शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मिशन बंगालसाठी भाजपची मोठी तयारी, 'या' 5 नेत्यांवर असेल बंगाल जिंकण्याची जबाबदारी

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 18, 2020 11:19 IST

गेल्या निवडणुकीत ममतांच्या टीएमसीने सर्वाधिक 211 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसला 44, डाव्यांना 26 तर भाजपला केवळ 3 जागाच जिंकल्या आल्या होत्या आणि इतरांना 10 जागा मिळाल्या होत्या. येथे बहुमतासाठी एकूण 148 जागांची आवश्यकता आहे.

ठळक मुद्देबिहार विजयानंतर, आता भाजप मिशन बंगालसाठी कंबर कसून तयारीला लागला आहे.बंगाल निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने पाच बड्या नेत्यांवर मोठी जबाबदारी टाकली आहे. बंगाल निवडणुकीसाठी भाजपने पाच विभाग (झोन) तयार केले आहेत

कोलकाता - बिहार विजयानंतर, आता भाजप मिशन बंगालसाठी कंबर कसून तयारीला लागला आहे. बंगाल निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने पाच बड्या नेत्यांवर मोठी जबाबदारी टाकली आहे. बंगाल निवडणुकीसाठी भाजपने पाच विभाग (झोन) तयार केले आहेत आणि पाच मोठ्या नेत्यांना या विभागांची जबाबदारी दिली आहे. हे पाच नेते या विभागाचे प्रमुख असतील.

कुणाकडे असेल कोणत्या विभागाची जबाबदारी? -भाजपने आखलेल्या रणनितीनुसार, सुनील देवधर यांच्याकडे हावडा, हुगळी आणि मिदनापूर या विभागांची जबाबदारी असेल. विनोद तावडे हे नाबादीपमध्ये निवडणुकीची तयारी करतील. विनोद सोनकर बर्दमान आणि हरीश द्विवेदी यांना उत्तर बंगालची जबाबदारी देण्यात आली आहे. हे चारही नेते भाजपचे राष्ट्रीय सचिव आहेत. याशिवाय भाजपचे राष्ट्रीय महासचिव दुष्यंत गौतम यांना कोलकाता विभागाचे निवडणूक प्रभारी करण्यात आले आहे. हे पाचही नेते नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत निवडणुकीच्या तयारीवर अहवाल सादर करून भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना सादर करतील. या अहवालानंतर गृह मंत्री अमित शाह हे बंगालचा दौरा करण्याची शक्यता आहे.

हे आहेत प्रभारी आणि सह प्रभारी -पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय हेच असतील. तर बीजेपी अध्यक्ष नड्डा यांनी, आयटी सेलचे अमित मालवीय यांना बंगालचे सह प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका आहेत. सध्या येथे तृणमूल काँग्रेसचे सरकार असून ममता बॅनर्जी या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत.

असे आहे सध्याचे राजकीय बलाबल -गेल्या निवडणुकीत ममतांच्या टीएमसीने सर्वाधिक 211 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसला 44, डाव्यांना 26 तर भाजपला केवळ 3 जागाच जिंकल्या आल्या होत्या आणि इतरांना 10 जागा मिळाल्या होत्या. येथे बहुमतासाठी एकूण 148 जागांची आवश्यकता आहे.

राज्यपाल बंगालच्या दौऱ्यावर - पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड हे उत्तर बंगालच्या एक महिन्याच्या दौऱ्यावर आहेत. पश्चिम बंगालमध्ये पोलीस आणि नोकरशाहांचे राजकारण केले जात आहे. असा आरोपही धनखड यांनी केला आहे. एवढेच नाही, तर यासंदर्भात त्यांनी पत्रही लिहिले आहे.

टॅग्स :BJPभाजपाwest bengalपश्चिम बंगालNarendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जीElectionनिवडणूक