शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

विमान प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आता 4 तास आधीच जावं लागणार विमानतळावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 14:57 IST

जर आपण विमानानं प्रवास करत असाल तर आपल्यासाठी महत्त्वपूर्ण बातमी आहे.

नवी दिल्लीः जर आपण विमानानं प्रवास करत असाल तर आपल्यासाठी महत्त्वपूर्ण बातमी आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 हटवल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सैरभैर झाले आहेत. त्यामुळे केंद्रातल्या मोदी सरकारनं दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा वाढवली आहे. देशातल्या सर्वच विमानतळांवरची सुरक्षा वाढवण्यात आली असून, गुप्तचर यंत्रणांनीही सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.नागरी उड्डयन सुरक्षा ब्यूरो (BCAS)नं आपल्या विधानात म्हटलं आहे की, विमान कंपन्या आणि विमानतळावरील प्रशासनानंही घरगुती उड्डाण करणाऱ्या प्रवाशांना तीन तास आधी विमानतळावर पोहोचण्यास सांगितलं आहे. तसेच परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना 4 तास आधीच विमानतळावर येण्यास सांगण्यात आलं आहे. विमानतळावर येणारे ड्रोन मॉडल आणि मायक्रोलाइट एअरक्राफ्टवर नजर ठेवली जाणार आहे, यासाठी क्विक रिऍक्शन टीम तैनात करण्यात आली आहे. 30 ऑगस्टपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. स्वातंत्र्याच्या दिवसानिमित्त खबरदारीचा उपाय म्हणून ही सुरक्षा वाढवण्यात आल्याचीही माहिती विमानतळ प्रशासनानं दिली आहे. हा नवा नियम 10 ऑगस्टपासून 30 ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहे.सामान्य स्वरूपात घरगुती प्रवाशांना उड्डाणाआधी दोन तास, आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी तीन तास आधीच विमानतळावर जावं लागणार आहे. 30 ऑगस्टपर्यंत विमानतळावर व्हिजिटर पास मिळणार नाही. व्हिजिटरचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच विमानतळावर आता कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच एखादी गाडी पार्किंगमध्ये उभी असल्यास तिचीही चौकशी होणार आहे.तसेच एअरपोर्ट टर्मिनलच्या बाहेरच पिकअप अँड ड्रॉपची सुविधा घ्यावी लागणार आहे. सर्वच प्रवाशांची विमानतळावर प्रवेश करण्यापासून विमानात बसेपर्यंत सखोल चौकशी होणार आहे. प्रवाशांशिवाय पायलट, क्रू मेंबर्ससह ग्राऊंड स्टाफसह विमानतळ कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. तसेच यात कोण नशापान करतं हेसुद्धा पाहिलं जाणार आहे. सगळ्यांनाच या तपासणीच्या चक्रातून जावं लागणार आहे.