शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या बस अन् ट्रकचा भीषण अपघात, 16 जणांचा मृत्यू, 35 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 07:46 IST

दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या स्लीपर बसनं आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर बुधवारी रात्री एका ट्रकला धडक दिली.

नवी दिल्लीः दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या स्लीपर बसनं आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर बुधवारी रात्री एका ट्रकला धडक दिली. या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला असून, 35 प्रवासी जखमी आहेत. जखमींना सेफई पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बसमधून 90 जण प्रवास करत होते.  खासगी बस जेव्हा एक्स्प्रेस वेवर भदाव गावाजवळ पोहोचली, तेव्हा चालकाचा बसवरील ताबा सुटला. बस अनियंत्रित झाल्यानं पुढच्या ट्रकवर जाऊन धडकली. त्यानंतर मोठा आवाज झाला. तात्काळ स्थानिकांनी बचावकार्य सुरू केलं आणि पोलिसांना या अपघाताची सूचना दिली.  अपघात झालेल्या घटनास्थळी पोलीस पोहोचले असून, एडीजी झोनचे अजय आनंद आणि आयजी रेंजचे ए. सतीश गणेश घटनास्थळाची पाहणी करत आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटवता आलेली नाही. अपघातामुळे बसचा पुढचा भागाचा पत्रा तुटला आहे. घटनास्थळी स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीनं बचावकार्य सुरू केलं आहे.  जखमींना अँब्युलन्समधून पीजीआय सेफई रुग्णालयात पाठवण्यात आलं. तीन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. थोड्या वेळानं आणखी एकानं प्राण सोडले. सेफई रुग्णालयात हलवण्यात आलेल्या 35 जखमींपैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातस्थळी आरडाओरडा सुरू होता. त्यानंतर जवळपासच्या लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी बस दुर्घटनेतील जखमींसाठी तात्काळ बचावकार्य राबवण्याचे निर्देश दिले आहेत. एडीजी झोनचे अजय आनंद आणि आयजी रेंजचे ए. सतीश गणेश घटनास्थळी दाखल झालेले आहेत.