शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

“मालदीवच्या भूमिकेवर राजीव गांधींप्रमाणे कारवाई करणार का”; भाजप नेत्याची केंद्राला विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 16:06 IST

India Vs Maldives Crisis: मालदीवने भारतमातेवर चिखलफेक केल्यानंतर पंतप्रधान मोदी गप्प बसतील की कारवाई करतील, अशी विचारणा भाजपच्या जेष्ठ नेत्याने केली आहे.

India Vs Maldives Crisis: गेल्या काही दिवसांपासून मालदीव आणि भारतात संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे भारतीय सैन्य मागे घ्यावे, अशी मागणी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी सातत्याने लावून धरली आहे. तर दुसरीकडे भारतासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे बॉयकॉट मालदीव हा ट्रेंड सुरू आहे. यावरून मालदीवमध्येही दोन गट पडल्याचे दिसत आहे. यातच आता भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने केंद्राला घरचा आहेर देत मालदीवच्या भूमिकेबाबत काय निर्णय घेणार, अशी विचारणा केली आहे. 

चीनवरून मायदेशी परतल्यानंतर मोहम्मद मुइज्जू यांनी अप्रत्यक्षपणे भारताला इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे. मुइज्जू म्हणाले की, भले आम्ही लहान देश असू शकतो, असे असले म्हणून कोणालाही आम्हाला धमकावण्याचा, दाबण्याचा परवाना मिळालेला नाही. मुइज्जू यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख हा भारताकडे होता, असे म्हटले जात आहे. तसेच भारतीय सैन्य मालदीवमधून मागे घेण्याबाबत मुइज्जू यांनी पुन्हा एकदा तगादा लावला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एक्सवर एक पोस्ट करत केंद्राला थेट सवाल केला आहे. 

मालदीवच्या भूमिकेवर राजीव गांधींप्रमाणे कारवाई करणार का?

चीनचा दौरा करून मायदेश परत आलेले मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी भारत सरकारला १५ मार्चपर्यंत मालदीवमधून भारतीय सैन्य परत बोलवा अन्यथा परिणामांना सामोरे जायला तयार राहा, असा इशारा दिला आहे. कृतघ्न मालदीवने भारतमातेवर चिखलफेक केल्यानंतर पंतप्रधान मोदी मौन बाळगून गप्प बसतील की राजीव गांधी यांच्याप्रमाणे मालदीवमध्ये लष्कर, वायूदल आणि नौदल घुसवून सत्तांतर घडवतील? असा सवाल सुब्रमण्यम स्वामी यांनी एक्सवर केला आहे. 

दरम्यान, आधीच्या सरकारने भारताला विनंती करून मालदीवमध्ये भारतीय लष्कराची एक तुकडी तैनात करण्यास सांगितली होती. या विनंतीला मान देत, मालदीवरमधील सागरी सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थितीच्या बचाव कार्यासाठी भारतीय सैन्यदलाने आपली एक सैन्यतुकडी मालदीवला पाठवली होती. मात्र, आता सत्तांतर झाल्यानंतर नवे राष्ट्राध्यक्ष मोइज्जू यांनी भारतीय लष्कर माघारी बोलवावे, असा आग्रह धरला आहे. भारतीय लष्कराबाबत मालदीवने नोव्हेंबर २०२३ मध्ये एक निवेदन जारी केले होते. भारत आमच्या लोकशाही इच्छेचा आदर करेल आणि आपल्या सैन्याला माघारी फिरण्याचा आदेश देईल, अशी आम्हाला आशा आहे, असे या निवेदनात म्हटले होते. 

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीMaldivesमालदीव