शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

अविश्वास ठरावावर चर्चा टाळण्याचा भाजपाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 06:24 IST

सरकारवरील अविश्वास ठरावावर चर्चेस आम्ही तयार असल्याचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले असले तरी, सत्ताधारी भाजपा त्यास काही कारणांनी बिचकत असल्याचे सध्या तरी दिसत आहे. आपलेच मित्रपक्ष ठरावावर कसे बोलतील याची सध्या भाजपाला भीती वाटते आहे.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : सरकारवरील अविश्वास ठरावावर चर्चेस आम्ही तयार असल्याचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले असले तरी, सत्ताधारी भाजपा त्यास काही कारणांनी बिचकत असल्याचे सध्या तरी दिसत आहे. आपलेच मित्रपक्ष ठरावावर कसे बोलतील याची सध्या भाजपाला भीती वाटते आहे.शिवसेना, जनता दल युनायटेड, अकाली दल, एलजेपी व अन्य सहकारी पक्षांनी एनडीएला समर्थन असल्याचा शब्द दिला असला तरी, काही सहकारी पक्ष सरकारच्या शैलीवर टीका करतील, अशी भाजपाला धास्ती आहे.लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान व भारतीय समाज पार्टीचे ओ. पी. राजभोर यांनी केलेल्या ताज्या विधानांमुळे भाजपा नेतृत्वावर लाजिरवाणा प्रसंग ओढावला आहे. भाजपाला लोकसभेत ३२५ जागा मिळाल्यामुळे तो सत्तेच्या नशेत असल्याचे राजभोर म्हणाले आहेत. आपलेच सदस्य भलतेसलते बोलून अडचणीत आणतील, अशीही भाजपाला शंका आहे. विरोधी पक्षांकडे सर्वमान्य नेता नसला तरी विरोधक आता राहुल गांधी यांच्यासह एकत्र येत असल्याची भाजपाला जाणीव झाली आहे. कावेरी मुद्यावरून अण्णा द्रमुकच्या सदस्यांनी लोकसभेत गदारोळ घातला. त्यामुळे अविश्वास ठराव आला नाही. अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत सभागृहात सुरळीत कामकाज चालत नाही तोपर्यंत कुठल्याही विषयावर कार्यवाही होऊ शकत नाही.गोंधळ कशाला?- कर्नाटक-तामिळनाडू यांच्या कावेरी पाणी वादावर निर्देश देताना सर्वोच्च न्यायालयाने ‘कावेरी व्यवस्थापन बोर्ड’ स्थापण्यासाठी सहा आठवड्यांची मुदत दिली. ही मुदत २९ मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे बोर्ड स्थापण्याची मागणी अण्णा द्रमुक करत आहे.बोर्ड स्थापन केल्यास कर्नाटक विधानसभा निवडणुकांत फटका बसण्याची भीती असल्याने भाजपा त्यास टाळाटाळ करीत आहे.भाजपाला भीती नाहीप्रत्यक्षात अविश्वास ठराव टाळण्यासाठी भाजपाच्या इशाऱ्यावरूनच अण्णा द्रमुक अडथळे आणत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. गदारोळामुळे तेलगू देसम पार्टी व वायएसआर काँग्रेसला अविश्वास ठराव आणण्यात अपयश आले. अध्यक्षांनी मंगळवारपर्यंत कामकाज स्थगित केले. त्या ठरावाला काँग्रेस, डावे पक्ष, तृणमूल काँग्रेस यांचा पाठिंबा आहे, तर अण्णा द्रमुक, बिजद, टीआरएस तटस्थ राहणार आहेत. तरीही भाजपा सावध आहे. संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार म्हणाले की, भाजपाला भीती नाही.राजू शेट्टी आघाडीच्या वाटेवरस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. शेतकºयांना संपूर्ण कर्जमुक्ती, दीडपट हमीभाव यासाठी यापुढे एकत्र काम करण्याचा निर्णय या चर्चेत झाला. या भेटीमुळे शेट्टी यांची काँग्रेससोबत आघाडी होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे पडले आहे.

टॅग्स :Parliamentसंसद