शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

“मालदीवच्या भूमिकेवर राजीव गांधींप्रमाणे कारवाई करणार का”; भाजप नेत्याची केंद्राला विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 16:06 IST

India Vs Maldives Crisis: मालदीवने भारतमातेवर चिखलफेक केल्यानंतर पंतप्रधान मोदी गप्प बसतील की कारवाई करतील, अशी विचारणा भाजपच्या जेष्ठ नेत्याने केली आहे.

India Vs Maldives Crisis: गेल्या काही दिवसांपासून मालदीव आणि भारतात संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे भारतीय सैन्य मागे घ्यावे, अशी मागणी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी सातत्याने लावून धरली आहे. तर दुसरीकडे भारतासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे बॉयकॉट मालदीव हा ट्रेंड सुरू आहे. यावरून मालदीवमध्येही दोन गट पडल्याचे दिसत आहे. यातच आता भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने केंद्राला घरचा आहेर देत मालदीवच्या भूमिकेबाबत काय निर्णय घेणार, अशी विचारणा केली आहे. 

चीनवरून मायदेशी परतल्यानंतर मोहम्मद मुइज्जू यांनी अप्रत्यक्षपणे भारताला इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे. मुइज्जू म्हणाले की, भले आम्ही लहान देश असू शकतो, असे असले म्हणून कोणालाही आम्हाला धमकावण्याचा, दाबण्याचा परवाना मिळालेला नाही. मुइज्जू यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख हा भारताकडे होता, असे म्हटले जात आहे. तसेच भारतीय सैन्य मालदीवमधून मागे घेण्याबाबत मुइज्जू यांनी पुन्हा एकदा तगादा लावला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एक्सवर एक पोस्ट करत केंद्राला थेट सवाल केला आहे. 

मालदीवच्या भूमिकेवर राजीव गांधींप्रमाणे कारवाई करणार का?

चीनचा दौरा करून मायदेश परत आलेले मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी भारत सरकारला १५ मार्चपर्यंत मालदीवमधून भारतीय सैन्य परत बोलवा अन्यथा परिणामांना सामोरे जायला तयार राहा, असा इशारा दिला आहे. कृतघ्न मालदीवने भारतमातेवर चिखलफेक केल्यानंतर पंतप्रधान मोदी मौन बाळगून गप्प बसतील की राजीव गांधी यांच्याप्रमाणे मालदीवमध्ये लष्कर, वायूदल आणि नौदल घुसवून सत्तांतर घडवतील? असा सवाल सुब्रमण्यम स्वामी यांनी एक्सवर केला आहे. 

दरम्यान, आधीच्या सरकारने भारताला विनंती करून मालदीवमध्ये भारतीय लष्कराची एक तुकडी तैनात करण्यास सांगितली होती. या विनंतीला मान देत, मालदीवरमधील सागरी सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थितीच्या बचाव कार्यासाठी भारतीय सैन्यदलाने आपली एक सैन्यतुकडी मालदीवला पाठवली होती. मात्र, आता सत्तांतर झाल्यानंतर नवे राष्ट्राध्यक्ष मोइज्जू यांनी भारतीय लष्कर माघारी बोलवावे, असा आग्रह धरला आहे. भारतीय लष्कराबाबत मालदीवने नोव्हेंबर २०२३ मध्ये एक निवेदन जारी केले होते. भारत आमच्या लोकशाही इच्छेचा आदर करेल आणि आपल्या सैन्याला माघारी फिरण्याचा आदेश देईल, अशी आम्हाला आशा आहे, असे या निवेदनात म्हटले होते. 

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीMaldivesमालदीव