शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

गुलाम अलींनंतर आता पाकिस्तानी पहलवानांवरही बहिष्कार

By admin | Updated: October 10, 2015 15:14 IST

भारत-पाकिस्तनमधील तणावपूर्ण संबंधांमुळे प्रसिद्ध गझलगायक गुलाम अली खान यांचा भारतातील कार्यक्रम रद्द करण्यात आल्यामुळे वाद सुरू असतानाच आता भारताने पाकिस्तानी पहलवानांवरही बहिष्कार टाकला आहे.

ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. १० - भारत-पाकिस्तनमधील तणावपूर्ण संबंधांमुळे प्रसिद्ध गझलगायक गुलाम अली खान यांचा भारतातील कार्यक्रम रद्द करण्यात आल्यामुळे सुरू असलेला वाद ताजा असतानाच आता भारताने पाकिस्तानी पहलवानांवरही बहिष्कार टाकला आहे. वैष्णोदेवी येथे नवरात्रीदरम्यान दंगल आखाड्यात होणा-या कुस्ती स्पर्धेसाठी पाकिस्तानी पहलवानांना आमंत्रणच देण्यात आलेले नाही. 
या स्पर्धेचे आयोजक शिवकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी या स्पर्धेसाठी पाकिस्तानी पहलवानांना निमंत्रित करण्यासंबंधीचे निवेदन देण्यात आले होते व ते मंजूर झाल्यानंतर व्हिसाही मिळाला होता, पण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने पाकिस्तानी पहलवानांना स्पर्धेसाठी न बोलावण्याची सल्ला दिला. यावर्षीही दोन्ही देशांतील संबंध बिघडलेलेच असल्याने पहलवानांना स्पर्धेसाठी निमंत्रित करण्यात आले नाही, असे शर्मा यांनी सांगितले. 
भारताची १९४७ साली फाळणी झाल्यानंतर २००५ साली पहिल्यांदाच पाकिस्तानी पहलवानांना दंगल स्पर्धेसाठी निमंत्रण देण्यात आले होते, त्यानंतर २०१०२ पर्यंत दरवर्षी त्यांना स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यात येत असे. भारत व पाकिस्तानच्या या पहलवानांदरम्यान रंगणारा कुस्तीचा हा खेळ खूप लोकप्रिय झाला होता व तो पाहण्यासाठी लोक लांबून येत असतं, असे शर्मा म्हणाले.
२०१२ साली पेशावरमध्ये भारतीय पहलवानांची डंका वाजला होता, त्यावेळी पाकिस्तानी नागरिकांनी त्यांची खूप खातीरदारीही केली होती. मात्र २०१३ साली भारतीय सैनिकांचे शीर कापण्यात आल्याच्या घटनेनंतर दोन्ही देशातील तणाव वाढला आणि पाकिस्तानी पहलवान या स्पर्धेत सहभागी होऊ शकले नाहीत.
त्यानंतर गेली दोन वर्ष हा सिलसिला कायम असला तरी पुढील वर्षी त्यांना या स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन शर्मा यांनी दिले. भविष्यात केंद्र व राज्य सरकार दोन्ही देशातील कलाकार, खेळाडूंना एकमेकांच्या देशाता जाण्यास परवानगी देतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.