शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 06:06 IST

ट्रम्प यांचे ‘मृत अर्थव्यवस्था’ वक्तव्य, टॅरिफ धमकीला पंतप्रधान मोदी यांची अप्रत्यक्ष चपराक; म्हणाले, भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर

वाराणसी : भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता आणि अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारताने स्वतःच्या आर्थिक हित, प्राधान्याबाबत सतर्क राहिले पाहिजे. भारतीयांनी स्वदेशी उत्पादने वापरण्यावर अधिक भर द्यावा. भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच व्यापाऱ्यांनी दुकानात ठेवल्या पाहिजेत आणि आपण ग्राहकांनीही त्याच वस्तू खरेदी केल्या पाहिजेत, असा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी धरला. भारत हा मृत अर्थव्यवस्था असल्याचे सांगत भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क २५ टक्के करण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर वाराणसी येथे एका कार्यक्रमात मोदी यांनी ट्रम्प यांना ही अप्रत्यक्ष चपराक लगावली.रशियाकडून लष्करी उपकरणे आणि खनिज तेल खरेदी केल्याबद्दल ट्रम्प यांनी भारताला दंडही आकारला आहे. या घडामोडींबाबत पंतप्रधान मोदी कुणाचाही नामोल्लेख न करता म्हणाले की, जगातील अर्थव्यवस्था सध्या अस्थिर असून, अशा काळात अनेक देश फक्त आपल्या हितसंबंधांकडे लक्ष देत आहेत. भारतालाही आपल्या आर्थिक हिताबाबत सजग राहावे लागणार आहे. स्वदेशीचा कठोर पुरस्कार आणि सामूहिक प्रयत्नांतूनच आपण भारताला विकसित देश बनवू शकतो.

जगाने पाहिले भारताचे रौद्र स्वरूपऑपरेशन सिंदूरमुळे जगाला भारताची ताकद, त्याचे रौद्र रूप दिसले. आमच्या देशावर हल्ला करणारे पाताळात जरी दडून बसले, तरी त्यांना सोडणार नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी वाराणसीतील एका जाहीर सभेत म्हटले. त्यांनी सांगितले की, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांची हत्या झाली. या घटनेने मी व्यथित झालो. आपल्या देशातील मायभगिनींच्या ‘सिंदूर’वर ज्यांनी हल्ला केला त्यांचा बदला घेण्याचे वचन मी महादेवाच्या कृपेने पूर्ण केले. ऑपरेशन सिंदूरचे यश मी महादेवांच्या चरणी अर्पण करत आहे. १४० कोटी भारतीयांनी दाखविलेली एकजूट हेच या मोहिमेमागील खरे सामर्थ्य आहे. शिव म्हणजे कल्याण, पण जेव्हा वाईट गोष्टी, दहशतवाद डोके वर काढतो, तेव्हा महादेव रौद्र रूप धारण करतात. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताचे हेच रूप जगाने पाहिले.

समाजवादी पक्षाची संमती घ्यायची का ?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, पहलगाममधील हल्लेखोरांचा आताच का खात्मा केला, असा प्रश्न समाजवादी पक्षाच्या एका नेत्याने संसदेत विचारला. दहशतवाद्यांवर हल्ला आता करायचा की नंतर, असे मी समाजवादी पक्षाच्या नेत्यांना फोन करून विचारावे, अशी त्यांची अपेक्षा आहे का? असा सवाल मोदी यांनी केला.

स्वदेशी वस्तूच विकायचा निर्धार व्यापाऱ्यांनी करावा -पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवायचे असेल तर देशातील प्रत्येक पक्ष, नेता, नागरिकाने स्वदेशी वस्तूंचा वापर आणि प्रचार केला पाहिजे. आपल्या दुकानांमध्ये फक्त स्वदेशी वस्तू विकल्या जातील, याकडे भारतातील व्यापारी, दुकानदारांनी लक्ष दिले पाहिजे. तिच देशाची खरी सेवा ठरणार आहे.  स्वदेशी गोष्टींविषयीचा आग्रह आपल्या प्रत्येक कृतीतून दिसला पाहिजे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिकाIndiaभारतbusinessव्यवसाय