शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
3
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
4
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
5
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
6
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
7
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
8
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
9
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
10
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
11
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
12
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
13
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
14
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
15
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
16
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
17
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
18
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
19
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
20
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?

बीएसएनएल विभागाचा भोंगळ कारभार

By admin | Updated: August 23, 2015 20:40 IST

महान : स्थानिक महान येथे अनेक वर्षापासून भारत संचार निगम लिमिटेडचे मोठे टॉवर उभारलेले असून याच टॉवरच्या माध्यमातून महान येथील भारतीय स्टेट बँक, जिल्हा मध्यवर्ती बँकेसह दोन सेतू केंद्र व अन्य ग्राहकांना दूरसंचार सेवा मिळून त्यांचे कामकाज चालते. परंतु दीड महिन्यापासून बीएसएनएलची इंटरनेट सेवा व्यवस्थित मिळत नसल्याने याचा फटका दूरसंचारच्या ग्राहकांना व विशेषत: शेतकर्‍यांना बसत आहे. विद्युत पुरवठा बंद झाल्यावर महान येथील बीएसएनएलची नेट सेवा लगेच बंद पडते. वीजपुरवठा सुरू झाल्यावर २० मिनिटे झाल्यानंतरच इंटरनेटची सेवा सुरू होते.

महान : स्थानिक महान येथे अनेक वर्षापासून भारत संचार निगम लिमिटेडचे मोठे टॉवर उभारलेले असून याच टॉवरच्या माध्यमातून महान येथील भारतीय स्टेट बँक, जिल्हा मध्यवर्ती बँकेसह दोन सेतू केंद्र व अन्य ग्राहकांना दूरसंचार सेवा मिळून त्यांचे कामकाज चालते. परंतु दीड महिन्यापासून बीएसएनएलची इंटरनेट सेवा व्यवस्थित मिळत नसल्याने याचा फटका दूरसंचारच्या ग्राहकांना व विशेषत: शेतकर्‍यांना बसत आहे. विद्युत पुरवठा बंद झाल्यावर महान येथील बीएसएनएलची नेट सेवा लगेच बंद पडते. वीजपुरवठा सुरू झाल्यावर २० मिनिटे झाल्यानंतरच इंटरनेटची सेवा सुरू होते.
टॉवरस्थित बॅटरी व्यवस्िति नसल्यामुळे नेट सेवा लगेच सुरू करण्यासाठी अडथळा निर्माण होत असल्याचे सांगितले जाते. इंटरनेटची सुविधा व्यवस्थित मिळत नसल्याने बँकेत कनेक्टीव्हिटी मिळत नाही. त्या कारणाने बँक खातेदारांना ताटकळत बसून त्रास सहन करावा लागते. शेतीसंबंधित योजनांसाठी आवश्यक असणारा सातबारा, ८ (अ), उत्पन्नाचा दाखला व अन्य कागदपत्रे काढण्यासाठी इंटरनेट सुरू असणे अत्यंत आवश्यक असते. परंतु इंटरनेटच्या असुविधेमुळे शेतकर्‍यांनासुद्धा सेतू केंद्रात बसून इंटरनेट सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागते तर बीएसएनएल मोबाइलधारकांच्या मोबाइलमध्ये रेंज राहत नसल्यामुळे त्यांनादेखील त्रास सहन करावा लागतो. इंटरनेट सुविधेबात संबंधितांना विचारले असता त्यांचेकडून उडवाउडवीची उत्तरे मिळतात. महान हे बार्शीटाकळी तालुक्यातील जास्त लोकसंख्येचे मोठे गाव असून महान गावाला जोडलेली अनेक लहान-मोठी खेडी, गावे जोडली असल्याने शेतकर्‍यांना महत्त्वाची कागदपत्रे काढण्यासाठी महान येथे यावे लागते. परंतु बीएसएनएलच्या भोंगळ कारभारामुळे त्या शेतकर्‍यांना नाइलाजास्तव बार्शीटाकळीला जाऊन कागदपत्रे आणावी लागत आहेत.
***कोट***
महानस्थित टॉवरजवळ बॅटरीचे दोन सेट आहेत. त्यामधील एक सेट चालू आहे. या बॅटरीचा प्रयोग दोन वेळा केला आहे. परंतु, महान येथे सतत सहा तासापर्यंत वीज भारनियमन घेण्यात येत असल्यामुळे बॅटरीमधील सेल जळतात. म्हणून बॅटरी काम करत नाही. वीजप्रवाह खंडित होताच ऑपरेटर जनरेटर सुरू असतो. परंतु, चार दिवस रात्री ३.३० ते सकाळी ९.३० वाजेपर्यंत वीज भारनियमन असल्याने ऑपरेटर रात्रीच्यावेळी जनरेटर कसं सुरू करणार, हा प्रश्नच आहे. वीज भारनियमन सहा तासाऐवजी कमी तासाचे केल्यास ही समस्या मार्गी लागेल व मेन्टेनेसचे काम चालू होऊ शकते.
- एस. ए. वरांगे, तंत्रज्ञ बीएसएनएल, बार्शीटाकळी
(***पुढील मजकूर जोड १ वर***)