शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

विधानसभा निवडणुकीत गुजरातमध्ये भाजपा 150 पेक्षा जास्त जागा जिंकेल - योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 11:27 IST

गुजरात विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या निकालाची पुनरावृत्ती होईल असा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

ठळक मुद्देयोगींनी या मुलाखतीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवरही सडकून टीका केली.बदलत्या ऋतुमानासारखे राहुल गांधी मोसमी राजकरणी असल्याची टीका त्यांनी केली.

नवी दिल्ली -  गुजरात विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या निकालाची पुनरावृत्ती होईल असा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. गुजरातमध्येही पूर्ण बहुमताने भाजपाचे सरकार सत्तेवर येईल. गुजरातमध्ये  भाजपा 150 जागा जिंकेल  असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला. आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी 150 जागांचे लक्ष्य ठेवले आहे. आम्ही त्यापेक्षाही जास्त जागा जिंकू असे आदित्यनाथ म्हणाले. 

गुजरातमधला विकासाच सर्वकाही सांगून जातो असे योगी म्हणाले. योगींनी या मुलाखतीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवरही सडकून टीका केली. राहुल गांधी फक्त निवडणुकीच्यावेळी सक्रीय असतात. बदलत्या ऋतुमानासारखे राहुल गांधी मोसमी राजकरणी असल्याची टीका त्यांनी केली. राहुल गांधी निवडणुकीच्यावेळी दिसतात. त्यानंतर ते गायब होतात. त्यांचे विकासामध्ये काहीही योगदान नाही असे योगी म्हणाले. 

उत्तर प्रदेशातील विकासाच्या मुद्यावरुनही त्यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला. अमेठीच्या विकासासाठीही राहुल गांधींनी काहीही केलेले नाही असे ते म्हणाले. अमेठी हा गांधी कुटुंबाचा परंपरागत मतदारसंघ आहे. गुजरातमधले तरुण नेते भाजपाच्या विरोधात आहेत या प्रश्नावर त्यांनी गुजरातमधल्या जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या दूरदृष्टीवर विश्वास आहे असे उत्तर त्यांनी दिले. 

मोदी सरकार राम राज्य निर्माण करण्याच्या दिशेने काम करतेयदु:ख, वेदना नसलेल्या राम राज्याची संकल्पना अयोध्येने दिली. सध्याच्या घडीला सर्वांना घर, वीज आणि प्रत्येक घरामध्ये एलपीजी सिलिंडर मिळाला तर ते ख-या अर्थाने राम राज्य असेल असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येमध्ये दिवाळीच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते. योगींनी यंदाची दिवाळी अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर साजरी केली. केंद्रातले नरेंद्र मोदी सरकार राम राज्य निर्माण करण्याच्या दिशेने काम करत असून, मोदी सरकारच्या कामामुळे सर्वसामान्य जनतेला जे सुख मिळेल तेच राम राज्य असेल असे योगी म्हणाले. प्रत्येक कुटुंबाच्या डोक्यावर हक्काचे छप्पर असले पाहिजे. 2019 पर्यंत प्रत्येक घरामध्ये शौचालय तसेच वीज मिळाली पाहिजे. पंतप्रधानांचे ते स्वप्न आहे. हेच खरे राम राज्य आहे असे योगी म्हणाले. 

टॅग्स :Gujaratगुजरातyogi adityanathयोगी आदित्यनाथ