शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
5
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
6
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
7
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
8
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
9
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
10
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
11
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
12
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
13
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
14
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
15
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
16
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
18
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
19
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
20
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!

काळा पैसा दाखवा; निश्चिंत व्हा!

By admin | Updated: June 27, 2016 05:11 IST

अघोषित संपत्ती जाहीर करण्यासाठी अखेरची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत असून या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमात केले.

नवी दिल्ली : अघोषित संपत्ती जाहीर करण्यासाठी अखेरची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत असून या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमात केले. स्वेच्छेने संपत्ती किंवा अज्ञात उत्पन्न घोषित केल्यास पैशाच्या स्रोताबाबत कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही; मात्र संधीची ही खिडकी बंद झाल्यानंतर समस्यांना तोंड देण्याची वेळ येईल, असा इशाराही त्यांनी दिला.ज्यांच्याकडे अघोषित संपत्ती असेल त्यांना सरकारने एक विशेष संधी दिली आहे. तुम्ही दंड भरून विविध प्रकारच्या बोजातून मुक्त होऊ शकता. अज्ञात उत्पन्नाचे स्रोत काय याबाबत कोणतीही चौकशी केली जाणार नाही असे मी वचन दिले आहे. त्यामुळेच पारदर्शक यंत्रणेचा एक भाग बनण्याची ही एक चांगली संधी आहे. ३० सप्टेंबरपर्यंत असलेली मुदत ही अखेरची संधी असेल, हे मी देशवासीयांना सांगू इच्छितो. कुणाला नियम न पाळल्यामुळे ३० सप्टेंबरनंतर कोणत्याही अडचणींना तोंड देण्याची वेळ आल्यास कोणत्याही प्रकारची मदत करू नका, असे मी भाजपाच्या खासदारांना सांगितले आहे, असेही मोदी म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)>अज्ञात उत्पन्नाचे स्रोत काय याबाबत कोणतीही चौकशी केली जाणार नाही असे मी वचन दिले आहे. त्यामुळेच पारदर्शक यंत्रणेचा एक भाग बनण्याची ही एक चांगली संधी आहे.- नरेंद्र मोदी, पंतप्रधानकाळ बदलला, पण सवय कायमएक काळ असा होता की, कर खूप असल्यामुळे कर भरण्याचे टाळणे किंवा करचोरी करणे हा स्वभाव बनला होता. त्या काळात विदेशातून वस्तू आणताना अडचणी येत होत्या. त्यामुळे तस्करीही तेवढीच वाढली होती, पण हळूहळू काळ बदलत गेला. आता करदात्यांना सरकारच्या करव्यवस्थेशी जोडणे अधिक अवघड काम राहिलेले नाही, तरीही जुनी सवय गेलेली नाही. नियमांपासून दूर पळत स्वत:ची शांती गमावू नका. कोणतीही छोटी व्यक्ती तुम्हाला अडचणीत आणू शकेल. मग असे का होऊ द्यायचे? आपल्या संपत्ती किंवा उत्पन्नाबाबत सरकारला योग्य माहिती का देऊ नये. अडचणींपासून मुक्त व्हायचे असेल तर गतकाळात साठवून ठेवलेल्या बॅगा उघड्या करा, असे आवाहन मी देशवासीयांना करीत आहे, असे मोदींनी स्पष्ट केले.>आणीबाणीची काळी रात्र४१ वर्षांपूर्वी लादण्यात आलेल्या आणीबाणीतील काळ्या रात्रीचे स्मरण करवून देताना मोदी म्हणाले की, लोकशाही हीच देशाची खरी ताकद आहे. लोकशाहीची कटिबद्धता पुढे न्यायला हवी. सामान्य नागरिकांच्या लोकशाही अधिकाराचे चमकते उदाहरण आणीबाणीच्या काळात दिसून आले. देशाला त्याचे स्मरण परत परत करवून दिले जावे. २६ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली. याच दिवशी लोकांना सशक्त बनणारी लोकशाही तुडवली गेली. जयप्रकाश नारायण यांच्यासह लाखो लोक कारागृहात गेले होते. संपूर्ण देश कारागृह बनला होता. बरेचदा लोक माझ्या ‘मन की बात’ कार्यक्रमाची टर उडवितात. लोकशाहीला कटिबद्ध असल्यानेच हे शक्य झाले, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.