शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

काळा पैसा दाखवा; निश्चिंत व्हा!

By admin | Updated: June 27, 2016 05:11 IST

अघोषित संपत्ती जाहीर करण्यासाठी अखेरची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत असून या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमात केले.

नवी दिल्ली : अघोषित संपत्ती जाहीर करण्यासाठी अखेरची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत असून या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमात केले. स्वेच्छेने संपत्ती किंवा अज्ञात उत्पन्न घोषित केल्यास पैशाच्या स्रोताबाबत कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही; मात्र संधीची ही खिडकी बंद झाल्यानंतर समस्यांना तोंड देण्याची वेळ येईल, असा इशाराही त्यांनी दिला.ज्यांच्याकडे अघोषित संपत्ती असेल त्यांना सरकारने एक विशेष संधी दिली आहे. तुम्ही दंड भरून विविध प्रकारच्या बोजातून मुक्त होऊ शकता. अज्ञात उत्पन्नाचे स्रोत काय याबाबत कोणतीही चौकशी केली जाणार नाही असे मी वचन दिले आहे. त्यामुळेच पारदर्शक यंत्रणेचा एक भाग बनण्याची ही एक चांगली संधी आहे. ३० सप्टेंबरपर्यंत असलेली मुदत ही अखेरची संधी असेल, हे मी देशवासीयांना सांगू इच्छितो. कुणाला नियम न पाळल्यामुळे ३० सप्टेंबरनंतर कोणत्याही अडचणींना तोंड देण्याची वेळ आल्यास कोणत्याही प्रकारची मदत करू नका, असे मी भाजपाच्या खासदारांना सांगितले आहे, असेही मोदी म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)>अज्ञात उत्पन्नाचे स्रोत काय याबाबत कोणतीही चौकशी केली जाणार नाही असे मी वचन दिले आहे. त्यामुळेच पारदर्शक यंत्रणेचा एक भाग बनण्याची ही एक चांगली संधी आहे.- नरेंद्र मोदी, पंतप्रधानकाळ बदलला, पण सवय कायमएक काळ असा होता की, कर खूप असल्यामुळे कर भरण्याचे टाळणे किंवा करचोरी करणे हा स्वभाव बनला होता. त्या काळात विदेशातून वस्तू आणताना अडचणी येत होत्या. त्यामुळे तस्करीही तेवढीच वाढली होती, पण हळूहळू काळ बदलत गेला. आता करदात्यांना सरकारच्या करव्यवस्थेशी जोडणे अधिक अवघड काम राहिलेले नाही, तरीही जुनी सवय गेलेली नाही. नियमांपासून दूर पळत स्वत:ची शांती गमावू नका. कोणतीही छोटी व्यक्ती तुम्हाला अडचणीत आणू शकेल. मग असे का होऊ द्यायचे? आपल्या संपत्ती किंवा उत्पन्नाबाबत सरकारला योग्य माहिती का देऊ नये. अडचणींपासून मुक्त व्हायचे असेल तर गतकाळात साठवून ठेवलेल्या बॅगा उघड्या करा, असे आवाहन मी देशवासीयांना करीत आहे, असे मोदींनी स्पष्ट केले.>आणीबाणीची काळी रात्र४१ वर्षांपूर्वी लादण्यात आलेल्या आणीबाणीतील काळ्या रात्रीचे स्मरण करवून देताना मोदी म्हणाले की, लोकशाही हीच देशाची खरी ताकद आहे. लोकशाहीची कटिबद्धता पुढे न्यायला हवी. सामान्य नागरिकांच्या लोकशाही अधिकाराचे चमकते उदाहरण आणीबाणीच्या काळात दिसून आले. देशाला त्याचे स्मरण परत परत करवून दिले जावे. २६ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली. याच दिवशी लोकांना सशक्त बनणारी लोकशाही तुडवली गेली. जयप्रकाश नारायण यांच्यासह लाखो लोक कारागृहात गेले होते. संपूर्ण देश कारागृह बनला होता. बरेचदा लोक माझ्या ‘मन की बात’ कार्यक्रमाची टर उडवितात. लोकशाहीला कटिबद्ध असल्यानेच हे शक्य झाले, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.