शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

'माझ्या मतदारसंघात भाजपचे ऑपरेशन कमळ'; नवीन मतदारांवरुन अरविंद केजरीवालांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 13:50 IST

दिल्ली विधानसभेच्या निवडणुका काही दिवसातच होणार आहेत. या निवडणुकांआधी राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

दिल्लीत काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याआधीच राजकीय वर्तुळात आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आता आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर ऑपरेशन लोटस चालवल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मतदारसंघात भाजपाने १५ डिसेंबरपासून ऑपरेशन लोट्स सुरू केल्याचा दावा केला आहे.

निवडणूक जिंकण्यासाठी भाजप सर्व प्रकारचे डावपेच अवलंबत असल्याचा आरोप त्यांनी केला. माझ्या नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात - त्यांचे 'ऑपरेशन लोटस' १५ डिसेंबरपासून सुरू आहे. या १५ दिवसांत त्यांनी सुमारे ५,००० मते हटवण्यासाठी आणि ७,५०० मते जोडण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत, असा  दावा केला. 

"...ते व्हॉट्सॲप चॅट जितेंद्र आव्हाड यांचंच’’, रूपाली ठोंबरे आपल्या दाव्यावर ठाम

केजरीवाल म्हणाले, नवी दिल्लीत १ लाख ६ हजार मते आहेत. १ लाख ६ हजार मतांपैकी ५ टक्के मते डिलीट होत असतील आणि साडेसात हजार मते जोडली जात असतील, तर निवडणुका घेण्याची काय गरज आहे. ही उघड गुंडगिरी आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला.

भाजपा विद्यमान मतदारांची नावे हटवत असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला. नवी दिल्ली विधानसभेच्या जागेसाठी २९ ऑक्टोबर ते १४ डिसेंबर या कालावधीत ९०० मते कमी करण्यासाठी अर्ज प्राप्त झाले होते. १५ डिसेंबरपासून आजपर्यंत १९ डिसेंबरला एका दिवसात ५००० मते हटवण्यासाठी आली. सीएम अरविंद केजरीवाल म्हणाले, कोण आहेत मतं कापण्यासाठी अर्ज करणारे आणि कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहेत?, असा सवालही त्यांनी केला. 

अरविंद केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयोग दोन महिने घरोघरी जाऊन मते मिळवत असताना १५ दिवसांत १० हजार मतदार आले कुठून, कोणाची मते मोजली जात आहेत. भाजप बाहेरून लोक आणत आहे, त्यांची बनावट मते बनवली जात आहेत.

'तुमच्यावरील दबाव वाढेल, पण कोणतेही चुकीचे काम करण्यापूर्वी विचार करा, आज नाही उद्या सरकार बदलेल, पण तुमच्या नियंत्रणाखाली काहीही बदल होणार नाही. कोणाच्या सांगण्यावरुन,तुम्ही हे करत आहात. शेवटी तुम्ही पकडले जाणार आहात, असंही ते म्हणाले.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्ली