शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

संसदचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारपासून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 02:46 IST

३१ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, सार्वत्रिक निवडणुकीच्या आधीचे केंद्रातील विद्यमान सरकारचे हे शेवटचे असेल.

नवी दिल्ली : ३१ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, सार्वत्रिक निवडणुकीच्या आधीचे केंद्रातील विद्यमान सरकारचे हे शेवटचे असेल. या अधिवेशनादरम्यान आजवरची संसदीय परंपरा मोडीत काढून लेखानुदानाऐवजी केंद्र सरकार पूर्ण अर्थसंकल्प मांडणार असल्याचीचर्चा आहे. १ फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार असून, हे अधिवेशन १३ फेब्रुवारीपर्यंत चालेल. दरम्यान, राज्यसभेचे सभापती आणि लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी अधिवेशन सुरळीत पार पडावे म्हणून ३० जानेवारी रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मोदी सरकार या अधिवेशनादरम्यान पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याच्या तयारीत आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तथापि, काँग्रेस-मित्रपक्षांसह इतर विरोधी पक्षांनी पूर्ण अर्थसंकल्प मांडण्याच्या मनसुब्याला तीव्र विरोध करून सरकारला असे करण्यापासून रोखण्याची रणनीती ठरविली आहे. एवढेच नव्हेतर काँग्रेस अन्य पक्षांना सोबत घेऊन राष्टÑपतींकडेही दाद मागणार आहे.२०१४-१५ ते २०१८-१९ पर्यंत सलग पाच पूर्ण अर्थसंकल्प मोदी सरकारने सादर केलेले आहेत. मोदी यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारचा कार्यकाळ जेमतेम तीन महिन्यांचा बाकी असताना लेखानुदानाऐवजी पूर्ण अर्थसंकल्प सादर करणे संसदीय परंपरेचे उल्लंघन करणारे आहे. तीन महिनेच कार्यकाळ बाकी असताना सरकार वर्षभरासाठी पूर्ण अर्थसंकल्प सादर कसे करू शकते, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.शेतकऱ्यांना दिलासा देणार...शेतकरी वर्गाची नाराजी सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी दूर करण्याच्या आणि कृषी क्षेत्रावरील संकटाचे निवारण करण्याच्या इराद्यातहत केंद्रीय मंत्रिमंडळ लवकरच शेतकºयांसाठी विशेष आर्थिक योजना मंजूर करून दिलासा देऊ शकते. छोटे आणि सीमांत शेतकºयांच्या कमी उत्पन्नाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठीच्या उपाययोजनांसंबंधीचा कृषी मंत्रालयाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विचाराधीन आहे, असे सूत्रांनी सांगितले. २०१९-२० च्या अर्थसंकल्पापूर्वी सरकार शेतकºयांसाठी आर्थिक योजनांची घोषणा करील, असे संकेत अलीकडेच कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांनी दिले होते.

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019ParliamentसंसदNarendra Modiनरेंद्र मोदीbusinessव्यवसाय