शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

गंगाजमुनात स्थितीमागे बिल्डर लॉबी

By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST

राम इंगोले यांचा आरोपनागपूर : गंगाजमुनात सध्याची परिस्थिती निर्माण करण्यामागे बिल्डर लॉबीची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राम इंगोले यांनी केला आहे. पोलिसांना हाताशी धरुन अशी स्थिती विविध ठिकाणच्या वारांगनांच्या वस्तीत यापूर्वी अनेकदा झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.इंगोले गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. पोलिसांच्या कारवाईमुळे गंगाजमुनात ...


राम इंगोले यांचा आरोप
नागपूर : गंगाजमुनात सध्याची परिस्थिती निर्माण करण्यामागे बिल्डर लॉबीची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राम इंगोले यांनी केला आहे. पोलिसांना हाताशी धरुन अशी स्थिती विविध ठिकाणच्या वारांगनांच्या वस्तीत यापूर्वी अनेकदा झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
इंगोले गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. पोलिसांच्या कारवाईमुळे गंगाजमुनात निर्माण झालेल्या स्थितीवर मत व्यक्त करताना ते म्हणाले, वेश्याव्यवसाय वाईट आहे. त्याहूनही वाईट अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचा प्रकार आहे. त्याचे समर्थन कुणीच करणार नाही. मात्र, या वस्तीच्या नावाने ओरड करणाऱ्यांची नियत तपासण्याची गरज आहे, असेही इंगोले म्हणाले.
नागपूर असो अथवा महाराष्ट्रातील अन्य कोणतेही शहर किंवा गुजरातमधील सूरत शहर, ज्या ज्या ठिकाणी वारांगनांच्या वस्तीविरोधात ओरड आणि कारवाई केली गेली. त्याचे स्वरूप वेगळे अन् उद्देश वेगळा असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. दरवेळी वारांगनांना पळवून लावणारे वेगळे चित्र निर्माण करतात. वेगळा कांगावा करतात. त्यासाठी पोलिसांना हाताशी धरले जाते. वारांगनांना त्यांच्या वस्तीतून पळवून लावणारे वातावरण शांत झाल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या बिल्डींग, मॉल उभारतात. ठिकठिकाणी असे झाले आहे. त्यासाठी बिल्डर लॉबी सुनियोजितपणे काम करते. पोलिसांसकट अनेकांना त्यातून मोठा लाभ मिळतो. गंगाजमुनात वेश्याव्यवसाय बंद करण्यामागे असाच डाव आहे.
वेश्यावस्ती हटविण्यासाठी अशी एकाएकी टोकाची भूमिका घेणे, समजण्यापलिकडचे आहे. अशा प्रकारे कुणाला विस्थापित करणेही योग्य नाही. १९८० मध्ये राऊत नामक पोलीस अधिकाऱ्याने अशीच भूमिका घेतली होती. त्यावेळी राऊत यांना आम्ही या वस्तीचे वास्तव अन् वारांगनांच्या परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यांनीही अभ्यास केला अन् नंतर स्थिती सामान्य झाली. ही कारवाई निरपेक्ष असेल तर संबंधित अधिकाऱ्यांनी येथील वास्तव लक्षात घेऊन अभ्यासपूर्वक कारवाईचे नियोजन करायला हवे.
पुनवर्सनाचे काय ?
वारांगनांना येथून काढायचे असेल, ही वस्ती हटवायची असेल, तर आधी पुनर्वसन करायला हवे, असेही मत इंगोले यांनी मांडले. हा धंदा कुणीच आनंदाने करीत नाही, विवशताच त्यामागे असते, हेसुद्धा ध्यानात घेण्याची गरज त्यांनी विशद केली.
---