शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ईव्हीएम नसल्यास २0१९ मध्ये भाजपाचा पराभव - मायावती; मतदानासाठी मतपत्रिका वापरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 01:11 IST

येत्या, २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान यंत्रांऐवजी (ईव्हीएम) मतपत्रिकांवर (बॅलट पेपर) मतदान घेतल्यास भाजपचा पराभव निश्चित आहे, असे प्रतिपादन बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी केले.

लखनौ : येत्या, २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान यंत्रांऐवजी (ईव्हीएम) मतपत्रिकांवर (बॅलट पेपर) मतदान घेतल्यास भाजपचा पराभव निश्चित आहे, असे प्रतिपादन बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी केले.उत्तर प्रदेशातील काल जाहीर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालात भाजपने १६ पैकी १४ महापौरांच्या जागा जिंकल्या आहेत. उरलेल्या दोन जागा बसपाने जिंकल्या. या निवडणुकीत जेथे मतपत्रिकांचा वापर झाला तेथे भाजपला कमी मते पडली असून, ईव्हीएम वापरलेल्या ठिकाणी जास्त मते पडली आहेत, असा आरोप होत आहे. त्याचा संदर्भ देत मायावती यांनी हे वक्तव्य केले आहे.डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना बौद्ध धर्माची दीक्षा देणारे बौद्ध भिक्खू भदन्त प्रज्ञानंद यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मायावती म्हणाल्या लोकांचा पाठिंबा आहे, देश आपल्या पाठीशी आहे असा भाजपचा दावा असेल, तर त्यांनी ईव्हीएम बाजूला सारून मतपत्रिकांवर मतदान घ्यायला हवे. तसे झाले तर २०१९ भाजपचा पराभव निश्चित आहे, हे मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकते.(वृत्तसंस्था)सर्वांची मते मिळालीमायावती म्हणाल्या की, उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आम्ही आमच्या पक्षाच्या चिन्हावर लढविली. आम्हाला दलितांबरोबरच सर्व मागास जाती, सवर्ण जाती, अल्पसंख्याक विशेषत: मुस्लिम अशी सर्वांची मते मिळाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा गैरवापर करण्यात आला. अन्यथा आमचे आणखी उमेदवार निवडून आले असते.

टॅग्स :mayawatiमायावती