शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

उत्तराखंडातही भाजपचा लक्षवेधी दिग्विजय

By admin | Updated: March 11, 2017 20:01 IST

उत्तराखंडातही भाजपलाच मतदारांनी पहिली पसंती दिली आहे. राज्याच्या निकालांचा कल भाजपच्या बाजूने आहे, याचे चित्र दुपारी बारा वाजताच स्पष्ट झाले होते.

सुरेश भटेवराउत्तराखंडातही भाजपलाच मतदारांनी पहिली पसंती दिली आहे. राज्याच्या निकालांचा कल भाजपच्या बाजूने आहे, याचे चित्र दुपारी बारा वाजताच स्पष्ट झाले होते. मुख्यमंत्री हरीश रावत हरिदार ग्रामीण आणि किच्छा अशा दोन्ही मतदारसंघात मोठया फरकाने पराभूत झाले. काँग्रेसच्या दारूण पराभवाचे ते बोलके निदर्शक ठरले.

उत्तरप्रदेशातून विभक्त झाल्यानंतर उत्तराखंड विधानसभेची ही चौथी निवडणूक. ७0 सदस्यांच्या या विधानसभेत आजवर कोणत्याही पक्षाला ४0 पेक्षा अधिक जागा कधी मिळाल्या नव्हत्या. भाजपला यंदा ५७ जागा मिळाल्या तर काँग्रेसला अवघ्या ११ जागांवर समाधान मानावे लागले. उत्तराखंडात भाजपने मुख्यमंत्रिपदाचा दावेदार जाहीर केला नव्हता. तथापि कोणत्याही स्थितीत हे राज्य आपल्या ताब्यात यावे, यासाठी भाजपची व्यूहरचना वर्षभरापासून चालली होती. सुरूवातीला राज्यात सत्तांतर घडवण्यासाठी काँग्रेसचे आमदार फोडले. त्यानंतर निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने सारे डावपेच अवलंबले. भाजपचे तीन माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी, भुवनचंद्र खंडुरी, रमेश पोखरीयाल (निशंक) यांची एकत्रित शक्ती बहुदा कमी पडेल, याचा अंदाज येताच वयोवृध्द एन.डी. तिवारी, विजय बहुगुणांसह उत्तराखंडातले सारे माजी मुख्यमंत्री भाजपने आपल्या गोटात दाखल करून घेतले. काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सतपाल महाराज दोन वर्षांपूर्वीच भाजपमधे दाखल झाले होते. भाजपच्या या प्रयत्नांना ते सक्रिय मदत करीत होते. परिणामी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष यशपाल आर्य यांच्यासह अनेक काँग्रेसजन ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधे दाखल झाले. सर्वांना सन्मानाने प्रवेश देत भाजपने त्यांना उमेदवारीही बहाल केली. उत्तराखंडात आजमितिला बहुतांश जुने काँग्रेसजनच भाजपचे नेतृत्व करीत आहेत. हे सारे जण हरीश रावत यांच्या पराभवासाठी यंदा एकवटले होते.

वर्षभरापूर्वी काँग्रेसचे आमदार फोडून रावत यांचे सरकार उलथवण्याचा भाजपने खटाटोप केला. तथापि सुप्रिम कोर्टाच्या हस्तक्षेपामुळे भाजपचा हा वांझोटा बेत उधळला गेला. सदर प्रकरणात जनतेची साहानुभूती काही काळ मुख्यमंत्री रावत यांना मिळाली मात्र राज्यात काँग्रेस पक्षाला एकसंध ठेवण्यात ते यशस्वी ठरू शकले नाहीत. निवडणुकीच्या मैदानात काँग्रेसच्या प्रचाराची सूत्रे एकटे हरीश रावतच हाताळत होते. राहुल गांधींच्या काही सभा सोडल्या तर पक्षाचे कोणतेही मोठे नेते रावत यांच्या मदतीला आले नाहीत.भाजपने मात्र केंद्रीय नेत्यांपासून संघाच्या प्रचारकांची मोठी फौज प्रचारासाठी तैनात केली होती. भाजपच्या घवघवीत यशाला हे सारे प्रयोग कारणीभूत ठरले आहेत.

उत्तराखंडात २0१४ साली प्रचंड ढगफुटी झाली. हरिव्दारपासून केदारनाथपर्यंत ठिकठिकाणी प्रचंड नुकसान व मोठी प्राणहानी झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तत्कालिन मुख्यमंत्री विजय बहुगुणा समर्थपणे हाताळू शकले नाहीत. काँग्रेसने मुख्यमंत्रिपद त्यांच्या ऐवजी हरीश रावतांकडे सोपवले. दरम्यान केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यामुळे रावत देखील हतबल ठरले. पैशाअभावी इथल्या विकास योजनांना पुरेशी चालना देऊ शकले नाहीत. नितीन गडकरींच्या परिवहन मंत्रालयाने दरम्यान डेहराडून ते केदारनाथच्या अतिभव्य आणि मजबूत महामार्गाचे स्वप्न राज्याला दाखवले. हा महामार्ग उत्तराखंडाच्या विकासाची जीवनरेखा ठरणार आहे. राज्यातल्या मतदारांना या प्रकल्पाचे सर्वाधिक आकर्षण वाटले, हे देखील भाजपच्या विजयाचे एक महत्वाचे कारण आहे.

उत्तराखंडात कोणत्याही पक्षाचे सरकार ५वर्षांपेक्षा अधिक काळ टिकले नाही. यंदा त्याची पुनरावृत्ती झाली. भाजपला मोठे बहुमत मिळाले आहे. विजयानंतर या पक्षाची जबाबदारी वाढली आहे.