शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

सत्तेसाठी भाजपने लाचार होऊ नये; अन्यथा जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल : कमलनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 16:41 IST

भाजपच्या नेत्यांनी केवळ सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला नसून राज्याच्या विकासावर आक्रमण केले आहे. शेतकरी आणि युवकांच्या उज्ज्वल भवितव्यावर भाजपने वार केल्याचे कमलनाथ म्हणाले.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशात सुरू असलेल्या राजकीय नाट्यामध्ये आता कमलनाथ यांनी जनतेसाठी लिहिलेल्या खुल्या पत्राची भर पडली आहे. या पत्रात कमलनाथ यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. तसेच मध्यप्रदेश सरकार अस्थिर करण्याचे भाजपचे प्रयत्न निंदणीय असल्याचे कमलनाथ यांनी म्हटले.

भाजपच्या नेत्यांनी राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे राज्याच्या विकासावर देखील परिणाम झाला आहे. सत्तेची लालसा भाजप नेत्यांनी एवढी ठेवू नये की, जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल, अशी खोचक टीका कमलनाथ यांनी भाजपवर केली.

भगवान हनुमान भाजपला मर्यादा, संयम आणि चारित्र्यसंपन्नता देवो जेणेकरून सत्ताधारी आणि विरोधीपक्ष राज्याच्या विकासासाठी काम करू शकेल, असंही कमलनाथ यांनी म्हटले. भाजपने सत्तेसाठी केलेले प्रयत्न मध्य प्रदेशच्या गौरवशाली इतिहासाला कलंक लावणारे आहेत. एवढे वाईट कृत्य करण्याची प्रेरणा भाजपला मिळते कुठून असा प्रश्न कमलनाथ यांनी जनतेला लिहिलेल्या पत्रात उपस्थित केला. 

दरम्यान भाजपच्या नेत्यांनी केवळ सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला नसून राज्याच्या विकासावर आक्रमण केले आहे. शेतकरी आणि युवकांच्या उज्ज्वल भवितव्यावर भाजपने वार केल्याचे कमलनाथ म्हणाले.