शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

Budget: तंत्रज्ञान क्षेत्राला अप्रत्यक्ष फायदा देणाऱ्या तरतुदीच जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 07:45 IST

यंदाच्या अर्थसंकल्पात विज्ञान आणि तंत्रज्ञानाबाबत पाहिजे तशी तरतूद झालेली नाही, असे मत माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केले आहे.

-अंकिता कोठारे केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळातील यंदाचा तिसरा अर्थसंकल्प शनिवारी सादर करण्यात आला. यात विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी थेट कोणत्याही तरतुदी केलेल्या नाहीत. तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून अनेकदा चीन आणि अमेरिकासारखे देश पुढे असतात, याचे कारण मुख्य आहे की, शिक्षण आरोग्य आणि तंत्रज्ञानासाठी हे देश त्यांच्या जीडीपीच्या ५ टक्के खर्च करतात. त्यामुळे त्यांना तेवढे आर्थिक पाठबळ मिळते आणि तंत्रज्ञानात प्रगतीही झपाट्याने होते. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात विज्ञान आणि तंत्रज्ञानाबाबत पाहिजे तशी तरतूद झालेली नाही, असे मत माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्रे स्थापन करण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणा केली आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट 'एआय' संशोधन, विकास आणि नवोपक्रमाला चालना देणे आहे, ज्यामुळे भारताला जागतिक 'एआय' तंत्रज्ञान क्षेत्रात स्थान मिळेल. त्याचप्रमाणे भविष्यात एआयविषयीची तरतूद वाढली पाहिजे, जेणेकरून युवकांचे रोजगार हिरावून घेतले जाणार नाहीत. याचबरोबर सरकार उद्योग, स्टार्टअप आणि शैक्षणिक संस्थांना पाठिंबा देण्यासाठी प्रगत एआय हब स्थापन करण्याची योजना आखत असल्याचेदेखील या अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे.

विशेषतः यात कॉम्प्युटर हार्डवेअर, एलईडी आणि एलसीडी यांवर असलेली कस्टम ड्यूटी कमी करण्यात आली असून, या वस्तू स्वस्त होतील. लिथियम आयर्न हे मोबाइल फोन आणि कॉम्प्युटरसाठी बॅटरी तयार करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यावरील कस्टम ड्यूटी कमी करण्यात आली असल्याने मोबाइल आणि कॉम्प्युटर यांच्या किमती कमी झाल्याने उद्योगाला नक्कीच याची मदत होईल.

'उडान'मुळे विकेंद्रीकरणाला बळ

सध्या आयटी क्षेत्र देशातील प्रमुख आठ शहरांमध्ये कार्यरत आहे. त्यामुळे या शहरांचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी 'उडान'सारख्या योजनेमुळे पाठबळ मिळणार आहे; कारण इतर शहरांमध्ये नवीन विमानतळे विकसित करण्यासाठी सरकारचा भर असणार आहे. त्यामुळे इतर शहरांमध्येही आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ साकारले तर आंतरराष्ट्रीय केंद्रे सुरू होऊन त्या भागातील युवकांना रोजगार मिळेल. २०२५च्या अर्थसंकल्पात विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे, ज्यामध्ये मेक इन इंडिया आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन मिळेल.

तंत्रज्ञानासाठी पाहिजे तशी तरतूद केलेली नाही, असे स्पष्टपणे दिसत आहे. सध्या भारतात मोठमोठ्या कंपन्यांची जीसीसी सेंटर उभारली जात आहे. यंदा तरतूद केली असल्याने भारतात अशा कंपन्यांचा ओघ वाढला आहे. यामुळे रोजगार निर्मितीसाठी मदत होईल. कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रासाठी ५०० कोटी रुपयांनी तरतूद पुरेशी नाही. त्यामुळे यात अधिक काम होणे गरजेचे आहे. -अतुल कहाते, संगणक तज्ज्ञ

देशात पाच मोठे कौशल्य केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. या योजनेमुळे आपल्या तरुणांना उद्योगाशी संबंधित विविध कौशल्यांचे धडे मिळू शकणार आहेत. याला तरुणांना लाभच होणार आहे. 'मेक फॉर इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड मॅन्युफॅक्चरिंग'ला पाठिंबा देण्यासाठी जागतिक भागीदारीसह ही केंद्रे स्थापन केली जाणार आहे. डिझाइन, प्रशिक्षण, कौशल्य आणि मूल्यांकन यांचा यात समावेश असेल. -डॉ. दीपक शिकारपूर, ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ

टॅग्स :Budget 2025अर्थसंकल्प २०२५Budgetअर्थसंकल्प 2024technologyतंत्रज्ञानCentral Governmentकेंद्र सरकार