शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

काँग्रेसच्या मार्गावर भाजपा, देशात अराजकतेची परिस्थिती- मायावती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 10:12 IST

काँग्रेसच्या मार्गावर आता भाजपाची वाटचाल सुरू आहे,

लखनऊः काँग्रेसच्या मार्गावर आता भाजपाची वाटचाल सुरू आहे, देशात अराजकतेची परिस्थिती आहे, असं म्हणत मायावतींनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. बहुजन समाज पार्टी(BSP)च्या मायावतींनी बुधवारी राजधानी लखनऊमध्ये 64व्या वाढदिवसाच्या निमित्तानं भाजपा आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. जशा प्रकारे काँग्रेसच्या पूर्वीच सरकारनं काम केलं आहे, त्याच पद्धतीनं भाजपाचं काम सुरू आहे. केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळेच तणाव आणि अराजकतेसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. लखनऊमधल्या मॉल एव्हेन्यूस्थित बसपा मुख्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी पूर्वाश्रमीच्या काँग्रेस सरकारवर टीका केली. काँग्रेसनं ज्या पद्धतीनं गरीब आणि दलित विरोधी कृत्यांना प्रोत्साहन दिलं, त्यामुळेच जनतेनं त्यांना सत्तेतून बाहेर हाकललं. आता सत्तेत आलेल्या भाजपाचीसुद्धा त्याच मार्गानं वाटचाल सुरू आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेची दशा खालावत चाललेली असून, देशाची अवस्था वाईट आहे. केंद्राच्या चुकीच्या नीतींमुळे आज देशातील गोरगरीब जनता त्रासलेली आहे. भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पार्टी एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. खरं तर भाजपा काँग्रेसपेक्षा दोन पावलं पुढेच आहे. काँग्रेसमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत परतली आहे. आता काँग्रेस अँड कंपनी भाजपाच्या चुकीच्या धोरणांचा हवाला देत सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत गरिबांच्या दुःखाची बसपाला कल्पना आहे. गरिबांच्या प्रश्नांसाठी आम्ही कायमच लढत राहू, असंही मायावती म्हणाल्या आहेत. मायावतींनी नोटाबंदी, जीएसटी, सीएए, एनआरसी आणि एनपीआर सारखे मुद्दे उपस्थित करत भाजपावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. या सर्व गोष्टी करण्यापेक्षा केंद्रानं गरीब, दलित, आदिवासी आणि मागास वर्गाच्या कल्याणासाठी काम केलं असतं ते योग्य ठरलं असतं.  

टॅग्स :mayawatiमायावती