शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बेळगावमध्ये काळा दिन! मराठी अस्मिता एकवटली; प्रश्न तडीस गेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 02:59 IST

बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देत बेळगावमध्ये शुक्रवारी काळा दिन पाळण्यात आला

बेळगाव : बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्रमे नही तो जेलमे, अशा घोषणा देत शुक्रवारी बेळगावात काळा दिन पाळण्यात आला. दंडाला काळ्या फिती, हातात भगवे ध्वज, डोक्यावर भगवा फेटा बांधून अनेकजण सायकल फेरीत सहभागी झाले होते.

अत्याचाराला दाद न देता आपण लढा चालू ठेवला हे कौतुकास्पद आहे. हा प्रश्न तडीला लावल्या शिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. सीमावासियांचे प्रश्न, समस्या विधानसभेत नक्की मांडेन असे, उद्गार आमदार राजेश पाटील यांनी काढले. मराठा मंदिर येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काळ्या दिनाच्या सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, मालोजीराव अष्टेकर आदी उपस्थित होते. जर सीमा भागातील कोणत्याही मराठी भाषिक नागरिकला त्रास द्याल तर बेळगावात संपूर्ण चंदगड घेऊन घूसू, असा इशारा देण्यात आला.

बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देत बेळगावमध्ये शुक्रवारी काळा दिन पाळण्यात आला. सीमा भागातील मराठी भाषिक लोकांना न्याय मिळावा म्हणून चंदगड तालुक्यातील सर्व पक्षीय तरुण काळ्या फिती बांधून रस्त्यावर उतरले होते.‘शिवसेना सीमा बांधवांच्या पाठीशी ठाम’सीमा भागासाठी ६९ शिवसैनिकांनी बलिदान दिले. बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीवर शिवसेना आजही ठाम आहे, असे आश्वासन शिवसेनेचे विधी मंडळ गट नेते एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.