शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नापाक गोळीबाराला बीएसएफचे चोख प्रत्युत्तर, १५ पाकिस्तानी सैनिक ठार

By admin | Updated: October 28, 2016 16:57 IST

बीएसएफकडून पाकिस्ताला दिलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत 15 पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून रेंजर्सचे 2 ते 3 तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत

ऑनलाइन लोकमत

जम्मू काश्मीर, दि. 28 - आंतरराष्ट्रीय सीमारेषा आणि नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्री शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करुन बीएसएफ चौक्यांवर जोरदार हल्ला चढवला. पाकिस्तानच्या या नापाक गोळीबाराला बीएसएफनेही सडतोड प्रत्युत्तर दिले. बीएसएफने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत १५ पाकिस्तानी रेंजर्स ठार झाल्याची माहिती बीएसएफने दिली आहे. 

पाकिस्तानने नौशेरा, सुंदरबनी आणि पल्लनवाला सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात तोफाचा भडीमार करुन गोळीबार केला. गेल्या 12 तासांमध्ये पाकिस्तानकडून सहा वेळा शस्त्रसंधी उल्लंघन करण्यात आलं आहे. भारतीय लष्करानेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं असून बीएसएफकडून पाकिस्तानच्या शक्करगढ भागात करण्यात आलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानच खूप नुकसान झालं आहे.

पाकिस्तानचे 15 जवान ठार झाले असल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक अरुण कुमार यांनी दिली आहे. तसंच पाकिस्तानी रेंजर्सचे 2 ते 3 तळ उद्ध्वस्त केल्याचीही माहिती मिळाली आहे.

(भारतीय चौक्यांवर पाकिस्तानचा भ्याड हल्ला)
 

सर्जिकल स्ट्राइक्सनंतर चवताळलेल्या पाकिस्तानने सीमेपलिकडून सातत्याने गोळीबार सुरू ठेवला असून, गुरुवारीही अंधार पडताच भ्याड पाक सैनिकांनी भारतीय चौक्यांवर जोरदार बॉम्बवर्षाव व गोळीबार केला. हल्ल्याला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यात अनेक पाक रेंजर्स जखमी झाले असून पाकच्या अनेक गावांमध्ये आग लागल्याचे वृत्त आहे. गोळीबारात पाच भारतीय जवान जखमी झाले आहेत. त्यांना हवाईमार्गे इस्पितळात हलविण्यात आले.
 
(पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन सुरुच, एक जवान शहीद)
(अंधार पडताच पाकचा भारतीय चौक्यांवर हल्ला)
 
तंगधार, अखनूर आणि मेंढर या ठिकाणांवर पाक रेंजर्सनी जोरदार गोळीबार केला. गोळीबारामुळे सीमेवरील गावक-यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांना फोन करून पाकला जोरदार प्रत्युत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनाही नियंत्रण रेषेवरील हल्ल्याबाबत माहिती देण्यात आली आहे.
 

पाकिस्तानी सैनिक नियंत्रण रेषेच्या अगदी जवळ दबा धरून बसले. त्यांच्याकडून सातत्याने मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू होता. तसेच ग्रेनेड अटॅक आणि मोर्टारनेही हल्ला केला जात होता. भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे अनेक सैनिक जखमी झाल्याचे वा ठार झाल्याची शंका आहे. त्यांच्यासाठी सीमेपलिकडे मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका असल्याचे दिसून आले आहे. भारताचा सर्जिकल स्ट्राईक्सनंतर पाकने ५५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
 

गेल्या आठवड्यात पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या फायरिंगमध्ये एका सहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला असून 30 ग्रामस्थ जखमी झाले आहेत.