शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
2
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
3
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
4
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
5
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
6
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
7
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
8
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
9
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
10
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
11
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
12
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
13
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
14
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
15
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
16
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
17
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
18
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
19
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
20
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल

बस पेटून २४ प्रवाशांचा मृत्यू

By admin | Updated: June 6, 2017 04:42 IST

ट्रकशी धडक झाल्यामुळे उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाची बस पेटून २४ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.

बरेली : ट्रकशी धडक झाल्यामुळे उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाची बस पेटून २४ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. सोमवारी ही भयंकर दुर्घटना घडली. यात १४ प्रवासी जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाची बस दिल्लीहून पूर्व उत्तर प्रदेशातील गोंडा येथे जात असताना बडा बायपास येथे अपघातग्रस्त झाली. बसमध्ये ४१ प्रवासी होते. प्रवाशांचे मृतदेह एवढे होरपळले आहेत की, डॉक्टरांना ते पुरुषाचे आहेत की, स्त्रीचे हे ठरविणेही कठीण झाले आहे. मृतांची ओळख पटविण्यासाठी डीएनए टेस्ट करण्यात येणार आहे. मृतांची संख्या वाढून २४ झाली असून गंभीररीत्या होरपळलेल्या १४ जणांवर उपचार सुरू आहेत, असे उत्तर प्रदेशचे मंत्री राजेश अग्रवाल यांनी सांगितले. बसमधील तीन प्रवासी बचावले असून त्यांना किरकोळ इजा झाली आहे. हा अपघात रात्री उशिरा एक ते दीड वाजण्याच्या सुमारात झाला, असे पोलीस अधीक्षक जोगेंद्रकुमार यांनी सांगितले. ट्रकशी धडक झाल्यानंतर बसची इंधन टाकी फुटली आणि त्यामुळे आग लागली, असेही दुर्घटना पाहणाऱ्यांनी सांगितले.पहाटे पावणेसहा वाजता दुर्घटनास्थळावरून २२ मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले. ओळख पटू न शकण्याइतपत ते जळाले असून मृतदेह स्त्रीचा आहे की पुरुषाचा हे ठरविणेही कठीण झाले आहे, असे बरेली जिल्हा रुग्णालयाचे डॉ. शैलेश रंजन यांनी सांगितले. शवविच्छेदनानंतरच मृतांपैकी पुरुष किती आणि स्त्रिया किती हे सांगता येईल, असे बरेलीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय यादव म्हणाले.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेवरून अग्रवाल मदतकार्याच्या देखरेखीसाठी हेलिकॉप्टरने येथे दाखल झाले. सर्व मृतदेहांची डीएनए टेस्ट करण्यात येईल, असे ते म्हणाले. मृतांत बसचालकाचाही समावेश असून कंडक्टर गंभीर जखमी आहे. ट्रक शहाजहानपूरकडून येत होता. ट्रकचा चालक फरार झाला आहे. धडकेनंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. अग्निशमन वाहने त्वरेने घटनास्थळी पोहोचली. तथापि, आग खूप भडकली होती. त्यामुळे आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवून बसमध्ये जाण्यास वेळ लागला, असे पोलीस अधिकारी एस. के. भगत यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)>आर्थिक मदतपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान घोषित केले. मुख्यमंत्र्यांनीही मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी दोन लाख रुपये, गंभीर जखमींना ५० हजार रुपये आणि किरकोळ जखमींना २५ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याची घोषणा केली.