शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

यूपीतील ‘मदरशा’बाबत भाजपाचा बिग प्लॅन; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 21:07 IST

उत्तर प्रदेश सरकार मदरशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोबाईल एप्लिकेशन विकसित करण्याची योजना आणत आहे.

लखनौ - महाराष्ट्रात मशिदीवरील भोंगे हटवण्याच्या विधानावरून राजकीय वातावरण पेटले आहे. त्यात आता उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कामाचा धडाका लावला आहे. आता योगी यांनी मदरशाच्या इस्लामवर त्यांचे लक्ष केंद्रीत केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, योगी सरकार मुस्लीम मुलांच्या शिक्षणासाठी अत्याधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या जोडीने मोठ्या योजनेवर काम करत आहे.

उत्तर प्रदेश सरकार मदरशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोबाईल एप्लिकेशन विकसित करण्याची योजना आणत आहे. या माध्यमातून स्वातंत्र्यसैनिकांच्या गोष्टी अभ्यासक्रमात शिकवल्या जाणार आहे. ज्यांनी भारतासाठी आणि इतिहासात संघर्ष केला आहे. योगी सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री दानिश आझाद अन्सारी यांनी याबाबत घोषणा केली आहे. मदरशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देशभक्तीची धडे दिले जाणार आहेत. तसेच महापुरुष, स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनगाथा मुस्लीम विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणार आहेत.

मुस्लीम मुलींच्या लग्नाला मदत करणार

दानिश आझाद अन्सारी म्हणाले की, सरकारच्या या पाऊलामुळे मुस्लिम विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना वाढेल आणि त्यांना चांगल्या भविष्यासाठी आधुनिक शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळेल. योगी आदित्यनाथ सरकार मुस्लिम समाजातील गरीब मुलींच्या लग्नासाठीही अनुदान देणार आहे.

सरकारचं स्कूल चलो अभियान

योगी आदित्यनाथ सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळात शिक्षणाला प्रमुख क्षेत्र म्हणून लक्ष्य करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. यासाठी सीएम योगी यांनी सोमवारी 'स्कूल चलो अभियान' सुरू केले. या मोहिमेत शासनाच्या प्राथमिक शाळांमध्ये शतप्रतिशत नोंदणी म्हणजेच नवीन मुलांच्या प्रवेशावर भर दिला जात आहे. यासोबतच सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्याही या अभियानात दूर केल्या जाणार आहेत.

'सर्व मुलांच्या प्रवेशाचे काम झाले पाहिजे'

मोहिमेची सुरुवात करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, 'आम्हाला मूलभूत शिक्षणावर विशेष भर द्यावा लागेल. कोविड-१९ महामारीमुळे २ वर्षांनंतर ही मोहीम सुरू होत आहे. शाळेत न गेलेल्या मुलांना परत येण्यास आळस वाटत असावा. पण एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही आणि प्रत्येकाला शाळेत प्रवेश दिला जाईल याची काळजी घेतली पाहिजे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथ