शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बीएसएनएल विभागाचा भोंगळ कारभार

By admin | Updated: August 23, 2015 20:40 IST

महान : स्थानिक महान येथे अनेक वर्षापासून भारत संचार निगम लिमिटेडचे मोठे टॉवर उभारलेले असून याच टॉवरच्या माध्यमातून महान येथील भारतीय स्टेट बँक, जिल्हा मध्यवर्ती बँकेसह दोन सेतू केंद्र व अन्य ग्राहकांना दूरसंचार सेवा मिळून त्यांचे कामकाज चालते. परंतु दीड महिन्यापासून बीएसएनएलची इंटरनेट सेवा व्यवस्थित मिळत नसल्याने याचा फटका दूरसंचारच्या ग्राहकांना व विशेषत: शेतकर्‍यांना बसत आहे. विद्युत पुरवठा बंद झाल्यावर महान येथील बीएसएनएलची नेट सेवा लगेच बंद पडते. वीजपुरवठा सुरू झाल्यावर २० मिनिटे झाल्यानंतरच इंटरनेटची सेवा सुरू होते.

महान : स्थानिक महान येथे अनेक वर्षापासून भारत संचार निगम लिमिटेडचे मोठे टॉवर उभारलेले असून याच टॉवरच्या माध्यमातून महान येथील भारतीय स्टेट बँक, जिल्हा मध्यवर्ती बँकेसह दोन सेतू केंद्र व अन्य ग्राहकांना दूरसंचार सेवा मिळून त्यांचे कामकाज चालते. परंतु दीड महिन्यापासून बीएसएनएलची इंटरनेट सेवा व्यवस्थित मिळत नसल्याने याचा फटका दूरसंचारच्या ग्राहकांना व विशेषत: शेतकर्‍यांना बसत आहे. विद्युत पुरवठा बंद झाल्यावर महान येथील बीएसएनएलची नेट सेवा लगेच बंद पडते. वीजपुरवठा सुरू झाल्यावर २० मिनिटे झाल्यानंतरच इंटरनेटची सेवा सुरू होते.
टॉवरस्थित बॅटरी व्यवस्िति नसल्यामुळे नेट सेवा लगेच सुरू करण्यासाठी अडथळा निर्माण होत असल्याचे सांगितले जाते. इंटरनेटची सुविधा व्यवस्थित मिळत नसल्याने बँकेत कनेक्टीव्हिटी मिळत नाही. त्या कारणाने बँक खातेदारांना ताटकळत बसून त्रास सहन करावा लागते. शेतीसंबंधित योजनांसाठी आवश्यक असणारा सातबारा, ८ (अ), उत्पन्नाचा दाखला व अन्य कागदपत्रे काढण्यासाठी इंटरनेट सुरू असणे अत्यंत आवश्यक असते. परंतु इंटरनेटच्या असुविधेमुळे शेतकर्‍यांनासुद्धा सेतू केंद्रात बसून इंटरनेट सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागते तर बीएसएनएल मोबाइलधारकांच्या मोबाइलमध्ये रेंज राहत नसल्यामुळे त्यांनादेखील त्रास सहन करावा लागतो. इंटरनेट सुविधेबात संबंधितांना विचारले असता त्यांचेकडून उडवाउडवीची उत्तरे मिळतात. महान हे बार्शीटाकळी तालुक्यातील जास्त लोकसंख्येचे मोठे गाव असून महान गावाला जोडलेली अनेक लहान-मोठी खेडी, गावे जोडली असल्याने शेतकर्‍यांना महत्त्वाची कागदपत्रे काढण्यासाठी महान येथे यावे लागते. परंतु बीएसएनएलच्या भोंगळ कारभारामुळे त्या शेतकर्‍यांना नाइलाजास्तव बार्शीटाकळीला जाऊन कागदपत्रे आणावी लागत आहेत.
***कोट***
महानस्थित टॉवरजवळ बॅटरीचे दोन सेट आहेत. त्यामधील एक सेट चालू आहे. या बॅटरीचा प्रयोग दोन वेळा केला आहे. परंतु, महान येथे सतत सहा तासापर्यंत वीज भारनियमन घेण्यात येत असल्यामुळे बॅटरीमधील सेल जळतात. म्हणून बॅटरी काम करत नाही. वीजप्रवाह खंडित होताच ऑपरेटर जनरेटर सुरू असतो. परंतु, चार दिवस रात्री ३.३० ते सकाळी ९.३० वाजेपर्यंत वीज भारनियमन असल्याने ऑपरेटर रात्रीच्यावेळी जनरेटर कसं सुरू करणार, हा प्रश्नच आहे. वीज भारनियमन सहा तासाऐवजी कमी तासाचे केल्यास ही समस्या मार्गी लागेल व मेन्टेनेसचे काम चालू होऊ शकते.
- एस. ए. वरांगे, तंत्रज्ञ बीएसएनएल, बार्शीटाकळी
(***पुढील मजकूर जोड १ वर***)