शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

संविधान निर्मितीत ब्राह्मणांचेही योगदान, डाॅ. आंबेडकर यांच्या वक्तव्याचा कर्नाटकच्या न्यायमूर्तींनी दिला दाखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 07:28 IST

Constitution: कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्ण एस़ दीक्षित यांनी येथे अखिल कर्नाटक ब्राह्मण महासभेच्या सुवर्णजयंतीनिमित्त आयोजित संमेलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका वक्तव्याचा उल्लेख करून संविधान निर्मितीत असलेल्या ब्राह्मणांच्या योगदानावर प्रकाश टाकला.  

बंगळुरू - कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्ण एस़ दीक्षित यांनी येथे अखिल कर्नाटक ब्राह्मण महासभेच्या सुवर्णजयंतीनिमित्त आयोजित संमेलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका वक्तव्याचा उल्लेख करून संविधान निर्मितीत असलेल्या ब्राह्मणांच्या योगदानावर प्रकाश टाकला.  

१८ व १९ जानेवारी रोजी आयोजित ‘विश्वामित्र’ या दोन दिवसीय ब्राह्मण संमेलनात न्या. दीक्षित म्हणाले की, ‘डॉ. आंबेडकर यांनी एकदा भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये म्हटले होते की, बी. एन. राव यांनी संविधानाचा मसुदा तयार केला नसता तर तो तयार होण्यास २५ वर्षे लागली असती.’

न्या. दीक्षित म्हणाले की, संविधान मसुदा समितीत ७ सदस्यांपैकी अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अयंगार आणि बी. एन. राव हे तिघे ब्राह्मण होते. ब्राह्मण हा जातिवाचक न मानता ‘वर्णाशी’ जोडला जायला हवा. 

वेद व्यास, महर्षी वाल्मिकींचा दाखलान्या. दीक्षित म्हणाले, वेदांची रचना करणारे वेद व्यास हे मच्छिमाराचे पुत्र होते आणि रामायण लिहिणारे महर्षी वाल्मिकी मागासवर्गीय जाती-जमातीतील होते. तरी ब्राह्मणांनी त्यांना कधीच कमी लेखलेले नाही. शतकानुशतके आपण भगवान श्रीरामांची पूजा करीतत आलो आहोत. त्यांची मूल्येही आपल्या संविधानात समाविष्ट करण्यात आली आहेत. 

न्यायालयीन कक्षेतच हे भाष्यपूर्वी ब्राह्मणेत्तरांच्या राष्ट्रवादी आंदोलनात आपला सहभाग होता, असा उल्लेख दीक्षित यांनी केला. न्यायाधीश होताच या उपक्रमापासून दूर झाल्याचे सांगून या सर्व गोष्टी आज न्यायालयीन कक्षेतच आपण करीत असल्याचे न्या. दीक्षित म्हणाले.

संमेलनावर टीका करणाऱ्यांना उत्तरसंमेलनात उपस्थित न्यायमूर्ती व्ही. श्रीशानंद यांनी अशा कार्यक्रमांची गरज असल्याचे स्पष्ट करीत संमेलनाच्या भव्यतेवर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तरच दिले. आज अन्न व शिक्षणासाठी अनेकांचा संघर्ष सुरू असताना अशा आयोजनाची गरज काय, असा प्रश्न काहींनी केला. पण या समुदायाची एकजूट व त्यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर चर्चेसाठी अशा संमेलनांची गरज असल्याचे न्या. श्रीशानंद म्हणाले.

टॅग्स :Courtन्यायालयKarnatakकर्नाटक