शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

विमान प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आता 4 तास आधीच जावं लागणार विमानतळावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 14:57 IST

जर आपण विमानानं प्रवास करत असाल तर आपल्यासाठी महत्त्वपूर्ण बातमी आहे.

नवी दिल्लीः जर आपण विमानानं प्रवास करत असाल तर आपल्यासाठी महत्त्वपूर्ण बातमी आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 हटवल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सैरभैर झाले आहेत. त्यामुळे केंद्रातल्या मोदी सरकारनं दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा वाढवली आहे. देशातल्या सर्वच विमानतळांवरची सुरक्षा वाढवण्यात आली असून, गुप्तचर यंत्रणांनीही सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.नागरी उड्डयन सुरक्षा ब्यूरो (BCAS)नं आपल्या विधानात म्हटलं आहे की, विमान कंपन्या आणि विमानतळावरील प्रशासनानंही घरगुती उड्डाण करणाऱ्या प्रवाशांना तीन तास आधी विमानतळावर पोहोचण्यास सांगितलं आहे. तसेच परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना 4 तास आधीच विमानतळावर येण्यास सांगण्यात आलं आहे. विमानतळावर येणारे ड्रोन मॉडल आणि मायक्रोलाइट एअरक्राफ्टवर नजर ठेवली जाणार आहे, यासाठी क्विक रिऍक्शन टीम तैनात करण्यात आली आहे. 30 ऑगस्टपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. स्वातंत्र्याच्या दिवसानिमित्त खबरदारीचा उपाय म्हणून ही सुरक्षा वाढवण्यात आल्याचीही माहिती विमानतळ प्रशासनानं दिली आहे. हा नवा नियम 10 ऑगस्टपासून 30 ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहे.सामान्य स्वरूपात घरगुती प्रवाशांना उड्डाणाआधी दोन तास, आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी तीन तास आधीच विमानतळावर जावं लागणार आहे. 30 ऑगस्टपर्यंत विमानतळावर व्हिजिटर पास मिळणार नाही. व्हिजिटरचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच विमानतळावर आता कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच एखादी गाडी पार्किंगमध्ये उभी असल्यास तिचीही चौकशी होणार आहे.तसेच एअरपोर्ट टर्मिनलच्या बाहेरच पिकअप अँड ड्रॉपची सुविधा घ्यावी लागणार आहे. सर्वच प्रवाशांची विमानतळावर प्रवेश करण्यापासून विमानात बसेपर्यंत सखोल चौकशी होणार आहे. प्रवाशांशिवाय पायलट, क्रू मेंबर्ससह ग्राऊंड स्टाफसह विमानतळ कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. तसेच यात कोण नशापान करतं हेसुद्धा पाहिलं जाणार आहे. सगळ्यांनाच या तपासणीच्या चक्रातून जावं लागणार आहे.