शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कर्नाटकात भाजप ‘ऑपरेशन लोटस’ चालवत आहे; मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनंतर शिवकुमारांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 16:46 IST

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीच कर्नाटकात ऑपरेशन लोटस चालवण्यात येणार असल्याचा दावा केला आहे.

कर्नाटकातीलकाँग्रेस सरकार पुन्हा एकदा संकटात आले असल्याचा दावा करण्यात आला आहे. कर्नाटकात ‘ऑपरेशन लोटस’ होणार असल्याचा दावा खुद्द मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे. या अंतर्गत भाजप त्यांचे सरकार पाडणार होते असा आरोप करण्यात आला आहे.

'राज्य सरकार पाडण्यासाठी भाजपने काँग्रेसच्या ५० आमदारांना प्रत्येकी ५० कोटी रुपयांची ऑफर दिली आहे, असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला. यानंतर आता उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनीही हाच दावा केला आहे. भाजपने काँग्रेसच्या ५० आमदारांना प्रत्येकी ५० कोटी रुपयांचे आमिष दाखवले आहे, असा दावा डीके शिवकुमार यांनी केला.

राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं; राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

डीके शिवकुमार यांनी सांगितले की, भाजपच्या कथित 'ऑपरेशन लोटस'बद्दल काँग्रेस आमदारांना माहिती देण्यात आली होती. "आमच्या काही आमदारांनी मुख्यमंत्र्यांना या प्रकरणाची माहिती दिली आणि त्यांनी ती मीडियाशी शेअर केली,असंही शिवकुमार म्हणाले. म्हैसूर येथील एका कार्यक्रमात सिद्धरामय्या यांनी काँग्रेसच्या एकाही आमदाराने प्रस्ताव स्वीकारला नाही” असा दावा पुन्हा केला.

'ऑपरेशन लोटस' हा शब्द भाजपने घोडे- बाजारद्वारे सत्ताधारी सरकारांना अस्थिर करण्याच्या प्रयत्नांसाठी वापरला आहे.

मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपवर आपले सरकार पाडण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. भाजपने आमचे सरकार अस्थिर करण्यासाठी आमच्या आमदारांना मोठ्या प्रमाणात पैशाचे आमिष दाखवले, असे ते म्हणाले. तसेच, भाजपने प्रत्येक आमदाराला ५० कोटी रुपयांची ऑफर दिली आणि जवळपास ५० आमदाराना विकत घेण्याचा प्रयत्न केला, असा दावा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केला.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, "हा पैसा येतोय कुठून? बीएस येडियुरप्पा आणि बोम्मई नोटा छापत आहेत का? या पैशाचा स्रोत काय? हा भ्रष्टाचाराचा पैसा आहे, जो भाजप नेत्यांकडे जमा झाला आहे. त्या    पैशाचा वापर करून आमचे आमदार विकत घेत आहेत. भाजपच्या या प्रस्तावासाठी आमचे आमदार तयार नाहीत." दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, भाजपचा हा प्लॅन अयशस्वी ठरल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची प्रतिमा डागाळण्याचे आणि त्यांना सत्तेवरून हटवण्याचे प्रयत्न सुरू केले.

टॅग्स :Karnatakकर्नाटकcongressकाँग्रेस