शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

संविधानावरील चर्चेत दोन्ही बाजूंनी ‘फायर’; वारंवार संविधान हायजॅक करण्याचा प्रयत्न : राजनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 06:29 IST

विरोधी पक्षाचे अनेक नेते संविधानाची प्रत खिशात घेऊन फिरतात, कारण त्यांनी पिढ्यानपिढ्या आपल्या कुटुंबाच्या खिशात ठेवलेले संविधान पाहिले असल्याचा दावा करत संरक्षण मंत्र्यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशाचे संविधान निर्माण करण्यात अनेक पक्षांचे योगदान आहे. ते कुठल्या एका पक्षाने तयार केले नाही. मात्र, एक पक्ष सातत्याने संविधान हायजॅक करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप करत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसला लक्ष्य केले.

विरोधी पक्षाचे अनेक नेते संविधानाची प्रत खिशात घेऊन फिरतात, कारण त्यांनी पिढ्यानपिढ्या आपल्या कुटुंबाच्या खिशात ठेवलेले संविधान पाहिले असल्याचा दावा करत संरक्षण मंत्र्यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार संविधानाची मूल्ये केंद्रस्थानी ठेवून काम करत आहे. काँग्रेसने केवळ संविधानात संशोधनच केले नाही, तर ते बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राजनाथ यांनी केला.

संविधान हृदयात हवेसंविधान नेत्यांच्या हातात नाही तर हृदयात हवे असे नमूद करत लोजप खासदार शांभवी चौधरी यांनी राहुल गांधींवर अप्रत्यक्षरीत्या टीका केली. 

राज्यघटना कोणत्या एका पक्षाची देणगी नाही. भारताचे संविधान देशातील नागरिक, भारताचे विचार आणि मूल्यांवर आधारीत दस्तऐवज आहे.      - राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री

काँग्रेसने कलम ३५६ चा गैरवापर केला : जेडीएस  देशात काँग्रेसचे सरकार असताना त्यांच्या पंतप्रधानांनी कलम ३५६ चा गैरवापर करत अनेक राज्यांमधील सरकारे पाडल्याचा आरोप पंचायत राजमंत्री व जेडीएस नेते राजीव रंजन सिंह यांनी केला. 

दहा वर्षांत धर्मनिरपेक्षतेची उपेक्षा : तृणमूल  दहा वर्षांत देशातील धर्मनिरपेक्षतेची उपेक्षा करत ती मोडीत काढण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केला. भारत एक धर्मनिरपेक्ष देश असून राज्यघटनेच्या प्रस्तावनेत तसा उल्लेख असल्याचे नमूद करत बॅनर्जींनी केंद्र सरकारला लक्ष्य केले.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहlok sabhaलोकसभा