शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

नापाक गोळीबाराला बीएसएफचे चोख प्रत्युत्तर, १५ पाकिस्तानी सैनिक ठार

By admin | Updated: October 28, 2016 16:57 IST

बीएसएफकडून पाकिस्ताला दिलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत 15 पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून रेंजर्सचे 2 ते 3 तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत

ऑनलाइन लोकमत

जम्मू काश्मीर, दि. 28 - आंतरराष्ट्रीय सीमारेषा आणि नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्री शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करुन बीएसएफ चौक्यांवर जोरदार हल्ला चढवला. पाकिस्तानच्या या नापाक गोळीबाराला बीएसएफनेही सडतोड प्रत्युत्तर दिले. बीएसएफने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत १५ पाकिस्तानी रेंजर्स ठार झाल्याची माहिती बीएसएफने दिली आहे. 

पाकिस्तानने नौशेरा, सुंदरबनी आणि पल्लनवाला सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात तोफाचा भडीमार करुन गोळीबार केला. गेल्या 12 तासांमध्ये पाकिस्तानकडून सहा वेळा शस्त्रसंधी उल्लंघन करण्यात आलं आहे. भारतीय लष्करानेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं असून बीएसएफकडून पाकिस्तानच्या शक्करगढ भागात करण्यात आलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानच खूप नुकसान झालं आहे.

पाकिस्तानचे 15 जवान ठार झाले असल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक अरुण कुमार यांनी दिली आहे. तसंच पाकिस्तानी रेंजर्सचे 2 ते 3 तळ उद्ध्वस्त केल्याचीही माहिती मिळाली आहे.

(भारतीय चौक्यांवर पाकिस्तानचा भ्याड हल्ला)
 

सर्जिकल स्ट्राइक्सनंतर चवताळलेल्या पाकिस्तानने सीमेपलिकडून सातत्याने गोळीबार सुरू ठेवला असून, गुरुवारीही अंधार पडताच भ्याड पाक सैनिकांनी भारतीय चौक्यांवर जोरदार बॉम्बवर्षाव व गोळीबार केला. हल्ल्याला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यात अनेक पाक रेंजर्स जखमी झाले असून पाकच्या अनेक गावांमध्ये आग लागल्याचे वृत्त आहे. गोळीबारात पाच भारतीय जवान जखमी झाले आहेत. त्यांना हवाईमार्गे इस्पितळात हलविण्यात आले.
 
(पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन सुरुच, एक जवान शहीद)
(अंधार पडताच पाकचा भारतीय चौक्यांवर हल्ला)
 
तंगधार, अखनूर आणि मेंढर या ठिकाणांवर पाक रेंजर्सनी जोरदार गोळीबार केला. गोळीबारामुळे सीमेवरील गावक-यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांना फोन करून पाकला जोरदार प्रत्युत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनाही नियंत्रण रेषेवरील हल्ल्याबाबत माहिती देण्यात आली आहे.
 

पाकिस्तानी सैनिक नियंत्रण रेषेच्या अगदी जवळ दबा धरून बसले. त्यांच्याकडून सातत्याने मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू होता. तसेच ग्रेनेड अटॅक आणि मोर्टारनेही हल्ला केला जात होता. भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे अनेक सैनिक जखमी झाल्याचे वा ठार झाल्याची शंका आहे. त्यांच्यासाठी सीमेपलिकडे मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका असल्याचे दिसून आले आहे. भारताचा सर्जिकल स्ट्राईक्सनंतर पाकने ५५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
 

गेल्या आठवड्यात पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या फायरिंगमध्ये एका सहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला असून 30 ग्रामस्थ जखमी झाले आहेत.