शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

नापाक गोळीबाराला बीएसएफचे चोख प्रत्युत्तर, १५ पाकिस्तानी सैनिक ठार

By admin | Updated: October 28, 2016 16:57 IST

बीएसएफकडून पाकिस्ताला दिलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत 15 पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून रेंजर्सचे 2 ते 3 तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत

ऑनलाइन लोकमत

जम्मू काश्मीर, दि. 28 - आंतरराष्ट्रीय सीमारेषा आणि नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्री शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करुन बीएसएफ चौक्यांवर जोरदार हल्ला चढवला. पाकिस्तानच्या या नापाक गोळीबाराला बीएसएफनेही सडतोड प्रत्युत्तर दिले. बीएसएफने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत १५ पाकिस्तानी रेंजर्स ठार झाल्याची माहिती बीएसएफने दिली आहे. 

पाकिस्तानने नौशेरा, सुंदरबनी आणि पल्लनवाला सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात तोफाचा भडीमार करुन गोळीबार केला. गेल्या 12 तासांमध्ये पाकिस्तानकडून सहा वेळा शस्त्रसंधी उल्लंघन करण्यात आलं आहे. भारतीय लष्करानेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं असून बीएसएफकडून पाकिस्तानच्या शक्करगढ भागात करण्यात आलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानच खूप नुकसान झालं आहे.

पाकिस्तानचे 15 जवान ठार झाले असल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक अरुण कुमार यांनी दिली आहे. तसंच पाकिस्तानी रेंजर्सचे 2 ते 3 तळ उद्ध्वस्त केल्याचीही माहिती मिळाली आहे.

(भारतीय चौक्यांवर पाकिस्तानचा भ्याड हल्ला)
 

सर्जिकल स्ट्राइक्सनंतर चवताळलेल्या पाकिस्तानने सीमेपलिकडून सातत्याने गोळीबार सुरू ठेवला असून, गुरुवारीही अंधार पडताच भ्याड पाक सैनिकांनी भारतीय चौक्यांवर जोरदार बॉम्बवर्षाव व गोळीबार केला. हल्ल्याला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यात अनेक पाक रेंजर्स जखमी झाले असून पाकच्या अनेक गावांमध्ये आग लागल्याचे वृत्त आहे. गोळीबारात पाच भारतीय जवान जखमी झाले आहेत. त्यांना हवाईमार्गे इस्पितळात हलविण्यात आले.
 
(पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन सुरुच, एक जवान शहीद)
(अंधार पडताच पाकचा भारतीय चौक्यांवर हल्ला)
 
तंगधार, अखनूर आणि मेंढर या ठिकाणांवर पाक रेंजर्सनी जोरदार गोळीबार केला. गोळीबारामुळे सीमेवरील गावक-यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांना फोन करून पाकला जोरदार प्रत्युत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनाही नियंत्रण रेषेवरील हल्ल्याबाबत माहिती देण्यात आली आहे.
 

पाकिस्तानी सैनिक नियंत्रण रेषेच्या अगदी जवळ दबा धरून बसले. त्यांच्याकडून सातत्याने मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू होता. तसेच ग्रेनेड अटॅक आणि मोर्टारनेही हल्ला केला जात होता. भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे अनेक सैनिक जखमी झाल्याचे वा ठार झाल्याची शंका आहे. त्यांच्यासाठी सीमेपलिकडे मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका असल्याचे दिसून आले आहे. भारताचा सर्जिकल स्ट्राईक्सनंतर पाकने ५५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
 

गेल्या आठवड्यात पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या फायरिंगमध्ये एका सहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला असून 30 ग्रामस्थ जखमी झाले आहेत.