शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

५० बेवारस कुत्र्यांना जिवंत जाळले

By admin | Updated: June 16, 2016 04:07 IST

चेन्नईपासून ५० किमी अंतरावर किझामूर गावात गेल्या ५ जून रोजी गावकऱ्यांनी ५० कुत्र्यांना रॉकेल ओतून जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे. जाळण्यापूर्वी या कुत्र्यांना कीटकनाशक

चेन्नई: चेन्नईपासून ५० किमी अंतरावर किझामूर गावात गेल्या ५ जून रोजी गावकऱ्यांनी ५० कुत्र्यांना रॉकेल ओतून जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे. जाळण्यापूर्वी या कुत्र्यांना कीटकनाशक मिसळलेले खाद्य देऊन शांत करण्यात आले होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कुत्र्यांनी मेंढ्या आणि बकऱ्यांच्या कळपांवर हल्ला केल्याने त्यांना ठार मारण्यात आले. प्राण्यांच्या अधिकारांसाठी लढणारे पी. आश्वत यांना एका गावकऱ्याने ही माहिती दिली तेव्हा झाला प्रकार उघडकीस आला. आश्वत यांनी चार दिवसांनी या दु:खद घटनेचे वास्तव समोर आणले.त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुरली, मुथु, मुरुगॉदास आणि जीवा नामक चार गावकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. काही बेवारस कुत्र्यांनी मेंढ्या आणि बकऱ्यांच्या कळपावर हल्ला केल्याने त्यातील काही जखमी झाल्या होत्या. नंतर कुत्रे चावल्याने काही मृत्युमुखी पडल्या. परंतु कुत्र्यांच्या हल्ल्यात कुठलाही प्राणी जखमी झाल्याचे निदर्शनास आले नसल्याचे पी. आश्वत यांचे म्हणणे आहे. पंचायतीने मला कुठल्याही कुत्र्यांची हत्या करण्यात आली नसल्याचे सांगितले असले तरी ५० कुत्री ठार मारण्यात आल्याचा पुरावा माझ्याकडे आहे.