शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पुनर्विकासासाठी अनोखी शक्कल; पूरग्रस्त गावांना मिळणार अंबानी, अडाणी आणि टाटांचे नाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 16:08 IST

पूरग्रस्त गावाच्या विकासासाठी कर्नाटक सरकारकडून निधी जमा करण्याचं काम सुरु आहे.

बंगळुरु - पुरामुळे कर्नाटकातील अनेक गावांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बी. एस येडियुरप्पा यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. ज्याची चर्चा सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात सुरु आहे. सीएम येडियुरप्पा यांनी बुधवारी घोषणा केली की, जी कंपनी पूरग्रस्त गावाच्या पुनर्विकासासाठी 10 कोटी रुपये देईल त्या गावाचं नाव कंपनीच्या नावावर ठेवलं जाईल. 

पूरग्रस्त गावाच्या विकासासाठी कर्नाटक सरकारकडून निधी जमा करण्याचं काम सुरु आहे. मुसळधार पावसामुळे कर्नाटकातील जवळपास 22 जिल्ह्यातील  गावांना पुराचा फटका बसला आहे. पुरामुळे 200 गावातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलं. त्यामुळे या सर्व गावांच्या पुनर्विकासाचा प्रश्न कर्नाटक सरकारला पडला आहे. मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी कमीत कमी 60 उद्योगपतींची यासाठी भेट घेतली आहे. 

मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, मदत आणि पुर्नवसनाचं काम करण्यासाठी ज्या गावाला कंपनी पैसे देईल ते गाव कंपनीने दत्तक घेतलं असं मानलं जाईल. आत्तापर्यंत विविध संस्थांकडून मुख्यमंत्र्यांकडे 4 कोटी रुपये मदत प्राप्त झाली आहे. कर्नाटक सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर लोकांनी आता कर्नाटकातील गावांची गावं अंबानी, अडाणी आणि टाटा ठेवली जातील असं म्हटलं आहे. 

कर्नाटकात आलेल्या पुरामुळे आजपर्यंत 61 लोकांचा मृत्यू झाला आहे. पाण्याची पातळी कमी झाली असली तरी अनेक गावांना अद्यापही धोका कायम आहे. एनडीआरएफ आणि लष्कराद्वारे करण्यात येणाऱ्या बचावकार्यात 6 लाख 98 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलं आहे. 

56 हजारपेक्षा अधिक घरांचे नुकसानराज्यात पूरगस्तांसाठी 1 हजार 160 निवारा केंद्र बनविण्यात आली आहेत. चार लाख लोकांना स्वच्छ पाणी, जेवण आणि अन्य सामान देण्याची व्यवस्था केली आहे. सरकारी माहितीनुसार 22 जिल्ह्यातील 103 तालुक्यांना मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराचा फटका बसला आहे. घरांसोबत पिकांचे नुकसान झाले आहे. 4.58 लाख हेक्टर क्षेत्रातील कृषी आणि बागायत शेतीचे नुकसान झाले आहे.  

टॅग्स :Karnatakकर्नाटकfloodपूर