शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

उत्तराखंडातही भाजपचा लक्षवेधी दिग्विजय

By admin | Updated: March 11, 2017 20:01 IST

उत्तराखंडातही भाजपलाच मतदारांनी पहिली पसंती दिली आहे. राज्याच्या निकालांचा कल भाजपच्या बाजूने आहे, याचे चित्र दुपारी बारा वाजताच स्पष्ट झाले होते.

सुरेश भटेवराउत्तराखंडातही भाजपलाच मतदारांनी पहिली पसंती दिली आहे. राज्याच्या निकालांचा कल भाजपच्या बाजूने आहे, याचे चित्र दुपारी बारा वाजताच स्पष्ट झाले होते. मुख्यमंत्री हरीश रावत हरिदार ग्रामीण आणि किच्छा अशा दोन्ही मतदारसंघात मोठया फरकाने पराभूत झाले. काँग्रेसच्या दारूण पराभवाचे ते बोलके निदर्शक ठरले.

उत्तरप्रदेशातून विभक्त झाल्यानंतर उत्तराखंड विधानसभेची ही चौथी निवडणूक. ७0 सदस्यांच्या या विधानसभेत आजवर कोणत्याही पक्षाला ४0 पेक्षा अधिक जागा कधी मिळाल्या नव्हत्या. भाजपला यंदा ५७ जागा मिळाल्या तर काँग्रेसला अवघ्या ११ जागांवर समाधान मानावे लागले. उत्तराखंडात भाजपने मुख्यमंत्रिपदाचा दावेदार जाहीर केला नव्हता. तथापि कोणत्याही स्थितीत हे राज्य आपल्या ताब्यात यावे, यासाठी भाजपची व्यूहरचना वर्षभरापासून चालली होती. सुरूवातीला राज्यात सत्तांतर घडवण्यासाठी काँग्रेसचे आमदार फोडले. त्यानंतर निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने सारे डावपेच अवलंबले. भाजपचे तीन माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी, भुवनचंद्र खंडुरी, रमेश पोखरीयाल (निशंक) यांची एकत्रित शक्ती बहुदा कमी पडेल, याचा अंदाज येताच वयोवृध्द एन.डी. तिवारी, विजय बहुगुणांसह उत्तराखंडातले सारे माजी मुख्यमंत्री भाजपने आपल्या गोटात दाखल करून घेतले. काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सतपाल महाराज दोन वर्षांपूर्वीच भाजपमधे दाखल झाले होते. भाजपच्या या प्रयत्नांना ते सक्रिय मदत करीत होते. परिणामी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष यशपाल आर्य यांच्यासह अनेक काँग्रेसजन ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधे दाखल झाले. सर्वांना सन्मानाने प्रवेश देत भाजपने त्यांना उमेदवारीही बहाल केली. उत्तराखंडात आजमितिला बहुतांश जुने काँग्रेसजनच भाजपचे नेतृत्व करीत आहेत. हे सारे जण हरीश रावत यांच्या पराभवासाठी यंदा एकवटले होते.

वर्षभरापूर्वी काँग्रेसचे आमदार फोडून रावत यांचे सरकार उलथवण्याचा भाजपने खटाटोप केला. तथापि सुप्रिम कोर्टाच्या हस्तक्षेपामुळे भाजपचा हा वांझोटा बेत उधळला गेला. सदर प्रकरणात जनतेची साहानुभूती काही काळ मुख्यमंत्री रावत यांना मिळाली मात्र राज्यात काँग्रेस पक्षाला एकसंध ठेवण्यात ते यशस्वी ठरू शकले नाहीत. निवडणुकीच्या मैदानात काँग्रेसच्या प्रचाराची सूत्रे एकटे हरीश रावतच हाताळत होते. राहुल गांधींच्या काही सभा सोडल्या तर पक्षाचे कोणतेही मोठे नेते रावत यांच्या मदतीला आले नाहीत.भाजपने मात्र केंद्रीय नेत्यांपासून संघाच्या प्रचारकांची मोठी फौज प्रचारासाठी तैनात केली होती. भाजपच्या घवघवीत यशाला हे सारे प्रयोग कारणीभूत ठरले आहेत.

उत्तराखंडात २0१४ साली प्रचंड ढगफुटी झाली. हरिव्दारपासून केदारनाथपर्यंत ठिकठिकाणी प्रचंड नुकसान व मोठी प्राणहानी झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तत्कालिन मुख्यमंत्री विजय बहुगुणा समर्थपणे हाताळू शकले नाहीत. काँग्रेसने मुख्यमंत्रिपद त्यांच्या ऐवजी हरीश रावतांकडे सोपवले. दरम्यान केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यामुळे रावत देखील हतबल ठरले. पैशाअभावी इथल्या विकास योजनांना पुरेशी चालना देऊ शकले नाहीत. नितीन गडकरींच्या परिवहन मंत्रालयाने दरम्यान डेहराडून ते केदारनाथच्या अतिभव्य आणि मजबूत महामार्गाचे स्वप्न राज्याला दाखवले. हा महामार्ग उत्तराखंडाच्या विकासाची जीवनरेखा ठरणार आहे. राज्यातल्या मतदारांना या प्रकल्पाचे सर्वाधिक आकर्षण वाटले, हे देखील भाजपच्या विजयाचे एक महत्वाचे कारण आहे.

उत्तराखंडात कोणत्याही पक्षाचे सरकार ५वर्षांपेक्षा अधिक काळ टिकले नाही. यंदा त्याची पुनरावृत्ती झाली. भाजपला मोठे बहुमत मिळाले आहे. विजयानंतर या पक्षाची जबाबदारी वाढली आहे.