शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

थोडक्यात /सारांश

By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST

भटक्या कुत्र्यांचा त्रास

भटक्या कुत्र्यांचा त्रास
मुंबई : भांडूप पश्चिमेकडील सरदार प्रतापसिंह संकुलात कुत्र्यांची वाढती संख्या रहिवाशांना त्रासदायक ठरत आहेत. परिसरात रात्रपाळीवरून येणार्‍या चाकरमान्यांच्या पाठी कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी लागतात. त्यांच्या हातात असणार्‍या पिशव्या हिसकावतात. पायी चालणार्‍या चाकरमान्यांबरोबर दुचाकी चालकांनाही याचा त्रास होतो.

उंदरांचा उपद्रव
मुंबई : शहर-उपनगरात लेप्टोपायरसिसचा प्रादुर्भाव होत असताना ठिक-ठिकाणी उंदरांचाही उपद्रवही वाढत असल्याचे दिसून येते आहे. बोरीवली स्थानक आणि रुळांवर उंदरांचा सुळसुळाट वाढला आहे, त्यामुळे तेथील सफाई कर्मचारी तसेच प्रवाशांना आरोग्याला धोका संभवू शकतो.

परंपरेचे जतन व्हावे
मुंबई : कृषी व्यवस्था आपल्या परंपरेप्रमाणे व भिन्न पद्धतीने समृद्ध झाली आहे. त्याचे जतन आधुनिक तंत्र अवलंबिताना झाले पाहिजे. याबाबत कृषी ज्ञान कोषाचे खंड हे महत्त्वाचे काम करत असल्याने याचा अधिक प्रसार झाला पाहिजे, असे मत राज्यपाल सी.विद्यासागर यांनी व्यक्त केले.अवे मारिया पब्लिकेशन्स याच्या तर्फे कृषी ज्ञान कोषाचे सात खंड राज्यपाल के. विद्यासागर राव यांना सादर केले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

अण्णाभाऊ साठे जयंती
मुंबई : साहित्यरत्न, लोकशाहिर अण्णाभाउ साठे यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि रहिवासी उपस्थित होते.

फेर्‍या वाढवा
मुंबई : बेस्ट क्रमांक ५० च्या फेर्‍या वाढविण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. भाऊचा धक्का ते वरळी मार्गावरील बसच्या फेर्‍या अत्यल्प असल्याने प्रवाशांना बसस्टॉपवर ताटकळत थांबावे लागते. शिवाय, यामुळे येणार्‍या बसमध्ये प्रवाशांची गर्दी होत असल्याने गैरसोयही वाढते. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने या मागणीचा विचार करावा.

तारगल्लीची वाहतूक कोंडी कायम
मुंबई : कुर्ला आणि अंधेरीला जोडणार्‍या काळे मार्गावरील तारगल्लीतील वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. तारगल्लीमधील भंगारचे व्यापारी आपल्या गाळ्यांतील अर्धाधिक साहित्य रस्त्याच्या कडेला मांडत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांसह पादचारी वर्गाला त्रास होतो आहे. विशेषत: अवजड वाहनांना वाहतूकीस अडचण होत असून, यावर मार्ग काढण्यासाठी स्थानिक लोक प्रतिनिधींकडून वाहतूक पोलीसांसह महापालिकेला विनंती करण्यात आली आहे. मात्र वाहतूक पोलीस आणि महापालिकेने कारवाई करूनही समस्या जैसे थे राहिल्याने येथील वाहतूकीची कोंडी कायम आहे.

शीतल तलावालगत जीवरक्षक नेमा
मुंबई : कुर्ला पश्चिमकेडील शीतल तलाव येथे जीवरक्षक नेमण्यात यावे, यासाठीची मागणी आता जोर धरू लागली आहे. पावसाळ्यात हा तलाव भरून वाहू लागला असून, येथे स्थानिक परिसरातील मुले पोहण्यासाठी गर्दी करतात. स्थानिकांकडून हटकूनही पोहण्यासाठी आलेली मुले त्यांना जुमानत नाहीत. अशावेळी एखादी दुर्घटना घडू शकते. परिणामी दुर्घटना घडू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून किमान एक तरी जीवरक्षक येथे नेमण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडूनच जोर धरू लागली आहे.

एलबीएसवरवरील मोठी गटारे उघडी
मुंबई : मुंबई आणि ठाणे शहराला जोडणार्‍या लाल बहादूर शास्त्री मार्गावरील कमानीपासून शीतलपर्यंतच्या मोठया गटारांवरील झाकणे नादुरुस्त झाली आहेत. मे महिन्यांपासून गटारावरील काही झाकणे तुटली असून, तुटलेल्या काही भागावर लाकडी फळ्या टाकण्यात आल्या आहेत. दिवसा हे भाग दिसत असले तरी रात्री पादचार्‍यांचा त्यामुळे अपघात होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे गटारांवरील ज्या ठिकाणाची झाकणे तुटली आहेत; तेथे नवी झाकणे बसविण्यात यावी, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.