शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

गुलाम अलींनंतर आता पाकिस्तानी पहलवानांवरही बहिष्कार

By admin | Updated: October 10, 2015 15:14 IST

भारत-पाकिस्तनमधील तणावपूर्ण संबंधांमुळे प्रसिद्ध गझलगायक गुलाम अली खान यांचा भारतातील कार्यक्रम रद्द करण्यात आल्यामुळे वाद सुरू असतानाच आता भारताने पाकिस्तानी पहलवानांवरही बहिष्कार टाकला आहे.

ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. १० - भारत-पाकिस्तनमधील तणावपूर्ण संबंधांमुळे प्रसिद्ध गझलगायक गुलाम अली खान यांचा भारतातील कार्यक्रम रद्द करण्यात आल्यामुळे सुरू असलेला वाद ताजा असतानाच आता भारताने पाकिस्तानी पहलवानांवरही बहिष्कार टाकला आहे. वैष्णोदेवी येथे नवरात्रीदरम्यान दंगल आखाड्यात होणा-या कुस्ती स्पर्धेसाठी पाकिस्तानी पहलवानांना आमंत्रणच देण्यात आलेले नाही. 
या स्पर्धेचे आयोजक शिवकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी या स्पर्धेसाठी पाकिस्तानी पहलवानांना निमंत्रित करण्यासंबंधीचे निवेदन देण्यात आले होते व ते मंजूर झाल्यानंतर व्हिसाही मिळाला होता, पण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने पाकिस्तानी पहलवानांना स्पर्धेसाठी न बोलावण्याची सल्ला दिला. यावर्षीही दोन्ही देशांतील संबंध बिघडलेलेच असल्याने पहलवानांना स्पर्धेसाठी निमंत्रित करण्यात आले नाही, असे शर्मा यांनी सांगितले. 
भारताची १९४७ साली फाळणी झाल्यानंतर २००५ साली पहिल्यांदाच पाकिस्तानी पहलवानांना दंगल स्पर्धेसाठी निमंत्रण देण्यात आले होते, त्यानंतर २०१०२ पर्यंत दरवर्षी त्यांना स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यात येत असे. भारत व पाकिस्तानच्या या पहलवानांदरम्यान रंगणारा कुस्तीचा हा खेळ खूप लोकप्रिय झाला होता व तो पाहण्यासाठी लोक लांबून येत असतं, असे शर्मा म्हणाले.
२०१२ साली पेशावरमध्ये भारतीय पहलवानांची डंका वाजला होता, त्यावेळी पाकिस्तानी नागरिकांनी त्यांची खूप खातीरदारीही केली होती. मात्र २०१३ साली भारतीय सैनिकांचे शीर कापण्यात आल्याच्या घटनेनंतर दोन्ही देशातील तणाव वाढला आणि पाकिस्तानी पहलवान या स्पर्धेत सहभागी होऊ शकले नाहीत.
त्यानंतर गेली दोन वर्ष हा सिलसिला कायम असला तरी पुढील वर्षी त्यांना या स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन शर्मा यांनी दिले. भविष्यात केंद्र व राज्य सरकार दोन्ही देशातील कलाकार, खेळाडूंना एकमेकांच्या देशाता जाण्यास परवानगी देतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.