शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

तेलंगणाने साधलेल्या विकासाने भाजप अस्वस्थ; मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 07:41 IST

भाजप देत असलेल्या त्रासाला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ, असा निर्धार के. चंद्रशेखर राव यांनी व्यक्त केला.

हैदराबाद :तेलंगणा दरडोई उत्पन्नाबाबत देशात अग्रस्थानी आहे. त्यासाठी आम्ही अनेक अडथळ्यांवर मात केली आहे. वीजकपात न करता तेलंगणाने विकास साधला तसेच सामाजिक कल्याण व प्रगतीबाबत देशात पहिले स्थान पटकावले. तेलंगणाला मिळालेले यश पाहून भाजप अस्वस्थ झाला आहे, अशी टीका भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली.

ते म्हणाले की, तेलंगणाचा झालेला विकास भाजपला आवडलेला नाही. त्यामुळेच भारत राष्ट्र समितीच्या लोकप्रतिनिधींविरोधात भाजप षडयंत्र रचून त्यांना त्रास देत आहे. सीबीआय, ईडी, आयकर खात्याकडून लोकप्रतिनिधींवर धाडी टाकल्या जात असून, भाजपच्या अस्वस्थतेचे ते निदर्शक आहे. भाजप देत असलेल्या त्रासाला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ, असा निर्धार के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा भवनमध्ये झालेल्या एका बैठकीत व्यक्त केला. (वृत्तसंस्था)

गुंतवणूकदारांनी दिले प्राधान्य

तेलंगणामध्ये थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ सतत सुरू आहे. या राज्याच्या औद्योगिक धोरणाचे जगातील अनेक देशांनी कौतुक केले आहे.  जगद्विख्यात कंपन्या हैदराबादमध्ये गुंतवणूक करण्यात आघाडीवर आहेत.

असा केला तेलंगणाने विकास

तेलंगणाने लहान मुले, मुली, वृद्ध व्यक्ती, शेतकरी यांच्या कल्याणासाठी उत्तम योजना राबविल्या आहेत. आयटीपासून विविध क्षेत्रांतील उद्योगांच्या विकासासाठी भारत राष्ट्र समितीच्या सरकारने ठोस पावले उचलली. त्यामुळे या उद्योगांचा विकास झाला आहे. या राज्यातील जलसंधारण क्षेत्रामध्ये वाढ होण्यासाठी काही योजना राबविण्यात आल्या. त्याची चांगली फळे आता सर्वांना मिळत आहेत.

आंबेडकरांच्या पुतळ्याचे १४ एप्रिलला अनावरण

हैदराबादमधील हुसैन सागर तलावाजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५ फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात येत आहे. त्या पुतळ्याचे अनावरण येत्या १४ एप्रिलला डॉ. आंबेडकरांच्या जयंतीदिनी करण्यात येणार आहे. भारत राष्ट्र समितीच्या सरकारने हा पुतळा उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावTelanganaतेलंगणा