शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

“मालदीवच्या भूमिकेवर राजीव गांधींप्रमाणे कारवाई करणार का”; भाजप नेत्याची केंद्राला विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 16:06 IST

India Vs Maldives Crisis: मालदीवने भारतमातेवर चिखलफेक केल्यानंतर पंतप्रधान मोदी गप्प बसतील की कारवाई करतील, अशी विचारणा भाजपच्या जेष्ठ नेत्याने केली आहे.

India Vs Maldives Crisis: गेल्या काही दिवसांपासून मालदीव आणि भारतात संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे भारतीय सैन्य मागे घ्यावे, अशी मागणी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी सातत्याने लावून धरली आहे. तर दुसरीकडे भारतासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे बॉयकॉट मालदीव हा ट्रेंड सुरू आहे. यावरून मालदीवमध्येही दोन गट पडल्याचे दिसत आहे. यातच आता भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने केंद्राला घरचा आहेर देत मालदीवच्या भूमिकेबाबत काय निर्णय घेणार, अशी विचारणा केली आहे. 

चीनवरून मायदेशी परतल्यानंतर मोहम्मद मुइज्जू यांनी अप्रत्यक्षपणे भारताला इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे. मुइज्जू म्हणाले की, भले आम्ही लहान देश असू शकतो, असे असले म्हणून कोणालाही आम्हाला धमकावण्याचा, दाबण्याचा परवाना मिळालेला नाही. मुइज्जू यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख हा भारताकडे होता, असे म्हटले जात आहे. तसेच भारतीय सैन्य मालदीवमधून मागे घेण्याबाबत मुइज्जू यांनी पुन्हा एकदा तगादा लावला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एक्सवर एक पोस्ट करत केंद्राला थेट सवाल केला आहे. 

मालदीवच्या भूमिकेवर राजीव गांधींप्रमाणे कारवाई करणार का?

चीनचा दौरा करून मायदेश परत आलेले मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी भारत सरकारला १५ मार्चपर्यंत मालदीवमधून भारतीय सैन्य परत बोलवा अन्यथा परिणामांना सामोरे जायला तयार राहा, असा इशारा दिला आहे. कृतघ्न मालदीवने भारतमातेवर चिखलफेक केल्यानंतर पंतप्रधान मोदी मौन बाळगून गप्प बसतील की राजीव गांधी यांच्याप्रमाणे मालदीवमध्ये लष्कर, वायूदल आणि नौदल घुसवून सत्तांतर घडवतील? असा सवाल सुब्रमण्यम स्वामी यांनी एक्सवर केला आहे. 

दरम्यान, आधीच्या सरकारने भारताला विनंती करून मालदीवमध्ये भारतीय लष्कराची एक तुकडी तैनात करण्यास सांगितली होती. या विनंतीला मान देत, मालदीवरमधील सागरी सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थितीच्या बचाव कार्यासाठी भारतीय सैन्यदलाने आपली एक सैन्यतुकडी मालदीवला पाठवली होती. मात्र, आता सत्तांतर झाल्यानंतर नवे राष्ट्राध्यक्ष मोइज्जू यांनी भारतीय लष्कर माघारी बोलवावे, असा आग्रह धरला आहे. भारतीय लष्कराबाबत मालदीवने नोव्हेंबर २०२३ मध्ये एक निवेदन जारी केले होते. भारत आमच्या लोकशाही इच्छेचा आदर करेल आणि आपल्या सैन्याला माघारी फिरण्याचा आदेश देईल, अशी आम्हाला आशा आहे, असे या निवेदनात म्हटले होते. 

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीMaldivesमालदीव