शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

व्यापमं घोटाळा; कैदेतील विद्यार्थ्यांना सरकारी साक्षीदार बनवा

By admin | Updated: July 10, 2015 01:20 IST

व्यापमं घोटाळ्याशी संबंधित सर्व प्रकरणांची चौकशी सीबीआयमार्फत करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने आनंिदत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी

नवी दिल्ली : व्यापमं घोटाळ्याशी संबंधित सर्व प्रकरणांची चौकशी सीबीआयमार्फत करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने आनंिदत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी या घोटाळ्यातील भ्रष्ट अधिकारी, पोलीस आणि राजकारण्यांचे साटेलोटे उघड करण्यासाठी याप्रकरणी कारागृहात बंदिस्त असलेल्या विद्यार्थ्यांना सरकारी साक्षीदार बनविण्यात यावे, अशी मागणी केली आहे.शिवराजसिंह चौहान यांनी मुख्यमंत्रिपद सोडावे अशी आपली अपेक्षा नाही; कारण भाजपकडून नैतिकतेची अपेक्षा करता येणार नाही, अशी खोचक टीकाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली. आता आपण वाळू माफियांकडे मोर्चा वळविणार असल्याचे त्यांनी सांगितले.सीबीआय चौकशीचा निर्णय देण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांचे वक्तव्य नोंदवून घेतले. राज्य सरकारला व्यापमं घोटाळ्याशी संबंधित प्रकरणे आणि मृत्यूच्या घटनांचा तपास स्वतंत्र आणि निष्पक्ष पद्धतीने करण्यासाठी सीबीआयकडे हस्तांतरित करण्यास कुठलाही आक्षेप नसल्याचे रोहतगी यांनी सांगितले. न्यायमूर्तीद्वय अरुण मिश्रा आणि अमित्व राय यांचा समावेश असलेल्या या पीठाने महाधिवक्त्यांच्या भूमिकेची यावेळी प्रशंसा केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंग यांच्यासह इतर काही लोकांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला. व्यापमं घोटाळ्याशी संबंधित सर्व प्रकरणांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)------मदत नको, निष्पक्ष चौकशी हवी - कुटुंबीय ४मध्यप्रदेशातील व्यापमं घोटाळ्याच्या वृत्तांकनादरम्यान अचानक रहस्यमय मृत्यू झालेले पत्रकार अक्षय कुमार सिंह यांच्या कुटुंबियांनी मध्यप्रदेश सरकारची मदत नाकारत, निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.४मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान गुरुवारी सकाळी अक्षय कुमार यांच्या नवी दिल्लीतील कुटुंबियांच्या सांत्वनासाठी पोहोचले. अक्षय यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करण्याची ग्वाही आणि कुटुंबातील एका सदस्यास सरकारी नोकरी मिळवून देण्यात मदत करू, असे आश्वासन शिवराज यांनी यावेळी दिले. अक्षयच्या कुटुंबाने मात्र कुठल्याही प्रकारची मदत घेण्यास नकार दिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)अक्षयची आई व बहिणीने केली. माझा मुलगा घरून निघाला तेव्हा तो अगदी ठणठणीत होता. अचानक त्याचा मृत्यू कसा झाला. आम्हाला कुठलीही मदत नको. माझ्या मुलाच्या मृत्यूचे कारण आम्हाला कळावे आणि यासाठी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, असे अक्षयची आई म्हणाली. अक्षयच्या बहिणीनेही हीच भावना व्यक्त केली. मुख्यमंत्री शिवराज यांनी आम्हाला सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे; पण शेवटी ते राजकीय नेते आहेत. ते काय करतात, यावरूनच त्यांची पारख होणार आहे, असे ती म्हणाली.--------------सर्वोच्च न्यायालयाचे मध्यप्रदेश उच्च न्यायालयावर ताशेरेसिब्बल यांनी या घोटाळ्यात राज्यातील अनेक बड्या हस्ती सामील असल्याचा उल्लेख करताच, राज्याने यापूर्वीच उच्च न्यायालयात सीबीआय चौकशीची विनंती केली असून यावर २० जुलैला सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले. यावर प्रतिक्रिया देताना मध्यप्रदेश उच्च न्यायालय चालढकल करीत आहे, असे ताशेरे पीठाने ओढले. उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीवर निर्णय घेण्याऐवजी आता चेंडू सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टात असल्याचे सांगून जबाबदारी झटकली, अशी टिपणी पीठाने केली.व्यापमं चौकशी माझ्यासाठी अग्निपरीक्षाच - शिवराजसिंग चौहान४भोपाळ : व्यापमं घोटाळ्याची चौकशी ही आपल्यासाठी अग्निपरीक्षाच असल्याचे सांगून, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आपली विनंती मान्य करून याप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत-----------राज्यपालप्रकरणी उत्तर मागितलेसंबंधितप्रकरणी बजावलेल्या नोटिशीवर चार आठवड्यात उत्तर मागितले आहे. याचिकाकर्त्याच्यावतीने युक्तिवाद करणारे कपिल सिब्बल यांनी यादव यांनी पदाचा आदर राखून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी केली. परंतु पीठाने यावर कुठलेही विधान केले नाही. एसटीएफने काही परीक्षार्र्थ्यांची बाजू घेतल्याच्या आरोपात यादव यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. ४यादव यांची संपुआ सरकारच्या कार्यकाळातच या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. अर्थात उच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध दाखल एफआयआर रद्द केला होता. यादव यांचा मुलगा शैलेश हा व्यापमं घोटाळ्यातील एक आरोपी होता आणि त्याचाही रहस्यमय मृत्यू झाला. -------