शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

अश्विनी वैष्णव यांच्या बैठकीत अधिकाऱ्याला लागली डुलकी; एका झटक्यात गेली नोकरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 18:10 IST

Ashwini Vaishnaw : केंद्रीय मंत्रिमंडळाने बीएसएनएलची स्थिती सुधारण्यासाठी 1.64 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे.

नवी दिल्ली : दूरसंचारच्या बैठकीत एक विचित्र प्रकार घडल्याचे समोर आले. केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या बैठकीत बीएसएनएलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला डुलकी लागली. यानंतर त्यांना बैठकीतून बाहेर काढण्यात आले आणि स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) घेण्यास सांगण्यात आले. ज्या बैठकीत अधिकाऱ्याला झोप लागली. त्या बैठकीत बीएसएनएलला पुन्हा रुळावर आणण्यासाठी महत्त्वाची चर्चा झाली. 

केंद्रीय मंत्रिमंडळाने बीएसएनएलची स्थिती सुधारण्यासाठी 1.64 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे. दरम्यान, हा प्रकल्प दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खूप गांभीर्याने घेतला होता. ऑगस्टमध्ये सीजीएम (CGM) स्तरीय बैठक घेतली आणि कर्मचाऱ्यांना एकतर चांगली कामगिरी करून बीएसएनएलचा कायापालट करा अथवा व्हीआरएस घ्या, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते. या बैठकीतही अश्विनी वैष्णव महत्त्वाची चर्चा करत होते. त्यावेळी एका सीजीएमला झोप लागली.

सीजीएमला डुलकी लागल्याचे अश्विनी वैष्णव यांनी पाहिले आणि ते संतापले. यानंतर त्यांनी सीजीएमला ताबडतोब बैठकीतून बाहेर जाण्यास सांगितले. एवढेच नाही तर त्यांना व्हीआरएस घेण्यासही सांगण्यात आले. दरम्यान, डुलकी लागलेल्या सीजीएमचे व्हीआरएसही मंजूर झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे अधिकारी बंगळुरू येथे तैनात होते. त्यांच्याकडे गुणवत्ता, हमी आणि तपासणीची जबाबदारी होती.

कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाहीया संदर्भात चर्चा करण्यासाठी बीएसएनएलला मेलही पाठवण्यात आला आहे, ज्याचे उत्तर अद्याप आलेले नाही. देशातील दूरसंचाराची स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार गंभीर असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. तसेच अश्विनी वैष्णव यांनी बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले होते की, कर्मचाऱ्यांनी सरकारी दृष्टिकोन बदलावा. जर ते काम करू शकत नसतील तर लगेच त्यांनी नोकरी सोडून व्हीआरएस घ्यावा. जरी त्यांनी व्हीआरएस घेतला नाही, तर सरकारजवळ सक्तीची निवृत्ती हा मार्ग खुला आहे. कामात सरकारी वृत्ती अजिबात खपवून घेतली जाणार नाही.

बीएसएनएलला 69 हजार कोटी रुपयांचे मदत पॅकेज सरकारने बीएसएनएलच्या उलाढालीसाठी 1.64 लाख कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे ते अधिक चांगले बनवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. 2019 मध्ये बीएसएनएलला 69 हजार कोटी रुपयांचे मदत पॅकेज देण्यात आले होते. यानंतर, 4-जीसाठी समर्थन देण्यात आले. त्यात सुधारणा करण्यासाठी सरकारने भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेडचे ​​विलीनीकरणही केले, असे अश्विनी वैष्णव यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले होते.

टॅग्स :Ashwini Vaishnawअश्विनी वैष्णव