शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

राहुल गांधींच्या कारवर हल्ला करणाऱ्या भाजप नेत्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2017 18:02 IST

गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कारवर दगडफेक करणाऱ्या भाजपच्या स्थानिक नेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. 

ठळक मुद्देगुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कारवर दगडफेक करणाऱ्या भाजपच्या स्थानिक नेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी धनेरामधून त्या स्थानिक नेत्याला अटक करण्यात आलं आहे. जयेश दर्जी असं या नेत्याचं नाव असून तो बनासकांठाचा भाजपचा जिल्हा महामंत्री आहे.

अहमदाबाद, दि. 5- गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कारवर दगडफेक करणाऱ्या भाजपच्या स्थानिक नेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी धनेरामधून त्या स्थानिक नेत्याला अटक करण्यात आलं आहे. जयेश दर्जी असं या नेत्याचं नाव असून तो बनासकांठाचा भाजपचा जिल्हा महामंत्री आहे. तसंच या प्रकरणी इतर तिघांना ताब्यात घेतलं आहे. दर्जी हा या घटनेतील मुख्य आरोपी असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. राहुल गांधींच्या कारवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी शनिवारी देशभरात ठिकठिकाणी निदर्शनं केली.

बनासकांठा येथे पूरग्रस्त लोकांना भेटण्यासाठी गेले असताना कारवर झालेल्या हल्ल्यावरून राहुल गांधी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना भाजपवर हल्लाबोल केला होता. या हल्ल्यामागे भाजप आणि आरएसएसचा हात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.  तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही त्यांनी निशाणा साधला होता. ज्यांनी हल्ले घडवून आणले तेच या हल्ल्याचा निषेध कसा करतील, असा आरोप त्यांनी मोदींवर केला होता. मोदी आणि आरएसएस-भाजपची राजकारणाची हीच पद्धत आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती. 

नेमकं काय घडलं ?गुजरात दौ-यावर असलेल्या राहुल गांधी यांच्या गाडीवर धनेरा येथील लाल चौकात हा हल्ला करण्यात आला . काँग्रेसने या हल्ल्यामागे भाजपा कार्यकर्ता असल्याचा आरोप केला. भाजपाने मात्र हे आरोप फेटाळून लावत काँग्रेसला आमच्यावर आरोर करायची सवय झाली आहे असं म्हटलं. पूरग्रस्त गुजरातच्या दौऱ्यावर असताना काही लोकांनी राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवले होते. तसंच त्यांच्या वाहनताफ्यावर दगडफेक केली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी कारवर दगडफेक केल्याचा आरोप काँग्रेसनं केला होता. दगडफेक केल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोदी-मोदी अशा घोषणाही दिल्याचा दावा करण्यात आला होता. भाजपच्या गुंडांनी राहुल गांधींच्या कारवर हल्ला केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला होता.

बनासकाठामध्ये राहुल गांधी म्हणाले, मी तुम्हा सर्वांमध्ये येऊ इच्छितो, काँग्रेस पक्ष हा तुमच्यासोबत आहे. मी पूरग्रस्तांच्या सोबत आहे. तत्पूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील पूरग्रस्त लोकांशी बातचीत केली होती.