीः नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशभरात गदारोळ सुरू आहे. अनेक ठिकाणी आंदोलनाच्या मार्गे या कायद्याचा निषेध नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर विरोधकांनीसुद्धा या कायद्याची धार बोथट करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्धार केला असून, रणनीती आखण्यासाठी बैठकही बोलावली. परंतु विरोधकांमध्ये या कायद्यावरून फूट पडत असल्याचं चित्र समोर आलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी विरोधकांच्या या बैठकीत समाविष्ट होणार नाहीत. तसेच या बैठकीकडे बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावतींनीही पाठ फिरवलेली आहे. आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवालही या बैठकीला उपस्थित नाहीत. बैठकीत काय होणार?या बैठकीत विरोधी पक्ष  CAA आणि NRCवर सखोल चर्चा करणार आहेत. नागरिकत्व सुधारणा  कायदा लागू करण्यासाठी रणनीती आणखी जाऊ शकते. त्याशिवाय मोदी सरकारला संसदेच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान कशा प्रकारे घेरता येईल, यावरही विचारविनिमय होऊ शकतो.  ममता बॅनर्जी का नाही झाल्या समाविष्ट?पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि डावे घाणेरड्या पद्धतीचं राजकारण करत आहेत, असा ममतांचा आरोप आहे. त्यामुळे ममता आता स्वतंत्रपणे CAA आणि NRCचा विरोध करणार आहेत. गेल्या बुधवारी डाव्यांनी CAA आणि NRCचा विरोध करण्यासाठी देशभरात बंदची हाक दिली होती. परंतु पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं या बंदला विरोध केला होता. डाव्यांच्या या भूमिकेवर ममता बॅनर्जी नाराज आहेत. त्यामुळे त्या डावे आणि काँग्रेसपासून काहीसं अंतर राखून आहेत. दुसरीकडे मायावती आणि काँग्रेसमध्ये या कायद्यावरून मतभेद असल्याची चर्चा आहे. बीएसपी या बैठकीत आपल्या कोणत्याही प्रतिनिधीला पाठवणार नाही. 

10 जानेवारीला देशभरात लागू झाला CAAदेशभरात झालेल्या विरोध प्रदर्शनानंतर नागरिकत्व सुधारणा कायदा शुक्रवारी 10 जानेवारीला लागू करण्यात आला. केंद्रीय गृह मंत्रालयानं एक अधिसूचना जारी करत हा कायदा लागू केल्याचं सांगितलं. त्यामुळे आता पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून आलेल्या गैर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व बहाल केलं जाणार आहे. या कायद्याला संसदेनं मंजुरी दिल्यानंतर अनेक ठिकाणी विरोध प्रदर्शन करण्यात आलं होतं. तर भाजपानंही या कायद्यासंदर्भात माहिती देणारं एक अभियान राबवलं आहे.  

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकArvind Kejriwalअरविंद केजरीवालMamata Banerjeeममता बॅनर्जी