शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?
3
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
4
भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना
5
VIDEO: थोडक्यात वाचली जिनिलिया, कारमध्ये बसत असताना ड्रायव्हरकडून नकळत झाली चूक अन्...
6
कोर्टातून पळून गेलेला आरोपी मनसेच्या कार्यालयात पोहोचला! नेत्याला दिली धमकी, मुंबईत घडली धक्कादायक घटना 
7
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
8
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
9
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
10
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
11
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
12
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
14
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
15
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
16
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
18
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
19
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
20
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा

बॉर्डरचा 'नायक' कालवश....

By admin | Updated: August 12, 2016 10:10 IST

१९७१च्या भारत-पाक युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारे सुभेदार रतन सिंह यांचे बुधवारी निधन झाले.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १२ - १९७१च्या भारत-पाक युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारे सुभेदार रतन सिंह यांचे बुधवारी निधन झाले. रतन सिंह यांनी पंजाबच्या टिब्बा येथे आपला अखेरचा श्वास घेतला. पैतृक या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या नातवाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यांच्या निधनाबद्दल धार्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. विशेष म्हणजे 'बॉर्डर' या गाजलेल्या चित्रपटात सुभेदार रतन सिंह यांच्यावर आधारीत एक व्यक्तिरेखाही साकारण्यात आली होती. अभिनेता पुनित इस्सार यांनी त्यांची भूमिका केली होती. 

२३ नोव्हेंबर  १९७१ रोजी पाकिस्तानमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली व त्यानंतर पाकिस्तान व भारतादरम्यान मोठे युद्ध झाले. ३ डिसेंबर रोजी पाकिस्तानी हवाई-दलाने उत्तर भारतातील अनेक हवाईतळांवर हल्ले चढवून युद्धाची पहिली ठिणगी टाकली. त्यांनतर भारताने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या युद्धादरम्यान सुभेदार रतन सिंह यांनी राजस्थानच्या लोंगेवाला येथील सीमेवर तीव्र लढा देत पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले. 

अवघ्या काही भारतीय सैनिकांनी २ हजारपेक्षाही अधिक पाकिस्तानी जवानांशी लढा देत त्यांच्या चिलखती ब्रिगेडचा पहाटेपर्यंत टिच्चून सामना केला. 

सुभेदार सिंग यांच्या युद्धातील अतुलनीय शौर्य व कामगिरीसाठी त्यांना 'वीरचक्र' देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.