शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

“...म्हणून नोटबंदीनंतरही नरेंद्र मोदींनी निवडणूक जिंकली”; व्यंकय्या नायडूंनी सांगितले ‘राजकारण’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 16:32 IST

नरेंद्र मोदींइतका सक्षम आणि अनुभवसंपन्न दुसरा नेता नसेल, असे गौरवोद्गार व्यंकय्या नायडू यांनी काढले.

नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयावरून देशभरात मोठा गदारोळ झाला होता. विरोधी पक्षाने भाजपहसह मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. या कालावधीत झालेल्या मृत्यूमुळे केंद्राविरोधात संतापाची लाटही उसळली होती. मात्र, या सगळ्या घडामोडीतही नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी निवडणूक जिंकली. यावर देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी भाष्य करत यामागील राजकारण सांगितले. 

नोंटबंदीमुळे देशभरात विरोधाची लाट असताना आपल्या संवाद कौशल्यामुळे नरेंद्र मोदी निवडणुका जिंकले. निवडणुका जिंकण्याची क्षमता नरेंद्र मोदींमध्ये होती. कारण, ते कायम जनतेच्या संपर्कात राहिले. जनतेशी संवाद साधत राहिले. देशवासीयांनी नरेंद्र मोदी यांच्यावर मोठा विश्वास दाखवला. देशवासीयांचा विश्वास आणि संवाद, संपर्क कौशल्याचा बळावर नरेंद्र मोदी जिंकले, असे नायडू यांनी नमूद केले. नरेंद्र मोदी यांच्या गुजरात आणि केंद्रातील २० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीवरील एका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी नायडू बोलत होते. 

नरेंद्र मोदींइतका सक्षम दुसरा व्यक्ती नाही

नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी, त्यांची स्वप्न, संकल्प आणि मिशन इंडिया या व्यापक यात्रा आणि व्यवहारातील प्रेरणा आहे. हाच मूलभूत फरक नरेंद्र मोदी आणि त्यांच्या समकालिन सार्वजनिक नेत्यांमध्ये होता. त्यामुळे नरेंद्र मोदींइतका सक्षम दुसरा व्यक्ती दिसणार नाही. नरेंद्र मोदींएवढा अनुभव असणारा नेता दुसरा नसेल. गेल्या २० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत नरेंद्र मोदी यांनी आपले वेगळे स्थान देशाच्या राजकारणात निर्माण केले, असे गौरवोद्गार नायडू यांनी काढले. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर लिहिलेल्या या पुस्तकात त्यांच्या राजकीय जीवनातील विविध पैलूंवर उहापोह करण्यात आला आहे. यामध्ये त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीपासून ते त्या काळातील त्यांच्या सर्व महत्त्वाच्या घटनांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत पोहोचण्याचा प्रवासही देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या पुस्तकात अनेकांचे विचार आणि अनुभव आहेत.  

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूNarendra Modiनरेंद्र मोदी