शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

"पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे बांगलादेशातील हिंदू वाचले", भाजप खासदाराचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 14:26 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे बांगलादेशातील हिंदूंचे प्राण वाचले, असे विधान खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे.

उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील हिंसाचारावर मोठा दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे बांगलादेशातील हिंदूंचे प्राण वाचले, असे विधान खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे.

बांगलादेशात जे काही घडले, ती अत्यंत चिंतेची बाब आहे. तिथल्या घटना खूप वेदनादायी आहेत. नरेंद्र मोदींनी बांगलादेशातील हिंदूंना वाचवले आहे. मात्र, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अल्पसंख्यांकांबाबत रात्रंदिवस आटा पिटा करणारे गप्प बसले आहेत, असे खासदार साक्षी महाराज यांनी म्हटले आहे.

खासदार साक्षी महाराज यांनी अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्यासह संपूर्ण इंडिया आघाडीतील नेते अल्पसंख्यांकांबद्दल बोलतात. मात्र, आजपर्यंत त्यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायाच्या बाजूने कोणतेही खुले विधान केलेले नाही.

भारतातील जनतेने हे समजून घेतले पाहिजे की त्यांचे समर्थक आणि रक्षक कोण आहेत, असे खासदार साक्षी महाराज म्हणाले. तसेच, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणतात की हिंदू कमी झाले तर त्यांना मारहाण केली जाईल. हिंदू कमी झाले तर देशाची फाळणी होईल, त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे, असे खासदार साक्षी महाराज सांगितले.

याचबरोबर, देशातील हिंदूंनी संघटित राहण्याची गरज आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशातील हिंदूंना वाचवले आहे, असे खासदार साक्षी महाराज सांगितले. तसेच, पश्चिम बंगालच्या मुद्द्यावर खासदार साक्षी महाराज म्हणाले की, जर आपण तिथली लढाई लढत असू तर जनतेने लक्ष देण्याची गरज आहे.

बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूवर हल्लेदरम्यान, काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्यावरुन बांगलादेशात असंतोष पसरला होता. शेख हसीना यांच्या सरकारविरोधात जनतेनं उठाव केला होता. यानंतर परिस्थिती इतकी चिघळली की, शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला. या घटनेनंतर आता बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. मात्र, येथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. जमावाकडून देशात अनेक हिंदू समुदायावर हल्ले करण्यात आले. तसेच, गेल्या काही दिवसांत बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूवर हल्ले होत असल्याचे दिसून आले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBangladeshबांगलादेश