शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 07:28 IST

अचानक आलेल्या वादळामुळे एक बोट नदीत उलटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बोटीतील ११ प्रवासी नदीत बुडाले, मात्र चार जण पोहून किनाऱ्यावर आले. त्याच वेळी तीन मुलांसह ७ जणांचा मृत्यू झाला.

मध्य प्रदेशातील श्योपूर येथे शनिवारी अचानक आलेल्या वादळामुळे एक बोट नदीत उलटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बोटीतील ११ प्रवासी नदीत बुडाले, मात्र चार जण पोहून किनाऱ्यावर आले. त्याच वेळी तीन मुलांसह ७ जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनासह एसडीआरएफ बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह बाहेर काढले आहेत.

मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी बोट दुर्घटनेवर शोक व्यक्त केला असून मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांना घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जैनी येथील क्षेत्रपाल बाबाच्या ठिकाणी प्रसाद कार्यक्रमासाठी आलेले विजारपूर गावातील ११ जण बोटीने सीप नदी ओलांडून सरोदा गावातील नातेवाईकाच्या घरी जात होते. 

वादळ आले आणि बोट नियंत्रणाबाहेर जाऊन नदीत उलटली. बोटीतील चार जण कसेतरी पोहून बाहेर आले. हे सर्वजण विजरापूर, बडोदा येथील रहिवासी आहेत. बोट दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाल्याची प्रशासनाने पुष्टी केली असून त्यात २५ वर्षीय परशुराम, १६ वर्षीय आरती, १५ वर्षीय लाली, ४ वर्षीय भूपेंद्र, १० वर्षीय श्याम, ८ वर्षीय रवींद्र आणि २३ वर्षीय परवंता यांचा समावेश आहे. 

श्योपूरचे जिल्हाधिकारी लोकेश कुमार जांगीड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरोदा गावात अचानक आलेल्या वादळामुळे सीप नदीत एक भोवरा तयार झाला आणि बोट उलटली, त्यात सात जणांचा बुडून मृत्यू झाला. ज्यांचे मृतदेह बचाव पथकाने बाहेर काढले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रशासन पूर्णपणे मृतांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे आहे. त्यांना शक्य ती सर्व मदत केली जाईल.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशdrowningपाण्यात बुडणे