शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

बीएसएनएल विभागाचा भोंगळ कारभार

By admin | Updated: August 23, 2015 20:40 IST

महान : स्थानिक महान येथे अनेक वर्षापासून भारत संचार निगम लिमिटेडचे मोठे टॉवर उभारलेले असून याच टॉवरच्या माध्यमातून महान येथील भारतीय स्टेट बँक, जिल्हा मध्यवर्ती बँकेसह दोन सेतू केंद्र व अन्य ग्राहकांना दूरसंचार सेवा मिळून त्यांचे कामकाज चालते. परंतु दीड महिन्यापासून बीएसएनएलची इंटरनेट सेवा व्यवस्थित मिळत नसल्याने याचा फटका दूरसंचारच्या ग्राहकांना व विशेषत: शेतकर्‍यांना बसत आहे. विद्युत पुरवठा बंद झाल्यावर महान येथील बीएसएनएलची नेट सेवा लगेच बंद पडते. वीजपुरवठा सुरू झाल्यावर २० मिनिटे झाल्यानंतरच इंटरनेटची सेवा सुरू होते.

महान : स्थानिक महान येथे अनेक वर्षापासून भारत संचार निगम लिमिटेडचे मोठे टॉवर उभारलेले असून याच टॉवरच्या माध्यमातून महान येथील भारतीय स्टेट बँक, जिल्हा मध्यवर्ती बँकेसह दोन सेतू केंद्र व अन्य ग्राहकांना दूरसंचार सेवा मिळून त्यांचे कामकाज चालते. परंतु दीड महिन्यापासून बीएसएनएलची इंटरनेट सेवा व्यवस्थित मिळत नसल्याने याचा फटका दूरसंचारच्या ग्राहकांना व विशेषत: शेतकर्‍यांना बसत आहे. विद्युत पुरवठा बंद झाल्यावर महान येथील बीएसएनएलची नेट सेवा लगेच बंद पडते. वीजपुरवठा सुरू झाल्यावर २० मिनिटे झाल्यानंतरच इंटरनेटची सेवा सुरू होते.
टॉवरस्थित बॅटरी व्यवस्िति नसल्यामुळे नेट सेवा लगेच सुरू करण्यासाठी अडथळा निर्माण होत असल्याचे सांगितले जाते. इंटरनेटची सुविधा व्यवस्थित मिळत नसल्याने बँकेत कनेक्टीव्हिटी मिळत नाही. त्या कारणाने बँक खातेदारांना ताटकळत बसून त्रास सहन करावा लागते. शेतीसंबंधित योजनांसाठी आवश्यक असणारा सातबारा, ८ (अ), उत्पन्नाचा दाखला व अन्य कागदपत्रे काढण्यासाठी इंटरनेट सुरू असणे अत्यंत आवश्यक असते. परंतु इंटरनेटच्या असुविधेमुळे शेतकर्‍यांनासुद्धा सेतू केंद्रात बसून इंटरनेट सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागते तर बीएसएनएल मोबाइलधारकांच्या मोबाइलमध्ये रेंज राहत नसल्यामुळे त्यांनादेखील त्रास सहन करावा लागतो. इंटरनेट सुविधेबात संबंधितांना विचारले असता त्यांचेकडून उडवाउडवीची उत्तरे मिळतात. महान हे बार्शीटाकळी तालुक्यातील जास्त लोकसंख्येचे मोठे गाव असून महान गावाला जोडलेली अनेक लहान-मोठी खेडी, गावे जोडली असल्याने शेतकर्‍यांना महत्त्वाची कागदपत्रे काढण्यासाठी महान येथे यावे लागते. परंतु बीएसएनएलच्या भोंगळ कारभारामुळे त्या शेतकर्‍यांना नाइलाजास्तव बार्शीटाकळीला जाऊन कागदपत्रे आणावी लागत आहेत.
***कोट***
महानस्थित टॉवरजवळ बॅटरीचे दोन सेट आहेत. त्यामधील एक सेट चालू आहे. या बॅटरीचा प्रयोग दोन वेळा केला आहे. परंतु, महान येथे सतत सहा तासापर्यंत वीज भारनियमन घेण्यात येत असल्यामुळे बॅटरीमधील सेल जळतात. म्हणून बॅटरी काम करत नाही. वीजप्रवाह खंडित होताच ऑपरेटर जनरेटर सुरू असतो. परंतु, चार दिवस रात्री ३.३० ते सकाळी ९.३० वाजेपर्यंत वीज भारनियमन असल्याने ऑपरेटर रात्रीच्यावेळी जनरेटर कसं सुरू करणार, हा प्रश्नच आहे. वीज भारनियमन सहा तासाऐवजी कमी तासाचे केल्यास ही समस्या मार्गी लागेल व मेन्टेनेसचे काम चालू होऊ शकते.
- एस. ए. वरांगे, तंत्रज्ञ बीएसएनएल, बार्शीटाकळी
(***पुढील मजकूर जोड १ वर***)