शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

“...म्हणून नोटबंदीनंतरही नरेंद्र मोदींनी निवडणूक जिंकली”; व्यंकय्या नायडूंनी सांगितले ‘राजकारण’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 16:32 IST

नरेंद्र मोदींइतका सक्षम आणि अनुभवसंपन्न दुसरा नेता नसेल, असे गौरवोद्गार व्यंकय्या नायडू यांनी काढले.

नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयावरून देशभरात मोठा गदारोळ झाला होता. विरोधी पक्षाने भाजपहसह मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. या कालावधीत झालेल्या मृत्यूमुळे केंद्राविरोधात संतापाची लाटही उसळली होती. मात्र, या सगळ्या घडामोडीतही नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी निवडणूक जिंकली. यावर देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी भाष्य करत यामागील राजकारण सांगितले. 

नोंटबंदीमुळे देशभरात विरोधाची लाट असताना आपल्या संवाद कौशल्यामुळे नरेंद्र मोदी निवडणुका जिंकले. निवडणुका जिंकण्याची क्षमता नरेंद्र मोदींमध्ये होती. कारण, ते कायम जनतेच्या संपर्कात राहिले. जनतेशी संवाद साधत राहिले. देशवासीयांनी नरेंद्र मोदी यांच्यावर मोठा विश्वास दाखवला. देशवासीयांचा विश्वास आणि संवाद, संपर्क कौशल्याचा बळावर नरेंद्र मोदी जिंकले, असे नायडू यांनी नमूद केले. नरेंद्र मोदी यांच्या गुजरात आणि केंद्रातील २० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीवरील एका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी नायडू बोलत होते. 

नरेंद्र मोदींइतका सक्षम दुसरा व्यक्ती नाही

नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी, त्यांची स्वप्न, संकल्प आणि मिशन इंडिया या व्यापक यात्रा आणि व्यवहारातील प्रेरणा आहे. हाच मूलभूत फरक नरेंद्र मोदी आणि त्यांच्या समकालिन सार्वजनिक नेत्यांमध्ये होता. त्यामुळे नरेंद्र मोदींइतका सक्षम दुसरा व्यक्ती दिसणार नाही. नरेंद्र मोदींएवढा अनुभव असणारा नेता दुसरा नसेल. गेल्या २० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत नरेंद्र मोदी यांनी आपले वेगळे स्थान देशाच्या राजकारणात निर्माण केले, असे गौरवोद्गार नायडू यांनी काढले. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर लिहिलेल्या या पुस्तकात त्यांच्या राजकीय जीवनातील विविध पैलूंवर उहापोह करण्यात आला आहे. यामध्ये त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीपासून ते त्या काळातील त्यांच्या सर्व महत्त्वाच्या घटनांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत पोहोचण्याचा प्रवासही देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या पुस्तकात अनेकांचे विचार आणि अनुभव आहेत.  

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूNarendra Modiनरेंद्र मोदी