शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

वराला पैसे मोजता न आल्याने वधूने लग्न मोडले

By admin | Updated: May 3, 2015 16:39 IST

पैसे मोजता न आल्याने उत्तरप्रदेशमधील बलिया येथे लग्नमांडवातच वराशी विवाह करण्यास नकार दिल्याची घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमत 

बलिया, दि. ३ - पैसे मोजता न आल्याने उत्तरप्रदेशमधील बलिया येथे लग्नमांडवातच वराशी विवाह करण्यास नकार दिल्याची घटना घडली आहे. वधूच्या या निर्णयानंतर वरपक्षातील मंडळींनी गोंधळ घालण्याचा प्रयत्नही केला. मात्र वधू तिच्या निर्णयावर ठाम राहिल्याने वर पक्षातील मंडळींना रिकाम्या हातीच स्वगृही परतावे लागले. 
बलिया येथे राहणा-या तरुणीचे बिहारमधील तरुणाशी लग्न ठरले होते.लग्नाच्या दिवशी वरात मोठ्या दिमाखाने लग्नमंडपात दाखल झाली. लग्नाच्या विधीलाही सुरुवात झाली होती. मात्र तेवढ्यात वधूला वर निरक्षर असल्याचा संशय आला. तिने लग्न थांबवून मुलाला पैसे मोजण्यास सांगितले. मात्र तो मुलगा यात असमर्थ ठरल्याने मुलीने लग्न करण्यास नकार दिला. धाडस दाखवणारी तरुणी ही पदवीधर असून मुलगा निरक्षर असल्याचे तिला व तिच्या कुटुंबीयांना सांगितले नव्हते असे सूत्रांनी सांगितले. वधूच्या या निर्णयानंतर गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता. शेवटी पंचायतीमध्ये हे प्रकरण गेले व पंचायतीने वधूच्या बाजूने कौल दिला.