शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

भाजपच्या नेत्यांना दिल्लीत वाटण्यासाठी मिळाले होते प्रत्येकी १० हजार रुपये, संजय सिंह यांचा मोठा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 14:01 IST

​​​​​​​Delhi Elections 2025 : भाजपच्या काही नेत्यांनी मतं खरेदी करण्यासाठी दिल्लीत १ हजार रुपये वाटले. या प्रकरणाची संपूर्ण दिल्लीत चर्चा झाली. उघडपणे पैसे देऊन मतं खरेदी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे संजय सिंह यांनी सांगितले.

Delhi Elections 2025 :दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. अशातच आपचे नेते संजय सिंह आणि सौरभ भारद्वाज यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपच्या काही नेत्यांनी मतं खरेदी करण्यासाठी दिल्लीत १ हजार रुपये वाटले. या प्रकरणाची संपूर्ण दिल्लीत चर्चा झाली. उघडपणे पैसे देऊन मतं खरेदी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे संजय सिंह यांनी सांगितले.

आम्हाला सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. हे खूप गंभीर आहे. गैरवर्तन करणाऱ्या पक्षाच्या (भाजप) नेत्यांनी  आपल्या नेत्यांना प्रत्येकी १० हजार रुपये लोकांना वाटण्यासाठी दिले होते. १०-१० हजार रुपये वाटा आणि मते खरेदी करा, असे सांगतिले होते. मात्र, त्यांच्या नेत्यांना वाटले की ते निवडणुकीत पराभूत होणारच आहेत, म्हणून निवडणुकीत पैसे कमवणे चांगले होईल, असे संजय सिंह म्हणाले.

यानंतर पक्षाने एक नवीन पद्धत स्वीकारली. नेत्यांना सांगितले की, तुमच्या खिशात ९ हजार रुपये ठेवा आणि १ हजार रुपये वाटा. त्यामुळे संपूर्ण दिल्लीत एक-एक हजार रुपये वाटण्यात आले. ९-९ हजार रुपये वाचवण्यात आले. मी गैरवर्तन करणाऱ्या पक्षाला सर्वांसमोर सत्य उघड करण्यास सांगू इच्छितो. जर तुम्हाला प्रत्येकी १० हजार रुपये दिले होते तर तुम्ही ते संपूर्ण पैसे का वाटले नाहीत? तुम्ही जनतेचे प्रत्येकी ९ हजार रुपये का घेतले? असा सवालही संजय सिंह यांनी केला.

जर ते तुमच्याकडे मतं मागण्यासाठी आले तर त्यांना सांगा की तुमच्या नेत्यांनी १० हजार रुपये पाठवले होते. त्याचे ९ हजार रुपये कुठे आहेत? दिल्लीच्या जनतेला त्यांचा भ्रष्टाचार उघड करावा लागेल, असेही संजय सिंह म्हणाले.  याचबरोबर, पूर्वांचलच्या मुद्द्यावर संजय सिंह म्हणाले की, मी सभागृहात असेही म्हटले होते की, पूर्वांचलमधील लोकांची नावे मतदार यादीतून काढून टाकली जात आहेत. त्यांना रोहिंग्या आणि बांगलादेशी म्हटले जात आहे. तसेच, माझ्या पत्नीचे मत रद्द करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज देण्यात आल्याचा आरोपही संजय सिंह यांनी विरोधकांवर केला आहे.

टॅग्स :AAPआपdelhi electionदिल्ली निवडणूकdelhiदिल्ली