शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
3
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
4
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
7
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
8
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
9
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
10
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
11
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
12
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
13
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
14
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
15
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
16
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
17
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
18
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
19
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
20
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश

‘भाजपाचा विजयरथ बिहारमध्ये रोखणार’

By admin | Updated: January 3, 2015 02:30 IST

भाजपाचा विजयरथ बिहारमध्ये रोखला जाईल, असे बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि संजदचे ज्येष्ठ नेते नितीशकुमार यांनी म्हटले आहे.

पाटणा : लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी भाजपा आता विभाजनवादी रणनीतीचा अवलंब करीत असल्यामुळे भाजपाचा विजयरथ बिहारमध्ये रोखला जाईल, असे बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि संजदचे ज्येष्ठ नेते नितीशकुमार यांनी म्हटले आहे.‘भाजपाची हवा हळूहळू निघू लागली आहे आणि २०१५ मध्ये त्यांच्या दांभिकतेचा पराभव होईल. २०१४ मध्ये काळा पैसा परत आणणे, युवकांना रोजगार देणे व बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यासारखी अनेक खोटी आश्वासने देऊन भाजपा सत्तेवर आली आहे; परंतु ही सर्व आश्वासने आता थंडबस्त्यात ठेवण्यात येत आहेत. भाजपा आता धर्मांतर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचे नाव घेऊन जहाल संघटनांच्या मदतीने विभाजनवादी रणनीतीच्या आधारे लोकांचे लक्ष आपल्या अजेंड्यावरून अन्यत्र वळविण्याचा प्रयत्न करीत आहे’, असे नितीशकुमार म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते.जुन्या जनता परिवाराच्या विलीनीकरणाबाबत विचारले असता ते म्हणाले, विलीनीकरण निश्चित होणार आहे. फक्त काही औपचारिकता बाकी आहे. (वृत्तसंस्था)भाजपाला पराभूत करण्यासाठी काँग्रेस आणि डाव्या आघाडीला अखंड जनता पार्टीसोबत येण्याचे निमंत्रण देणार काय, या प्रश्नावर ‘या सर्व भविष्यातील गोष्टी आहेत’, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)४नव वर्षात भाजपाच्या राजवटीत आनंद साजरा करण्यासारखे काहीही नाही आणि बिहारमध्ये या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपासून भाजपाच्या पतनाची सुरुवात होईल, असे भाकीत राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी वर्तविले आहे.‘आम्ही प्रत्येकाचे नूतन वर्षाभिनंदन करतो. पण यावेळी भाजपाच्या राजवटीत नववर्षात जल्लोष करण्यासारखे काही नाही. भाजपाच्या राजवटीत गरिबांचे धर्मांतर होत आहे, असे ते म्हणाले.केंद्रातील मंत्री विरोधकांबद्दल असंसदीय भाषेचा वापर करीत आहेत आणि गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसेचा गौरव केला जात आहे. आता तिरंग्याच्या जागी ते भगवा ध्वज आणतील, तो दिवस काही फार दूर नाही’, असे लालूप्रसाद म्हणाले.