शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

पश्चिम बंगालमधील जनादेश भाजपने स्वीकारावा - बॅनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 01:48 IST

राज्यात पथक पाठविल्याबद्दल केली टीका

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात पथक पाठविण्याच्या संदर्भात केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, पश्चिम बंगालमधील जनादेश भाजपने स्वीकारावा. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले व त्यात तृणमूल काँग्रेसने २१३ जागा जिंकल्या. त्यानंतर काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. यावरून भाजप आणि तृणमूल काँग्रेस समोरासमोर उभे ठाकले आहेत. 

“मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन २४ तासही झाले नाहीत आणि मला पत्रेही येऊ लागली आहेत. एक केंद्रीय पथक आलेही आहे. राज्यात जनतेने भाजपला स्वीकारले नाही म्हणून असे घडत आहे, ” असे बॅनर्जी म्हणाल्या. “जनादेशाचा स्वीकार करण्याचे मी भाजपला आवाहन करते. आपल्याला कोरोना संकटाला तोंड देण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे,” असेही त्या म्हणाल्या. त्यांनी थेट केंद्राच्या कोरोना धोरणावरच प्रश्न उपस्थित केला. “केंद्राकडे कोरोनासंदर्भात कोणत्याही प्रकारचे पारदर्शक धोरण नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यात अधिक चांगले धोरण तयार करावे, अशी विनंती मी त्यांना केली आहे,” असे बॅनर्जी म्हणाल्या. 

भाजपच्या लोकांनी बंगालमध्ये येऊन कोरोना पसरवला, असा आरोप करून, अजूनही राज्याला पुरेशा लसी मिळालेल्या नाहीत, असेही त्यांनी म्हटले. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल