शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

Budget 2017 - ग्रामीण भागाला होणारे 10 फायदे

By admin | Updated: February 1, 2017 13:19 IST

शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी दहा लाख कोटींची तरतूद अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 1 - नोटाबंदीची सर्वाधिक झळ बसलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने अर्थसंकल्पातून भरभरून तरतुदी केल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी दहा लाख कोटींची तरतूद अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याजदरातही कपात करण्यात आली आहे. नव्या आर्थिक वर्षात देशातील कृषिक्षेत्राचा विकासदर 4.1 टक्के इतका असेल. शेतक-यानी घेतलेल्या कर्जावरील व्याजदरात कपात करण्यात आली आहे.  शेतक-यांच्या कर्जासाठी १० लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शेतक-यांचे उत्पन्न पाचवर्षात दुप्पट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. असे जेटली यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले. 

अर्थसंकल्पात पीक विम्यासाठी 9 हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच गेल्या वर्षात मान्सून चांगला झाल्याने यावर्षी चांगली पिके येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

 

-  2017-18 आर्थिक वर्षात केंद्र सरकारने ग्रामीण क्षेत्रासाठी 1 लाख 87 हजार 200 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, प्रथमच इतकी विक्रमी तरतूद करण्यात आली असून, मागच्यावर्षीच्या तुलनेत ग्रामीण भागासाठी 24 टक्क्यांनी तरतूद वाढवण्यात आली आहे. 
 
- ग्रामीण भागात रोजगार निर्मितीचा स्त्रोत असलेल्या मनरेगा योजनेसाठी यंदा 48 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मागच्यावर्षीच्या तुलनेत मनरेगासाठी 9500 कोटींनी तरतूद वाढवण्यात आली आहे. मागच्यावर्षी 38500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. 
 
- मनरेगामध्ये महिलांचा सहभाग 55 टक्क्यांनी वाढला आहे. 
 
- अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला सशक्तीकरणासाठी महिला शक्ती केंद्र उभारणार. 
 
 
- 1 मे 2018 पर्यंत देशातील सर्व ग्रामीण भागांमध्ये वीज पोहोचणार. 
 
-  बेघर आणि कच्चा घरात राहणा-यांसाठी 2019 पर्यंत 1 कोटी घर बांधणीचे लक्ष्य. 
 
- प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 15 हजार कोटीवरुन तरतूद 23 हजार कोटी करण्यात आली. 
 
- 2016-17 मध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत दिवसाला 133 किमी रस्ते बांधणी सुरु आहे. 2011-14 मध्ये हेच प्रमाण 73 किमी होते. 
 
 

 

  •