शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

'माझ्या मतदारसंघात भाजपचे ऑपरेशन कमळ'; नवीन मतदारांवरुन अरविंद केजरीवालांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 13:50 IST

दिल्ली विधानसभेच्या निवडणुका काही दिवसातच होणार आहेत. या निवडणुकांआधी राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

दिल्लीत काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याआधीच राजकीय वर्तुळात आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आता आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर ऑपरेशन लोटस चालवल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मतदारसंघात भाजपाने १५ डिसेंबरपासून ऑपरेशन लोट्स सुरू केल्याचा दावा केला आहे.

निवडणूक जिंकण्यासाठी भाजप सर्व प्रकारचे डावपेच अवलंबत असल्याचा आरोप त्यांनी केला. माझ्या नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात - त्यांचे 'ऑपरेशन लोटस' १५ डिसेंबरपासून सुरू आहे. या १५ दिवसांत त्यांनी सुमारे ५,००० मते हटवण्यासाठी आणि ७,५०० मते जोडण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत, असा  दावा केला. 

"...ते व्हॉट्सॲप चॅट जितेंद्र आव्हाड यांचंच’’, रूपाली ठोंबरे आपल्या दाव्यावर ठाम

केजरीवाल म्हणाले, नवी दिल्लीत १ लाख ६ हजार मते आहेत. १ लाख ६ हजार मतांपैकी ५ टक्के मते डिलीट होत असतील आणि साडेसात हजार मते जोडली जात असतील, तर निवडणुका घेण्याची काय गरज आहे. ही उघड गुंडगिरी आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला.

भाजपा विद्यमान मतदारांची नावे हटवत असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला. नवी दिल्ली विधानसभेच्या जागेसाठी २९ ऑक्टोबर ते १४ डिसेंबर या कालावधीत ९०० मते कमी करण्यासाठी अर्ज प्राप्त झाले होते. १५ डिसेंबरपासून आजपर्यंत १९ डिसेंबरला एका दिवसात ५००० मते हटवण्यासाठी आली. सीएम अरविंद केजरीवाल म्हणाले, कोण आहेत मतं कापण्यासाठी अर्ज करणारे आणि कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहेत?, असा सवालही त्यांनी केला. 

अरविंद केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयोग दोन महिने घरोघरी जाऊन मते मिळवत असताना १५ दिवसांत १० हजार मतदार आले कुठून, कोणाची मते मोजली जात आहेत. भाजप बाहेरून लोक आणत आहे, त्यांची बनावट मते बनवली जात आहेत.

'तुमच्यावरील दबाव वाढेल, पण कोणतेही चुकीचे काम करण्यापूर्वी विचार करा, आज नाही उद्या सरकार बदलेल, पण तुमच्या नियंत्रणाखाली काहीही बदल होणार नाही. कोणाच्या सांगण्यावरुन,तुम्ही हे करत आहात. शेवटी तुम्ही पकडले जाणार आहात, असंही ते म्हणाले.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्ली