शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
3
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
4
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
5
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
6
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
7
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
8
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
9
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
10
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
11
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
12
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
13
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
14
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
15
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
16
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
17
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
18
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
19
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर

‘भाजपाचा विजयरथ बिहारमध्ये रोखणार’

By admin | Updated: January 3, 2015 02:30 IST

भाजपाचा विजयरथ बिहारमध्ये रोखला जाईल, असे बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि संजदचे ज्येष्ठ नेते नितीशकुमार यांनी म्हटले आहे.

पाटणा : लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी भाजपा आता विभाजनवादी रणनीतीचा अवलंब करीत असल्यामुळे भाजपाचा विजयरथ बिहारमध्ये रोखला जाईल, असे बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि संजदचे ज्येष्ठ नेते नितीशकुमार यांनी म्हटले आहे.‘भाजपाची हवा हळूहळू निघू लागली आहे आणि २०१५ मध्ये त्यांच्या दांभिकतेचा पराभव होईल. २०१४ मध्ये काळा पैसा परत आणणे, युवकांना रोजगार देणे व बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यासारखी अनेक खोटी आश्वासने देऊन भाजपा सत्तेवर आली आहे; परंतु ही सर्व आश्वासने आता थंडबस्त्यात ठेवण्यात येत आहेत. भाजपा आता धर्मांतर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचे नाव घेऊन जहाल संघटनांच्या मदतीने विभाजनवादी रणनीतीच्या आधारे लोकांचे लक्ष आपल्या अजेंड्यावरून अन्यत्र वळविण्याचा प्रयत्न करीत आहे’, असे नितीशकुमार म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते.जुन्या जनता परिवाराच्या विलीनीकरणाबाबत विचारले असता ते म्हणाले, विलीनीकरण निश्चित होणार आहे. फक्त काही औपचारिकता बाकी आहे. (वृत्तसंस्था)भाजपाला पराभूत करण्यासाठी काँग्रेस आणि डाव्या आघाडीला अखंड जनता पार्टीसोबत येण्याचे निमंत्रण देणार काय, या प्रश्नावर ‘या सर्व भविष्यातील गोष्टी आहेत’, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)४नव वर्षात भाजपाच्या राजवटीत आनंद साजरा करण्यासारखे काहीही नाही आणि बिहारमध्ये या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपासून भाजपाच्या पतनाची सुरुवात होईल, असे भाकीत राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी वर्तविले आहे.‘आम्ही प्रत्येकाचे नूतन वर्षाभिनंदन करतो. पण यावेळी भाजपाच्या राजवटीत नववर्षात जल्लोष करण्यासारखे काही नाही. भाजपाच्या राजवटीत गरिबांचे धर्मांतर होत आहे, असे ते म्हणाले.केंद्रातील मंत्री विरोधकांबद्दल असंसदीय भाषेचा वापर करीत आहेत आणि गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसेचा गौरव केला जात आहे. आता तिरंग्याच्या जागी ते भगवा ध्वज आणतील, तो दिवस काही फार दूर नाही’, असे लालूप्रसाद म्हणाले.