शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
4
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
5
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
6
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
7
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
8
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
9
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
10
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
11
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
12
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
13
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
14
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
15
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
16
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
17
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
18
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
19
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
20
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे आता शेतक-यांवर लक्ष, किसान मोर्चा सुधारणार सरकारची प्रतिमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 04:40 IST

शेतक-यांची कमाई दुप्पट करण्याची ग्वाही देत सत्तेत आलेल्या भाजपाला शेतक-यांची पर्वा नाही, या आरोपांचा विरोधकांकडून सातत्याने भडिमार होत असल्याने सरकारची मलिन होणारी प्रतिमा सुधारण्याची जबाबदारी पक्षाने ‘किसान मोर्चा’वर सोपवली आहे.

नितीन अग्रवाल नवी दिल्ली : शेतक-यांची कमाई दुप्पट करण्याची ग्वाही देत सत्तेत आलेल्या भाजपाला शेतक-यांची पर्वा नाही, या आरोपांचा विरोधकांकडून सातत्याने भडिमार होत असल्याने सरकारची मलिन होणारी प्रतिमा सुधारण्याची जबाबदारी पक्षाने ‘किसान मोर्चा’वर सोपवली आहे.शेतक-यांशी संबंधित अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात अपेक्षेनुसार यश आलेले नाही, याची जाणीव भाजपाला झाली आहे. दुर्गम भागांतील शेतक-यांना योजनांची माहितीही नाही. सरकारचा निम्म्याहून अधिक कार्यकाळ संपला आहे. गुजरात, हिमाचल प्रदेशसह अनेक राज्यांत निवडणुकांना सामोरेही जायचे आहे. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आहेत. तेव्हा डोकेदुखी निर्माण होऊ नये व विरोधक मजबूत होऊ नये, अशी भाजपाची इच्छा आहे.पीकविमा, सिंचन, मृद्संधारण, स्वास्थ्य योजनांसह अन्य योजनांचा लाभ शेतकºयांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी भाजपाने किसान मोर्चावर टाकली आहे. भाजपाच्या पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यावर हे काम सोपविले जाणार आहे. या मोहिमेत सुमारे ५० हजार कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षित कार्यकर्ते गावागावांत शेतकºयांना सरकारच्या योजनांची माहिती देतील व या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांना प्रोत्साहन देतील.>काँग्रेसमुळेच हे घडलेभाजपाच्या किसान मोर्चाचे राष्टÑीय अध्यक्ष वीरेंद्र सिंह मस्त म्हणाले की, काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे शेती आणि शेतकºयांचे प्रश्न निर्माण झाले आहेत. शेतकºयांची स्थिती सुधारल्याशिवाय कृषी क्षेत्रात सुधारणा होणार नाही. मोदी सरकार शेतकºयांची स्थिती सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे.