शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2022: आयुष्मान योजनेची व्याप्ती वाढणार? मध्यम वर्गीयांना मोठी भेट देण्याची तयारी, कोणाला मिळणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 08:57 IST

Ayushman Bharat Scheme: सर्व ५५ कोटी गरीबांना आयुष्मान कार्ड दिले जाणार होते. मात्र या योजनेच्या अंमलबजावणीला साडेतीन वर्षे उलटल्यानंतरही केवळ 17.35 कोटी आयुष्मान कार्ड बनले आहेत.

देशातील ५५ कोटी गरीबांसाठी सुरु करण्यात आलेली आयुष्मान भारत योजनेचा लाभ लवकरच मध्यमवर्गाला देखील मिळण्याची शक्यता आहे. सरकारने याची तयारी सुरु केली आहे. उद्या अर्थसंकल्पात यांची घोषणा होण्याची शक्यता आहे. आयुष्मान योजनेतून १०.७४ कोटी कुटुंबांना आरोग्य सुविधा, मोफत कॅशलेस उपचाराची सेवा देण्यात आली आहे. 

केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली आहे. मध्यमवर्गाला देखील आयुष्मान भारतमध्ये सहभागी करून घेण्यात यावे, यावर काही महिन्यांपूर्वीच विचारविमर्श सुरु झाला होता. मध्यमवर्गाला या योजनेत आणण्यासाठी अनेक प्रकारच्या पर्यायांवर विचार केला जात आहे. 

कोणाला मिळणार लाभ...यामध्ये वार्षिक उत्पन्न मर्यादा, संगठीत, असंगठीत क्षेत्रातील कर्मचारी असे पर्याय असू शकतात. मध्यमवर्गामध्ये खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना विशेष प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. यासाठी आपल्या कर्माचाऱ्यांना आयुष्मान भारतमध्ये रजिस्टर करण्यासाठी खासगी कंपन्यांना अधिकार दिले जाऊ शकतात. असे झाल्यास १५००० रुपयांपर्यंत पगार असलेल्यांना ईएसआयसी आणि त्यापेक्षा वरील २५ ते ३० हजार पगार असलेल्यांना आयुष्मान भारत योजनेतून आरोग्य उपचार मिळू शकतात. 

प्रिमिअम भरावा लागणारखासगी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा देतात. काही कंपन्या यासाठी कर्मचाऱ्यांकडून पैसेही घेतात. आयुष्मानसाठी यापेक्षा कमी प्रमिअम या कंपन्यांना द्यावा लागण्याची शक्यता आहे. असे झाल्यास कर्माचाऱ्यांना थेट आयुष्मान योजनेचा लाभ घेण्याचा देखील पर्याय मिळू शकते. नुकतेच गृह मंत्रालयाच्या पुढाकाराने केंद्रीय निमलष्करी दलांना आयुष्मान भारत योजनेशी जोडण्यात आले आहे आणि तेथे कार्यरत असलेल्या सर्व सैनिकांना आयुष्मान कार्ड दिले जात आहे. मध्यमवर्गीयांना आयुष्मान भारतशी जोडण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल असल्याचे सांगितले जात आहे.

का दिले जाणार...सर्व ५५ कोटी गरीबांना आयुष्मान कार्ड दिले जाणार होते. मात्र या योजनेच्या अंमलबजावणीला साडेतीन वर्षे उलटल्यानंतरही केवळ 17.35 कोटी आयुष्मान कार्ड बनले आहेत. कोरोनामुळे आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर मोठा भार पडल्यानंतर, सरकार आता लाभार्थी शोधण्यासाठी आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर आयुष्मान कार्ड देण्याची मोहीम राबवण्याच्या तयारीत आहे. 

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारतBudgetअर्थसंकल्प