शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

गर्भवती परिचारिकांना सौदी अरेबियातून परत आणा, उच्च न्यायालयात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 01:22 IST

लॉकडाऊनमुळे सौदी अरेबियात अडकलेल्या ५६ गर्भवती परिचारिकांचा दुसरा किंवा तिसरा महिना सुरू आहे.

नवी दिल्ली : सौदी अरेबियामध्ये अडकून पडलेल्या ५६ भारतीय गर्भवती परिचारिकांना देशात परत आणण्याचे आदेश केंद्रीय परराष्ट्र खात्याला द्यावे, असे आदेश देण्याची विनंती करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. सोमवारी त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.लॉकडाऊनमुळे सौदी अरेबियात अडकलेल्या ५६ गर्भवती परिचारिकांचा दुसरा किंवा तिसरा महिना सुरू आहे. अशात त्यांना उपचार आणि मानसिक तसेच सामाजिक आधाराची गरज आहे. केंद्र सरकारने आपल्या ‘वंदे भारत अभियाना’च्या पुढील टप्प्यात त्यांना सामावून घ्यावे.तातडीच्या उपचाराची गरज असलेल्या घटकाला या अभियानात प्राधान्य द्यायला हवे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. परिचारिकांच्या संयुक्त संघटनांनी मिळून ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली व सोमवारी त्यावर सुनावणी घ्यावी, अशी विनंती केली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. सुभाष चंद्रन बाजू मांडणार आहेत. सौदी अरेबियात अडकलेल्या महिलांना कुटुंबासह राहण्याचा व्हिसा मिळालेला नाही, त्या तिथे एकट्याच राहतात. अशा वेळी त्यांची काळजी घेण्यासाठीही सोबत कुणी नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.19-23 मे या कालावधीत केंद्र सरकारचा वंदे भारत अभियानाचा दुसरा टप्पा निश्चित केला गेला आहे. याच कालावधीत सर्व गर्भवती परिचारिकांना भारतात परत आणावे, याचाही आवर्जून उल्लेख करण्यात आला आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्या