शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बस पेटून २४ प्रवाशांचा मृत्यू

By admin | Updated: June 6, 2017 04:42 IST

ट्रकशी धडक झाल्यामुळे उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाची बस पेटून २४ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.

बरेली : ट्रकशी धडक झाल्यामुळे उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाची बस पेटून २४ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. सोमवारी ही भयंकर दुर्घटना घडली. यात १४ प्रवासी जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाची बस दिल्लीहून पूर्व उत्तर प्रदेशातील गोंडा येथे जात असताना बडा बायपास येथे अपघातग्रस्त झाली. बसमध्ये ४१ प्रवासी होते. प्रवाशांचे मृतदेह एवढे होरपळले आहेत की, डॉक्टरांना ते पुरुषाचे आहेत की, स्त्रीचे हे ठरविणेही कठीण झाले आहे. मृतांची ओळख पटविण्यासाठी डीएनए टेस्ट करण्यात येणार आहे. मृतांची संख्या वाढून २४ झाली असून गंभीररीत्या होरपळलेल्या १४ जणांवर उपचार सुरू आहेत, असे उत्तर प्रदेशचे मंत्री राजेश अग्रवाल यांनी सांगितले. बसमधील तीन प्रवासी बचावले असून त्यांना किरकोळ इजा झाली आहे. हा अपघात रात्री उशिरा एक ते दीड वाजण्याच्या सुमारात झाला, असे पोलीस अधीक्षक जोगेंद्रकुमार यांनी सांगितले. ट्रकशी धडक झाल्यानंतर बसची इंधन टाकी फुटली आणि त्यामुळे आग लागली, असेही दुर्घटना पाहणाऱ्यांनी सांगितले.पहाटे पावणेसहा वाजता दुर्घटनास्थळावरून २२ मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले. ओळख पटू न शकण्याइतपत ते जळाले असून मृतदेह स्त्रीचा आहे की पुरुषाचा हे ठरविणेही कठीण झाले आहे, असे बरेली जिल्हा रुग्णालयाचे डॉ. शैलेश रंजन यांनी सांगितले. शवविच्छेदनानंतरच मृतांपैकी पुरुष किती आणि स्त्रिया किती हे सांगता येईल, असे बरेलीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय यादव म्हणाले.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेवरून अग्रवाल मदतकार्याच्या देखरेखीसाठी हेलिकॉप्टरने येथे दाखल झाले. सर्व मृतदेहांची डीएनए टेस्ट करण्यात येईल, असे ते म्हणाले. मृतांत बसचालकाचाही समावेश असून कंडक्टर गंभीर जखमी आहे. ट्रक शहाजहानपूरकडून येत होता. ट्रकचा चालक फरार झाला आहे. धडकेनंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. अग्निशमन वाहने त्वरेने घटनास्थळी पोहोचली. तथापि, आग खूप भडकली होती. त्यामुळे आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवून बसमध्ये जाण्यास वेळ लागला, असे पोलीस अधिकारी एस. के. भगत यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)>आर्थिक मदतपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान घोषित केले. मुख्यमंत्र्यांनीही मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी दोन लाख रुपये, गंभीर जखमींना ५० हजार रुपये आणि किरकोळ जखमींना २५ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याची घोषणा केली.