शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पामुळे ग्रामीण विकासाला मिळणार चालना!

By admin | Updated: March 1, 2015 02:08 IST

गरीब आणि वंचित घटकांसाठी अर्थसंकल्पात काही योजनांत तरतूद करण्यात आली आहे.

प्रत्येक गावात रुग्णालय उभारणी । संचार नेटवर्कने जोडणार । गावांमध्ये ४ कोटी घरांची उभारणीनवी दिल्ली : गरीब आणि वंचित घटकांसाठी अर्थसंकल्पात काही योजनांत तरतूद करण्यात आली आहे. २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात मध्यान्ह भोजनसह शिक्षण क्षेत्रासाठी ६८,९६८ कोटी, तर मनरेगासह ग्रामीण विकासाशी संबंधित कार्यक्रमांसाठी ७९,५२६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे जेटली यांनी सांगितले. गृहबांधणी आणि शहरी विकासासाठी २२,४०७ कोटी रुपये व बाल विकासासाठी १०,३५१ कोटी रुपये प्रदान करण्यात आले आहेत.सर्वांना छत्र उपलब्ध करून देण्याच्या योजनेंतर्गत शहरी भागात दोन कोटी तर ग्रामीण भागात चार कोटी घरांची उभारणी केली जाणार आहे. या घरांमध्ये २४ तास वीजपुरवठा, पिण्याचे स्वच्छ पाणी, शौचालय व्यवस्था आणि रस्ते जोडणी या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. २०२० पर्यंत उर्वरित २० हजार गावांचे विद्युतीकरण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल. यासाठी सौरऊर्जेची मदत घेतली जाणार आहे. सर्व गावांमध्ये वैद्यकीय सेवा, प्रत्येक मुलाला पाच किलोमीटर क्षेत्रात माध्यमिक शाळा उपलब्ध करून देणे यावर या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. ग्रामीण भागातून शहरांकडे रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखण्यासाठीही सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. रुर्बन क्लस्टर योजनेच्या माध्यमातून जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न याद्वारे होणार आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)मनरेगासाठी विक्रमी तरतूद महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगासाठी आतापर्यंतची सर्वाधिक तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली असल्याचे जेटली म्हणाले. २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी मनरेगासाठीची ५,००० कोटींंची अतिरिक्त तरतूद केली. अर्थसंकल्पात सरकारने महात्मा गांधी रोजगार हमी योजना आगामी काळातही सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील कुणीही रोजगाराशिवाय राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही जेटलींनी दिली. मनरेगासाठी ३४,६९९ कोटी निधीचे पहिल्या टप्प्यात वाटप केले जाईल. मनरेगांतर्गत होणाऱ्या कामांची गुणवत्ता आणि प्रभाव यात सुधारणेवर सरकार भर देणार आहे.