शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

यूपीतील ‘मदरशा’बाबत भाजपाचा बिग प्लॅन; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 21:07 IST

उत्तर प्रदेश सरकार मदरशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोबाईल एप्लिकेशन विकसित करण्याची योजना आणत आहे.

लखनौ - महाराष्ट्रात मशिदीवरील भोंगे हटवण्याच्या विधानावरून राजकीय वातावरण पेटले आहे. त्यात आता उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कामाचा धडाका लावला आहे. आता योगी यांनी मदरशाच्या इस्लामवर त्यांचे लक्ष केंद्रीत केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, योगी सरकार मुस्लीम मुलांच्या शिक्षणासाठी अत्याधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या जोडीने मोठ्या योजनेवर काम करत आहे.

उत्तर प्रदेश सरकार मदरशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोबाईल एप्लिकेशन विकसित करण्याची योजना आणत आहे. या माध्यमातून स्वातंत्र्यसैनिकांच्या गोष्टी अभ्यासक्रमात शिकवल्या जाणार आहे. ज्यांनी भारतासाठी आणि इतिहासात संघर्ष केला आहे. योगी सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री दानिश आझाद अन्सारी यांनी याबाबत घोषणा केली आहे. मदरशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देशभक्तीची धडे दिले जाणार आहेत. तसेच महापुरुष, स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनगाथा मुस्लीम विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणार आहेत.

मुस्लीम मुलींच्या लग्नाला मदत करणार

दानिश आझाद अन्सारी म्हणाले की, सरकारच्या या पाऊलामुळे मुस्लिम विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना वाढेल आणि त्यांना चांगल्या भविष्यासाठी आधुनिक शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळेल. योगी आदित्यनाथ सरकार मुस्लिम समाजातील गरीब मुलींच्या लग्नासाठीही अनुदान देणार आहे.

सरकारचं स्कूल चलो अभियान

योगी आदित्यनाथ सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळात शिक्षणाला प्रमुख क्षेत्र म्हणून लक्ष्य करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. यासाठी सीएम योगी यांनी सोमवारी 'स्कूल चलो अभियान' सुरू केले. या मोहिमेत शासनाच्या प्राथमिक शाळांमध्ये शतप्रतिशत नोंदणी म्हणजेच नवीन मुलांच्या प्रवेशावर भर दिला जात आहे. यासोबतच सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्याही या अभियानात दूर केल्या जाणार आहेत.

'सर्व मुलांच्या प्रवेशाचे काम झाले पाहिजे'

मोहिमेची सुरुवात करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, 'आम्हाला मूलभूत शिक्षणावर विशेष भर द्यावा लागेल. कोविड-१९ महामारीमुळे २ वर्षांनंतर ही मोहीम सुरू होत आहे. शाळेत न गेलेल्या मुलांना परत येण्यास आळस वाटत असावा. पण एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही आणि प्रत्येकाला शाळेत प्रवेश दिला जाईल याची काळजी घेतली पाहिजे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथ