हरीश गुप्ता, नवी दिल्ली - नाराज ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि सुषमा स्वराज यांच्या भवितव्यासंबंधीच्या भूमिकेचा प्रश्न सोडवायचा असतानाच भाजपाला आणखी एका प्रश्नाला घेरले आहे. पक्षाचा चेहरा आणि मोदींचे खास निकटस्थ मानले जाणारे अरुण जेटली यांनी मंत्रिमंडळात सहभागी होण्यास दिलेला नकार हे त्यामागचे कारण आहे. अमृतसर येथील धक्कादायक पराभव जेटलींच्या जिव्हारी लागला आहे. ते अद्याप नैराश्यातून बाहेर आलेले नाहीत. १६ मे रोजी सकाळी मतमोजणीवेळी ते विशेष विमानाने अमृतसरला निघाले असताना ते पिछाडीवर असल्याचे वृत्त धडकले होते. सार्वजनिक जीवनातील नैतिकता गमावल्यामुळे त्यांनी पक्षात कोणतीही भूमिका मिळाली तरी सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मोदी आणि राजनाथ सिंह यांनी तुमच्या सहभागाविना सरकारच बनणार नाही, असे ठामपणे सांगत जेटलींना मंत्रिपद स्वीकारण्याची गळ घातली आहे. रालोआकडे ३३५ एवढे संख्याबळ असले तरी अनुभवी खासदारांची कमतरता आहे. यातील २०० पेक्षा जास्त खासदार प्रथमच लोकसभेत पाऊल ठेवत आहेत. त्यामुळे अभ्यासू नेत्याची मंत्रिमंडळाला गरज आहे. राज्यसभेतही रालोआची ही अवस्था आहे.
जेटलींच्या नकाराने भाजपाची अडचण
By admin | Updated: May 19, 2014 03:24 IST