शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मोदी सरकारवर सोडलं होतं टीकास्त्र; ब्रिटीश खासदाराला विमानतळावरूनच परत पाठवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 19:02 IST

Debbie Abrahams : डेबी अब्राहम या ब्रिटीश खासदार आणि ऑल पार्टी पार्लियामेंट्री ग्रुप ऑफ काश्मीरच्या अध्यक्षा आहेत

ठळक मुद्देसोमवारी सकाळी 8.50 वाजता डेबी अब्राहम दिल्ली विमानतळावर पोहोचल्या. त्यावेळी त्यांच्या व्हिसा रद्द झाल्याचे सांगण्यात आले.केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर संदर्भात घेतलेल्या निर्णायावर टीका करणाऱ्यांमध्ये डेबी अब्राहम यांचाही समावेश आहे.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटविल्यानंतर जगातील अनेक देशांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. भारताच्या आमंत्रणावरून युरोपियन युनियनच्या काही खासदारांनी जम्मू-काश्मीरलाही भेट दिली. मात्र, सोमवारी ब्रिटनच्या लेबर पार्टीचे खासदार डेबी अब्राहम यांना भारतात येण्यापासून रोखण्याचा निर्णय घेत दिल्लीविमानतळावरून परत पाठविण्यात आले. यावरून ब्रिटिश खासदारांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर प्रश्चचिन्ह उपस्थित केले आहे. 

डेबी अब्राहम या ब्रिटीश खासदार आणि ऑल पार्टी पार्लियामेंट्री ग्रुप ऑफ काश्मीरच्या अध्यक्षा आहेत. सोमवारी सकाळी 8.50 वाजता डेबी अब्राहम दिल्ली विमानतळावर पोहोचल्या. त्यावेळी त्यांच्या व्हिसा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, हा व्हिसा ऑक्टोबर 2020 पर्यंत वैध होता. भारतात प्रवेश रद्द झाल्याप्रकरणी ब्रिटीश खासदार म्हणाल्या, "प्रत्येकाप्रमाणे मी सुद्धा ई-व्हिसासोबत कागदपत्रे दाखवली. मात्र, विमानतळ प्राधिकरणाने नकार दिला. मला सांगण्यात आले की, माझा व्हिसा रद्द झाला आहे आणि माझा पासपोर्ट घेऊन काही काळासाठी निघून गेले."

या वादावर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सुत्रांनी सांगितले की, ब्रिटीश खारदाराचा ई-व्हिसा आधीच रद्द झाला होता. त्यांना त्याबद्दल कळविण्यात आले होते. ज्यावेळी त्या इंदिरा गांधी विमानतळावर आल्या. त्यावेळी त्यांच्याकडे व्हिसा नव्हता.  इतकेच नाही तर ट्विटरवर डेबी अब्राहम ट्विटरवर सुद्धा आपली तक्रार पोस्ट केली आहे. "मी माझ्या भारतीय नागरिकांना भेटायला चालले होते. माझ्यासोबत भारताचा स्टाफ मेंबर होता. मी फक्त मानवी हक्कांसाठी माझा राजकीय आवाज उठविला. मी आपल्या सरकारविरोधात या प्रश्नावर कायमच प्रश्न उपस्थित करेन", असे डेबी अब्राहम यांनी ट्विटरवर म्हटले आहे. 

दरम्यान, केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर संदर्भात घेतलेल्या निर्णायावर टीका करणाऱ्यांमध्ये डेबी अब्राहम यांचाही समावेश आहे. 5 ऑगस्टनंतर त्यांनी अशी अनेक ट्विट केली आहेत, ज्यामध्ये मोदी सरकारच्या काश्मीर धोरणावर प्रश्नचिन्ह आहे. याच मुद्द्यावरून भारतातही अनेक वाद निर्माण झाले. युरोपीय युनियनच्या खासदारांच्या भेटीवर भारतातील राजकीय पक्षांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. 

टॅग्स :delhiदिल्लीAirportविमानतळJammu Kashmirजम्मू-काश्मीरNarendra Modiनरेंद्र मोदी