शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना 4 दिवसांत नोकरी; महापालिकेचं संवेदनशील पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 15:27 IST

महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा 4 सप्टेंबरला कर्तव्य बजावताना मृत्यू

मुंबई: गेल्या आठवड्यात शहरात झालेल्या मुसळधार पावसात कर्तव्य बजावत असताना मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकरीत सामावून घेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे अवघ्या चार दिवसांमध्ये पालिकानं याबद्दलची कार्यवाही केली. बृहन्मुंबई महापालिकेच्या 'पी दक्षिण विभागाचे कर्मचारी जगदीश परमार (५४) आणि विजेंद्र बागडी (४०) या दोन कर्मचाऱ्यांचा 4 सप्टेंबरला मृत्यू झाला. अतिवृष्टीत कर्तव्य बजावत या दोन कर्मचाऱ्यांना मृत्यूनं गाठलं. याबाबत महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका वारसाला महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याची कार्यवाही करण्याचं आणि नियमानुसार कर्मचाऱ्याची देणी देण्याबाबत तातडीनं कार्यवाही करण्याचं आदेश संबंधित खात्याला दिले होते.यानंतर सहआयुक्त अशोक खैरे, पी दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती चंदा जाधव आणि घन कचरा व्यवस्थापन खात्याचे प्रमुख अभियंता अशोक यमगर यांनी काल जगदीश परमार आणि विजेंद्र बागडी यांच्या कुटुंबातील एका वारसाला नोकरीचं नियुक्ती पत्र आणि  आज सफाई कामगार विमा योजनेंतर्गत रुपये एक लाख एवढ्या रकमेचा धनादेश  सुपूर्द केला. बुधवारी (4 सप्टेंबर) झालेल्या अतिवृष्टी दरम्यान नागरिकांच्या सुविधेसाठी महापालिकेचे ३२ हजारांपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत होते. त्यावेळी पी दक्षिण विभागातील कामगार जगदीश परमार यांचं कर्तव्य बजावताना निधन झालं. तसंच महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सफाई कामगार विजेंद्र बागडी हे कर्तव्यावर असताना तोल जाऊन वाहत्या पाण्यात पडले. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ बाहेर काढून त्वरित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सर्वोपचार रुग्णालयात' नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. 

टॅग्स :Mumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका