शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

पुनर्विकासासाठी अनोखी शक्कल; पूरग्रस्त गावांना मिळणार अंबानी, अडाणी आणि टाटांचे नाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 16:08 IST

पूरग्रस्त गावाच्या विकासासाठी कर्नाटक सरकारकडून निधी जमा करण्याचं काम सुरु आहे.

बंगळुरु - पुरामुळे कर्नाटकातील अनेक गावांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बी. एस येडियुरप्पा यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. ज्याची चर्चा सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात सुरु आहे. सीएम येडियुरप्पा यांनी बुधवारी घोषणा केली की, जी कंपनी पूरग्रस्त गावाच्या पुनर्विकासासाठी 10 कोटी रुपये देईल त्या गावाचं नाव कंपनीच्या नावावर ठेवलं जाईल. 

पूरग्रस्त गावाच्या विकासासाठी कर्नाटक सरकारकडून निधी जमा करण्याचं काम सुरु आहे. मुसळधार पावसामुळे कर्नाटकातील जवळपास 22 जिल्ह्यातील  गावांना पुराचा फटका बसला आहे. पुरामुळे 200 गावातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलं. त्यामुळे या सर्व गावांच्या पुनर्विकासाचा प्रश्न कर्नाटक सरकारला पडला आहे. मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी कमीत कमी 60 उद्योगपतींची यासाठी भेट घेतली आहे. 

मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, मदत आणि पुर्नवसनाचं काम करण्यासाठी ज्या गावाला कंपनी पैसे देईल ते गाव कंपनीने दत्तक घेतलं असं मानलं जाईल. आत्तापर्यंत विविध संस्थांकडून मुख्यमंत्र्यांकडे 4 कोटी रुपये मदत प्राप्त झाली आहे. कर्नाटक सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर लोकांनी आता कर्नाटकातील गावांची गावं अंबानी, अडाणी आणि टाटा ठेवली जातील असं म्हटलं आहे. 

कर्नाटकात आलेल्या पुरामुळे आजपर्यंत 61 लोकांचा मृत्यू झाला आहे. पाण्याची पातळी कमी झाली असली तरी अनेक गावांना अद्यापही धोका कायम आहे. एनडीआरएफ आणि लष्कराद्वारे करण्यात येणाऱ्या बचावकार्यात 6 लाख 98 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलं आहे. 

56 हजारपेक्षा अधिक घरांचे नुकसानराज्यात पूरगस्तांसाठी 1 हजार 160 निवारा केंद्र बनविण्यात आली आहेत. चार लाख लोकांना स्वच्छ पाणी, जेवण आणि अन्य सामान देण्याची व्यवस्था केली आहे. सरकारी माहितीनुसार 22 जिल्ह्यातील 103 तालुक्यांना मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराचा फटका बसला आहे. घरांसोबत पिकांचे नुकसान झाले आहे. 4.58 लाख हेक्टर क्षेत्रातील कृषी आणि बागायत शेतीचे नुकसान झाले आहे.  

टॅग्स :Karnatakकर्नाटकfloodपूर